शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
2
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
3
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
4
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
5
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
6
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
7
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
8
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
9
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
10
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
11
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
12
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
13
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
14
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
15
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
16
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
17
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
18
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
19
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड

शिरोळमध्ये शेतीच्या पाण्याला ग्रहण

By admin | Updated: April 21, 2016 00:32 IST

भाजीपाल्याचे नियोजन कोलमडणार : वारणा, कृष्णा नदीत तीन टप्प्यांत उपसाबंदी

संदीप बावचे ल्ल शिरोळ‘पाऊस कमी; पण महापुराची हमी’ असलेल्या शिरोळ तालुक्यात पाणी उपसाबंदीमुळे बळिराजावर नवे संकट उभे राहिले आहे़ कृष्णा, वारणा नद्यांमुळे तालुक्यातील सुजलाम् सुफलाम् असलेल्या शेतीला आता दुष्काळाचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे़ येत्या २४ तारखेपासून पाणी उपशावर बंदीचे आदेश आल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ सध्या कोयना व चांदोली धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने पाटबंधारे विभागाकडून बारा-बारा दिवसांच्या तीन टप्प्यांत शेतीसाठी व औद्योगिक वसाहतीसाठी पाणी उपशावर बंदी आली आहे़ त्यामुळे कृष्णा, वारणा काठावर असणाऱ्या गावांतील शेतीला त्याचा मोठा फटका बसणार आहे़ सध्या शेतकरी आहे ती पिके जगविण्याच्या प्रयत्नात असतानाच पाणी उपसाबंदीच्या आदेशाने तो अडचणीत सापडणार आहे़ धरणक्षेत्रातील साठा लक्षात घेऊन वारणा नदीच्या चांदोली धरण ते हरिपूर संगमापर्यंतच्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील भागात २४ ते २८ एप्रिल, ११ ते १५ मे, २८ मे ते १ जून या तीन टप्प्यांत पाच दिवसांप्रमाणे उपसाबंदी लावण्यात आली आहे़ तर उपसा कालावधी १२ ते २३ एप्रिल, २९ एप्रिल ते १० मे, १६ ते २७ मे अशा तीन टप्प्यांत १२ दिवस पाणी उपसा कालावधी दिला आहे़ त्यामुळे कृष्णा, वारणेच्या काठावरील पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडणार आहे़ सध्या नदीकाठावरील गावांत भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात आहे़ मात्र, या पाणी उपसाबंदीमुळे भाजीपाल्याच्या पिकात घट येणार आहे़ अशा परिस्थितीत इचलकरंजीच्या अमृत योजनेला दानोळी परिसरातील नागरिकांनी विरोध केला आहे़ मात्र, सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेता ही योजना अन्य ठिकाणी नेण्याची गरज निर्माण झाली आहे़ भविष्यात अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अमृत योजना गैरसोयीची बनणार आहे़ कोयना, चांदोली धरणांतील पाण्याचा अंदाज घेऊन हा उपसा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे़ मात्र, पिण्याच्या पाण्याला कोणतीही बंदी लावण्यात आलेली नाही़ कृ ष्णेचे पात्र कोरडेराजापूर बंधाऱ्याच्या पलीकडील कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने कर्नाटकातील सीमाभागासह काही गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ तर शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतातील उभी पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत़ दरम्यान, राजापूर बंधाऱ्यामुळे शिरोळ तालुक्याला पिण्यासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे़ तर म्हैसाळ योजना व लातूरचीही तहान राजापूर बंधाऱ्यामुळे भागत आहे़ टँकरची सोय कराशिरोळ तालुक्यातील चिपरी, निमशिरगाव, तमदलगे, जैनापूर, कोंडिग्रे, आदी गावांत वाढलेल्या उन्हामुळे कूपनलिका व विहिरींनी जानेवारी महिन्यातच तळ गाठला आहे़ त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून, टँकरची सोय करण्याची मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे़