शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

जिल्ह्यात संथ गतीनेच शेतीचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनाम्याचे काम संथ गतीनेच सुरू आहे. पावसाने उघडीप दिली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनाम्याचे काम संथ गतीनेच सुरू आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी अद्याप नदीकाठावर पुराचे पाणी व दलदल असल्याने पंचनाम्यात अडथळा येत असल्याचे संबंधित यंत्रणेचे म्हणणे आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ २६ टक्केच पंचनामे झाले आहेत.

महापुरामुळे जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे उभी पिके उद्ध्वस्त झालीच त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे जमिनी तुटून गेल्या आहेत. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यात तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांना घरांच्या पडझडीच्या पंचनाम्याची जबाबदारी दिली होती. घरांचे पंचनामे पूर्ण झाले असून आता शेतीच्या पंचनाम्यांचे काम सुरू झाले आहे. साधारणत: जिल्ह्यात ६० हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसला आहे. त्याच्या पंचनाम्याचे काम सुरू असले तरी ते संथगतीने सुुरू आहे. अद्याप नदीकाठावर पुराचे पाणी व दलदल असल्याने पंचनामा करण्यास अडथळा येत असल्याचे संबंधित यंत्रणेचे म्हणणे आहे. आतापर्यंत १६ हजार हेक्टरवरील पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्याची माहीती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली.