शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

कृषी समिती थांबविणार ऊस उत्पादकांची लूट

By admin | Updated: November 17, 2015 00:45 IST

माणगाव ग्रामपंचायतीचा उपक्रम : अध्यक्षपदी राणोजी जोग, उपाध्यक्षपदी शिंगे

रुकडी : हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी गावातील बेकायदेशीर अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. तसेच गावात आता ऊस उत्पादकांची लूट थांबविण्यासाठी कृषी समितीची स्थापना करून चाप बसविण्याचा प्रयत्न केला आहे.ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन सत्तेवर आलेल्या काँग्रेसच्या आवाडे गटाने अश्विनी पाटील यांची सरपंचपदी, तर राजू मगदूम यांची उपसरपंचपदी निवड केली. उपसरपंच मगदूम यांनी गटातटाच्या राजकारणाला तिलांजली देऊन विकासाभिमुख राजकारणाला व कामाला सुरुवात केली.यामध्ये गावात झालेले अतिक्रमण काढून टाकले, तर गावठी दारू विक्री बंद पाडून कामाला सुरुवात केली. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला आहे. यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसतोड मजूर, ऊस वाहतूकदारांकडून लुबाडणूक केली जात असे. ऊसतोडी सुरू झाल्यानंतर मजुरांकडून शेतकऱ्याला जनावरांसाठी वाडे न देता चहापाणी, जेवण यासाठी पैसे मागणे, वाहतुकीसाठी पैसे उकळणे, वाहनधारकांकडून उसाचे वाहन ओढण्यासाठी ऊसमालकाला ट्रॅक्टर आणण्यास सांगणे अशा अनेक प्रकारे शेतकऱ्यांना त्रास देत. या तक्रारीकडे कारखान्याची यंत्रणादेखील दुर्लक्ष करीत आहे. ऊसतोडीबाबत कारखान्याने नियम केले आहेत; मात्र त्याची अंमलबजावणी होत नसे. या बाबीचा गांभीर्याने विचार करून राजू मगदूम यांनी ग्रामसभेत कृषी समितीची स्थापना केली व त्यासाठी कारखान्याच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यानुसार कृषी समितीने ऊसतोडी करणाऱ्या मजुरांनी ३०० फुटांपर्यंत विनामोबदला ऊस वाहतूक करून वाहन भरणे, वाहनधारकाला खुशीने १०० रुपये एंट्री देणे, वाहन अडकल्यास ते काढण्याची जबाबदारी वाहनमालकाची, शेतकऱ्याला वाडे देणे, मजुरांनी वाड्याची विक्री गावातच १० रुपये ते ४० रुपयांना करणे, अशी नियमावली केली आहे.या कृषी समितीच्या अध्यक्षपदी राणोजी जोग, तर उपाध्यक्षपदी नंदकुमार शिंगे यांची निवड केली आहे. (वार्ताहर)