शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

परतीच्या पावसाच्या धिंगाण्याने शेती उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 11:48 IST

मुख्य पीक असलेल्या भातकाढणी आणि ऊसलागणीला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे धान्यासह वैरणीचा प्रश्नही पुढील काळात गंभीर बनणार आहे.

ठळक मुद्देऊसलागणीसह रब्बी हंगामही लांबणीवर पडणार

कोल्हापूर : परतीच्या पावसाचा रोजच सुरू असलेला धिंगाणा पिकांसाठी काळ बनून आला असून, शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त झाल्यातच जमा आहे. महापुराच्या तडाख्यातून जी काही पिके वाचली, ती परतीच्या पावसाने आपल्या कवेत घेतली. नेहमी पोषक बनून येणारा हा पाऊस यावर्षी मात्र काळ बनून आला आहे. काढणीला आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. नवीन पेरा करायचा तर शिवारे पाण्याने तुंबली असल्याने या वर्षीचा रब्बी हंगाम किमान एक महिन्याने पुढे जाणार आहे. मुख्य पीक असलेल्या भातकाढणी आणि ऊसलागणीला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे धान्यासह वैरणीचा प्रश्नही पुढील काळात गंभीर बनणार आहे.

साधारणपणे आॅक्टोबरमध्ये पडणारा परतीचा पाऊस पुढील रब्बी हंगामासाठी पूर्वमशागत आणि पेरणीसाठी उपयुक्त ठरत असतो. या महिन्यातील पावसामुळे वर्षभराची पाण्याची टंचाईही कमी होते; पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून हा पाऊसच काळ बनून आल्याची परिस्थिती आहे. संपूर्ण जून महिना ओढ देणारा पाऊस पुढे मात्र आॅक्टोबरपर्यंत लांबत चालला आहे. यामुळे शेतीचे वेळापत्रक बिघडून गेले आहे. पिकांची पेरणी आणि वाढ सुरू असताना पाऊस ओढ देतो; पण नेमका काढणी सुरू झाल्यावर मात्र तो ढग फुटल्यासारखा बरसत आहे.

यावर्षीदेखील १ आॅक्टोबरपासून सातत्याने पाऊस बरसत आहे. भात, सोयाबीन, भुईमुगाची काढणी सुरू असतानाच पावसाने थैमान घालत होत्याचे नव्हते करून सोडले आहे. महापुरामुळे आधीच नदीकाठासह सखल भागातील ऊस पूर्णपणे संपल्यात जमा आहे. जो काही तग धरून उभा होता, त्यातही आता गुडघ्याभरापेक्षाही जास्त पाणी साचले असल्याने ही शेती पूर्ण संपली आहे. महापूर ओसरल्यानंतर आडसाली आणि पूर्वहंगामी लागण हंगाम साधण्यासाठी घाईगडबडीने कांड्यासह रोपांची लागण केली; पण या रोपांमध्ये पाणी साचून ती कुजू लागली आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे जमिनी सपाट झाल्या असून त्याच्या मशागतीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रब्बीची पिके म्हणून हरभरा, शाळू आणि गव्हाची पेरणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होते. माडे आणि आंतरपीक अशा दोन्ही पद्धतींनी ही पिके घेतली जातात; पण पावसामुळे अजून भातकापण्याच खोळंबल्या आहेत. शिवारे तयार करायची म्हटली तरी नांगर घालणे अशक्य आहे. रिकाम्या ठेवलेल्या जमिनीही तणाने भरून गेल्या आहेत. त्याच्या मशागतीसाठी शेतात जाण्याचीही परिस्थिती राहिलेली नाही. ज्यांनी गडबडीने पेरणी केली आहे, त्यांचा हरभरा पीक पावसामुळे कुजू लागले आहे.

  • गेल्या २२ दिवसांत दोन हजार मिलिमीटर पाऊस

आॅक्टोबरमधील या २२ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल दोन हजार मिलिमीटर पाऊस झाला आहे. एका महिन्यात एवढा पाऊस पडण्याचा नवा विक्रम परतीच्या पावसाने केला आहे. आजअखेर ३४ हजार २१९ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे.

  • गळीत हंगामही लांबणीवर पडणार

मुळातच यावर्षी महापुरामुळे ऊस पीक ७० टक्क्यांपेक्षा अधिक उद्ध्वस्त झाल्याने कारखान्यांना गळितासाठी दर्जेदार ऊस मिळणे दुरापास्त होणार आहे. आता निवडणुका संपल्यानंतर गळीत हंगामाची तयारी सुरू करायची म्हटली तरी किमान एक महिना शेतात घात येणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यातच कारखान्यांचे धुराडे पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

  • ऊसरोपांना मागणीच नाही

रोपांद्वारे ऊसलागण करण्याला अलीकडे प्राधान्य दिले जात असल्याने रोपवाटिकांचा व्यवसाय तेजीत होता; पण पावसामुळे लागणीच थांबल्या असल्याने रोपांची मागणीही ठप्प झाली आहे. यात केलेली गुंतवणूकही अडचणीत आली आहे. 

अतिवृष्टी आणि महापुरामुळे खरिपातील पिके हातची गेली. त्यासाठी केलेला संपूर्ण खर्चही पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था बिकट बनली आहे. शेतकामांवर जगणाºया शेतमजुरांनाही काम नसल्याने घरखर्चाचा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे. गाई-म्हशीच्या दुधावर खर्च भागवायचा म्हटले तर वैरणीचा प्रश्न बिकट आहे. एकूणच, ग्रामीण अर्थकारणच विस्कटले आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी प्रत्यक्षात हातात रुपयाही पडला नसल्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी