शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

शिरोळमध्ये शेतीच्या पाण्याला ग्रहण

By admin | Updated: April 21, 2016 00:32 IST

भाजीपाल्याचे नियोजन कोलमडणार : वारणा, कृष्णा नदीत तीन टप्प्यांत उपसाबंदी

संदीप बावचे ल्ल शिरोळ‘पाऊस कमी; पण महापुराची हमी’ असलेल्या शिरोळ तालुक्यात पाणी उपसाबंदीमुळे बळिराजावर नवे संकट उभे राहिले आहे़ कृष्णा, वारणा नद्यांमुळे तालुक्यातील सुजलाम् सुफलाम् असलेल्या शेतीला आता दुष्काळाचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे़ येत्या २४ तारखेपासून पाणी उपशावर बंदीचे आदेश आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ सध्या कोयना व चांदोली धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने पाटबंधारे विभागाकडून बारा-बारा दिवसांच्या तीन टप्प्यांत शेतीसाठी व औद्योगिक वसाहतीसाठी पाणी उपशावर बंदी आली आहे़ त्यामुळे कृष्णा, वारणा काठावर असणाऱ्या गावांतील शेतीला त्याचा मोठा फटका बसणार आहे़ सध्या शेतकरी आहे ती पिके जगविण्याच्या प्रयत्नात असतानाच पाणी उपसाबंदीच्या आदेशाने तो अडचणीत सापडणार आहे़ धरणक्षेत्रातील साठा लक्षात घेऊन वारणा नदीच्या चांदोली धरण ते हरिपूर संगमापर्यंतच्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील भागात २४ ते २८ एप्रिल, ११ ते १५ मे, २८ मे ते १ जून या तीन टप्प्यांत पाच दिवसांप्रमाणे उपसाबंदी लावण्यात आली आहे़ तर उपसा कालावधी १२ ते २३ एप्रिल, २९ एप्रिल ते १० मे, १६ ते २७ मे अशा तीन टप्प्यांत १२ दिवस पाणी उपसा कालावधी दिला आहे़ त्यामुळे कृष्णा, वारणेच्या काठावरील पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडणार आहे़ सध्या नदीकाठावरील गावांत भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात आहे़ मात्र, या पाणी उपसाबंदीमुळे भाजीपाल्याच्या पिकात घट येणार आहे़ अशा परिस्थितीत इचलकरंजीच्या अमृत योजनेला दानोळी परिसरातील नागरिकांनी विरोध केला आहे़ मात्र, सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेता ही योजना अन्य ठिकाणी नेण्याची गरज निर्माण झाली आहे़ भविष्यात अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अमृत योजना गैरसोयीची बनणार आहे़ कोयना, चांदोली धरणांतील पाण्याचा अंदाज घेऊन हा उपसा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे़ मात्र, पिण्याच्या पाण्याला कोणतीही बंदी लावण्यात आलेली नाही़ कृ ष्णेचे पात्र कोरडेराजापूर बंधाऱ्याच्या पलीकडील कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने कर्नाटकातील सीमाभागासह काही गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ तर शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतातील उभी पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत़ दरम्यान, राजापूर बंधाऱ्यामुळे शिरोळ तालुक्याला पिण्यासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ तर म्हैसाळ योजना व लातूरचीही तहान राजापूर बंधाऱ्यामुळे भागत आहे़ टँकरची सोय कराशिरोळ तालुक्यातील चिपरी, निमशिरगाव, तमदलगे, जैनापूर, कोंडिग्रे, आदी गावांत वाढलेल्या उन्हामुळे कूपनलिका व विहिरींनी जानेवारी महिन्यातच तळ गाठला आहे़ त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून, टँकरची सोय करण्याची मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे़