शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

आंदोलकाला फटकारले

By admin | Updated: June 16, 2016 01:02 IST

जिल्हाधिकारी भडकले : इचलकरंजी दारू दुकान प्रश्न ; तीन तास यंत्रणा वेठीस

कोल्हापूर : इचलकरंजी येथील बावणे गल्लीतील दारूचे दुकान बंद करण्यासाठी आत्मदहनाचा इशारा दिलेले आंदोलक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विजय जाधव यांना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी बुधवारी चांगलेच फटकारले. ‘या गुन्हेगाराला येथे का आणलंत?’ अशी विचारणा त्यांनी ‘उत्पादन शुल्क’च्या अधिकाऱ्यांना केली. ‘तुम्हीच काही ते उत्तर द्या,’ असे सांगून काही मिनिटांतच ही चर्चा संपविली. अखेर ‘दुधाची तहान ताकावर’ या म्हणीनुसार उत्पादन शुल्कचे अधीक्षक राजेश कावळे यांचे लेखी पत्र स्वीकारत आंदोलन स्थगित करीत असल्याचे जाधव यांनी सांगितले; परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला ‘गुन्हेगार’ संबोधल्याबद्दल उद्या, गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा जाधव यांनी यावेळी दिला. या आत्मदहन नाट्यामुळे तब्बल तीन तास यंत्रणा वेठीस धरली गेली.या दुकानासंदर्भात सात दिवसांत कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते; परंतु ती मुदत १० जूनलाच संपली असून या कालावधीत कारवाई न झाल्यास बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू, असा इशारा विजय जाधव यांनी दिला होता. त्यानुसार जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत सकाळी ११ च्या सुमारास येथे आले. त्यांच्यासोबत इचलकरंजी येथील उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एल. एम. शिंदे, उपनिरीक्षक पी. एस. कोरे हेही आले होते. आत्मदहनाच्या इशाऱ्याने यंत्रणा सतर्क झाली होती. जाधव यांनी यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटून चर्चा करू, अशी भूमिका घेतल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची अडचण झाली; कारण जिल्हाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी हे व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये होते. त्याला वेळ लागणार असल्याने इतर अधिकाऱ्यांची भेट घालून देतो असे पोलिसांनी सांगितले; तरीही जाधव हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. दुपारी दोनच्या सुमारास त्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी भेट झाली. यावेळी कार्यवाहीबाबत यापूर्वी आंदोलक महिलांना आपण सांगितले असून त्याही सकारात्मक आहेत, असे असताना ‘प्रशासनाला वेठीस धरणाऱ्यांना वेगळं काय सांगायचं, असे सांगून ज्याच्यावर १८ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, तसेच बाटल्या फोडून प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या गुन्हेगाराला तुम्ही या ठिकाणी का आणलं?’ अशी विचारणा जिल्हाधिकाऱ्यांनी उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना केली. त्यामुळे ‘तुम्हीच काही ते उत्तर द्या,’ असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार अधीक्षक कावळे यांनी ‘दुकान बंद करण्याची कार्यवाही जलदगतीने सुरू असून या प्रकरणी जिल्हाधिकारी लवकरच सकारात्मक निर्णय घेतील,’ असे लेखी पत्र बाहेर येऊन आंदोलक विजय जाधव यांना दिले. त्यानंतर त्यांनी हे आंदोलन स्थगित केल्याचे पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)