शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

कृषी समिती थांबविणार ऊस उत्पादकांची लूट

By admin | Updated: November 17, 2015 00:45 IST

माणगाव ग्रामपंचायतीचा उपक्रम : अध्यक्षपदी राणोजी जोग, उपाध्यक्षपदी शिंगे

रुकडी : हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी गावातील बेकायदेशीर अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. तसेच गावात आता ऊस उत्पादकांची लूट थांबविण्यासाठी कृषी समितीची स्थापना करून चाप बसविण्याचा प्रयत्न केला आहे.ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन सत्तेवर आलेल्या काँग्रेसच्या आवाडे गटाने अश्विनी पाटील यांची सरपंचपदी, तर राजू मगदूम यांची उपसरपंचपदी निवड केली. उपसरपंच मगदूम यांनी गटातटाच्या राजकारणाला तिलांजली देऊन विकासाभिमुख राजकारणाला व कामाला सुरुवात केली.यामध्ये गावात झालेले अतिक्रमण काढून टाकले, तर गावठी दारू विक्री बंद पाडून कामाला सुरुवात केली. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला आहे. यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसतोड मजूर, ऊस वाहतूकदारांकडून लुबाडणूक केली जात असे. ऊसतोडी सुरू झाल्यानंतर मजुरांकडून शेतकऱ्याला जनावरांसाठी वाडे न देता चहापाणी, जेवण यासाठी पैसे मागणे, वाहतुकीसाठी पैसे उकळणे, वाहनधारकांकडून उसाचे वाहन ओढण्यासाठी ऊसमालकाला ट्रॅक्टर आणण्यास सांगणे अशा अनेक प्रकारे शेतकऱ्यांना त्रास देत. या तक्रारीकडे कारखान्याची यंत्रणादेखील दुर्लक्ष करीत आहे. ऊसतोडीबाबत कारखान्याने नियम केले आहेत; मात्र त्याची अंमलबजावणी होत नसे. या बाबीचा गांभीर्याने विचार करून राजू मगदूम यांनी ग्रामसभेत कृषी समितीची स्थापना केली व त्यासाठी कारखान्याच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यानुसार कृषी समितीने ऊसतोडी करणाऱ्या मजुरांनी ३०० फुटांपर्यंत विनामोबदला ऊस वाहतूक करून वाहन भरणे, वाहनधारकाला खुशीने १०० रुपये एंट्री देणे, वाहन अडकल्यास ते काढण्याची जबाबदारी वाहनमालकाची, शेतकऱ्याला वाडे देणे, मजुरांनी वाड्याची विक्री गावातच १० रुपये ते ४० रुपयांना करणे, अशी नियमावली केली आहे.या कृषी समितीच्या अध्यक्षपदी राणोजी जोग, तर उपाध्यक्षपदी नंदकुमार शिंगे यांची निवड केली आहे. (वार्ताहर)