शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

संचारबंदीमुळे शहरात दुपारनंतर शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:25 IST

कोल्हापूर : शहरात लागू असलेली संचारबंदी आणि दिवसभर कडाक्याचे ऊन यामुळे दुपारनंतर शहरातील वर्दळ कमी झाली. अत्यावश्यक सेवा वगळता ...

कोल्हापूर : शहरात लागू असलेली संचारबंदी आणि दिवसभर कडाक्याचे ऊन यामुळे दुपारनंतर शहरातील वर्दळ कमी झाली. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना बंद होत्या. त्यामुळे शहरात दुपारपासून शांतता निर्माण झाली. रस्ते काहीसे ओस पडल्याचे दिसले.

नेहमीप्रमाणे सकाळी भाजीपाल्यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक पिशव्या हातात घेऊन बाहेर पडले. तेव्हा अनेक ठिकाणी महापालिकेची पथके रॅपिड ॲन्टिजेन चाचणी करत असल्याचे लक्षात येताच अनेकांनी अन्य पर्यायी रस्त्याने जाणेच पसंद केली. भाजी मंडईतून गेल्या चार दिवसांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने भाजी मंडईतील वर्दळ कमी दिसली. मंडईतसुध्दा भाजी विक्रेत्यांमार्फत सोशल डिस्टन्स राखून भाजी विक्री केली जात असल्याचे पाहायला मिळाले.

चारचाकीसह दुचाकी वाहनधारकांची वर्दळ मात्र सुरूच होती. पोलीस, महापालिकेची पथके त्यांना अडवून येण्या-जाण्याची कारणे विचारत होती. विनामास्क फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करत होती. काही ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य काही दुकाने अर्धी शटर उघडून व्यवसाय करत होते.

फोटो क्रमांक - २००४२०२१-कोल-संचारबंदी

ओळ - कोल्हापुरातील गुजरी बाजार पेठेतील दुकाने मंगळवारी संचारबंदीमुळे पूर्णत: बंद राहिली. बाजार व तेथील रस्ते ओस पडले. छाया : नसीर अत्तार