शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

तीन वर्षांनंतरही पानसरेंचे खुनी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:58 IST

उत्तूर : समाजातील अंधश्रद्धा कमी करण्यासाठी झटणारे, शोषितांचे प्रश्न सोडवणारे डॉ. गोविंद पानसरे यांचा गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला. तीन वर्षे झाली तरी अद्याप मारेकरी सापडत नाहीत. अच्छे दिन म्हणणे व प्रत्यक्षात ते आणणे यात खूप फरक आहे. सरकार स्वत: काय देणार नसेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. आर-पारच्या लढाईस ...

उत्तूर : समाजातील अंधश्रद्धा कमी करण्यासाठी झटणारे, शोषितांचे प्रश्न सोडवणारे डॉ. गोविंद पानसरे यांचा गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला. तीन वर्षे झाली तरी अद्याप मारेकरी सापडत नाहीत. अच्छे दिन म्हणणे व प्रत्यक्षात ते आणणे यात खूप फरक आहे. सरकार स्वत: काय देणार नसेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. आर-पारच्या लढाईस सज्ज रहा, असे आवाहन महिला चळवळीच्या नेत्या डॉ. मेघा पानसरे यांनी केले.उत्तूर (ता. आजरा) येथे आजरा, भुदरगड तालुक्यातील देवदासी, तृतीयपंथी, वाघ्या-मुरळी व शोषित महिला यांच्या निर्धार मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनंतराव आजगावकर होते. डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन डॉ. पानसरे यांच्या हस्ते झाले.पानसरे म्हणाल्या, आंदोलनाशिवाय सरकार जागे होत नाही. सरकारला सर्वसामान्य जनतेचे दु:ख, कष्ट दिसत नाही. या सरकारला मायबाप कसे म्हणणार. लहान-सहान गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत आहे. सरकार हे बड्या उद्योगपतींसाठी काम करते की काय, अशी शंका आहे. आम्हाला सन्मानाने जगण्यासाठी आमच्या मागण्या पूर्ण करा. कष्टकरी जनतेच्या पैशावर हे सरकार आहे. या सरकारला जागे करण्यासाठी आपण सर्वसामान्य जनतेसोबतच राहू.यावेळी देवदासी निराधार मुक्ती केंद्राचे उपाध्यक्ष चंद्रकांत तेलवेकर, सचिव बापूसाहेब म्हेत्री, नामदेव कांबळे, सरपंच वैशाली आपटे, देशभूषण देशमाने, आजऱ्याच्या नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी, प्रा. राजा शिरगुप्पे, अनंतराव आजगावकर यांची भाषणे झाली. आप्पासाहेब कांबळे यांनी आभार मानले. प्रा. सुभाष कोरी यांनी सूत्रसंचालन केले.याप्रसंगी उपसरपंच सचिन उत्तूरकर, उपसभापती शिरीष देसाई, सदानंद व्हनबट्टे, महेश करंबळी, सुधीर जाधव, दीपक कांबळे, आप्पा कांबळे, सूरज कांबळे, मंगल कांबळे, रमेश नाईक, नामदेव कांबळे, नगरसेवक उदय कदम, बाबूराव धबाले, सूरज पुजारी, रवी कामत, महेंद्र कामत आदींसह देवदासी, तृतीयपंथी, वाघ्या-मुरळी, शोषित महिला मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध मागण्यांचा ठराव मेळाव्यात करण्यात येऊन धडक मोर्चास सहभागी होण्याचे ठरले.