शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

धरण क्षेत्रात पुन्हा दमदार वृष्टी

By admin | Updated: August 2, 2016 01:00 IST

नद्यांच्या पातळीत वाढ : रुई, खडक कोगे, राजाराम बंधाऱ्यावर पाणी; घराची पडझड

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. सकाळपासून पावसाचा जोर काहीसा वाढला होता. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी तालुक्यांत दमदार पाऊस झाला. धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी दीड फुटांनी वाढली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून पावसाने जोर धरला. रविवारच्या तुलनेत पावसात वाढ झाली असून, सोमवारी मध्यरात्रीपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. शहरातही अधून-मधून उघडीप देत दमदार पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळाले. पावसाला कमालीचा गारठा असून सकाळपासूनच अंगाला थंडी बोचत होती. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ११.१८ मि.मी., तर सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ४२.५० मि.मी. पावसाची नोंद झाली. राधानगरी धरण क्षेत्रात ३४, कासारी ७५, कडवी ७४, कुंभी ५५, पाटगाव ५५ तर कोदे लघु पाटबंधारे विभागात तब्बल ६५ मि.मी. पाऊस झाला. पाऊस सुरू झाल्याने धरणातील विसर्ग वाढविण्यात आला आहे. पंचगंगा पातळीत रविवारच्या तुलनेत तब्बल दीड फुटांनी वाढ झाली असून सध्या १३.२० फुटांपर्यंत पाणी आहे. कसबा बावडा येथील राजाराम, रुई, इचलकरंजीबरोबर खडक कोगे या बंधाऱ्यावर पाणी आले असून, या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. सोमवारी दिवसभरात एका घराची पडझड होऊन पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे. ‘पुष्य’ नक्षत्रातील १३ दिवस कोरडे गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. या नक्षत्रातील पाऊस शेतीसाठी उपयुक्त असतो, पण नक्षत्रातील बहुतांशी काळात दमदार पाऊस झाला नाही. आज, मंगळवारी रात्री ९ वाजून २ मिनिटांनी सूर्य ‘आश्लेषा’ नक्षत्रात प्रवेश करीत आहे. वाहन ‘हत्ती’ आहे. या काळात जोरदार पर्जन्यवृष्टी होईल, असा अंदाज आहे. गगनबावडा परिसरात पाऊससाळवण : शहर व जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाचा जोर जरी कमी असला तरी, कोकण माथ्यावरच्या करूळ, गगनबावडा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळ्ी बरोबर कुं भी, सरस्वती व धामणी नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ होत आहे. नेहमी तालुक्यात मुसळधार पडणाऱ्या पावसाचा जोर कमी असून, रिपरिप पाऊस असणाऱ्या पावसात शेतकरी शेती कामात मग्न आहे. सततच्या रिपरिपीमुळे गेले दोन दिवस सूर्यानेही आपले दर्शन दिले नाही. त्यामुळे हवेत चांगलाच गारवा जाणवतो.राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोरराधानगरी : राधानगरी परिसरात सोमवारी पावसाचा जोर वाढला. परिणामी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरणातून जल विद्युतनिर्मिती केंद्राद्वारे होणारा पाण्याचा विसर्ग वाढविला आहे. सोमवारी दुपारी चार वाजता या धरणाची पाणीपातळी ३४४.७३ फूट झाली असून, ३४७.५० फूट पातळी झाल्यावर धरण पूर्ण भरते. सध्याचा पावसाचा जोर असाच राहिल्यास दोन दिवसांत धरण भरण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी आठपर्यंत चोवीस तासांत येथे ३४ मि. मी. व एकूण २२७० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.