शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

तीन वर्षांनंतरही पानसरेंचे खुनी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:58 IST

उत्तूर : समाजातील अंधश्रद्धा कमी करण्यासाठी झटणारे, शोषितांचे प्रश्न सोडवणारे डॉ. गोविंद पानसरे यांचा गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला. तीन वर्षे झाली तरी अद्याप मारेकरी सापडत नाहीत. अच्छे दिन म्हणणे व प्रत्यक्षात ते आणणे यात खूप फरक आहे. सरकार स्वत: काय देणार नसेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. आर-पारच्या लढाईस ...

उत्तूर : समाजातील अंधश्रद्धा कमी करण्यासाठी झटणारे, शोषितांचे प्रश्न सोडवणारे डॉ. गोविंद पानसरे यांचा गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला. तीन वर्षे झाली तरी अद्याप मारेकरी सापडत नाहीत. अच्छे दिन म्हणणे व प्रत्यक्षात ते आणणे यात खूप फरक आहे. सरकार स्वत: काय देणार नसेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. आर-पारच्या लढाईस सज्ज रहा, असे आवाहन महिला चळवळीच्या नेत्या डॉ. मेघा पानसरे यांनी केले.उत्तूर (ता. आजरा) येथे आजरा, भुदरगड तालुक्यातील देवदासी, तृतीयपंथी, वाघ्या-मुरळी व शोषित महिला यांच्या निर्धार मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनंतराव आजगावकर होते. डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन डॉ. पानसरे यांच्या हस्ते झाले.पानसरे म्हणाल्या, आंदोलनाशिवाय सरकार जागे होत नाही. सरकारला सर्वसामान्य जनतेचे दु:ख, कष्ट दिसत नाही. या सरकारला मायबाप कसे म्हणणार. लहान-सहान गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत आहे. सरकार हे बड्या उद्योगपतींसाठी काम करते की काय, अशी शंका आहे. आम्हाला सन्मानाने जगण्यासाठी आमच्या मागण्या पूर्ण करा. कष्टकरी जनतेच्या पैशावर हे सरकार आहे. या सरकारला जागे करण्यासाठी आपण सर्वसामान्य जनतेसोबतच राहू.यावेळी देवदासी निराधार मुक्ती केंद्राचे उपाध्यक्ष चंद्रकांत तेलवेकर, सचिव बापूसाहेब म्हेत्री, नामदेव कांबळे, सरपंच वैशाली आपटे, देशभूषण देशमाने, आजऱ्याच्या नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी, प्रा. राजा शिरगुप्पे, अनंतराव आजगावकर यांची भाषणे झाली. आप्पासाहेब कांबळे यांनी आभार मानले. प्रा. सुभाष कोरी यांनी सूत्रसंचालन केले.याप्रसंगी उपसरपंच सचिन उत्तूरकर, उपसभापती शिरीष देसाई, सदानंद व्हनबट्टे, महेश करंबळी, सुधीर जाधव, दीपक कांबळे, आप्पा कांबळे, सूरज कांबळे, मंगल कांबळे, रमेश नाईक, नामदेव कांबळे, नगरसेवक उदय कदम, बाबूराव धबाले, सूरज पुजारी, रवी कामत, महेंद्र कामत आदींसह देवदासी, तृतीयपंथी, वाघ्या-मुरळी, शोषित महिला मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध मागण्यांचा ठराव मेळाव्यात करण्यात येऊन धडक मोर्चास सहभागी होण्याचे ठरले.