शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीनशे वर्षांनंतर दृष्टीस पडला सतीचा खांब

By admin | Updated: May 22, 2015 00:09 IST

भेडसगावातील भवानी तलाव : ऐतिहासिक वारसा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांची वर्दळ

बाबासाहेब कदम - वारणा कापशी -भेडसगाव (ता. शाहूवाडी) येथील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या भवानी तलावातील गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, गाळ काढताना तलावातील सतीचा खांब उघडा झाल्याने गावातील पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या चिमुकल्या बाळासह स्वत:चे बलिदान देणाऱ्या लक्ष्मीबाई पाटील या पाटलांच्या सुनेच्या इतिहासाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.सुमारे ३५० वर्षांनंतर उघडा झालेला तलावाच्या मध्यभागी असणारा दहा फूट उंचीचा खांब आणि तलावातील पाणी सोडण्यासाठी दूरगामी विचार करून बांधलेला चेंबर पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांची वर्दळ वाढत आहे.सुमारे ३५० वर्षांपूर्वी भेडसगाव येथील ग्रामस्थांना दुष्काळी स्थितीमुळे पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला. त्यामुळे चिमाजी पाटील यांनी ग्रामदैवत नीलकंठेश्वराच्या समोर गावसभा बोलावली. यावेळी श्रमदानातून सुमारे पाच एकरात तलाव खोदण्याचे ठरले. तलाव खोदला परंतु, पाण्याचा प्रश्न मात्र सुटला नाही. मात्र, ग्रामदैवताने दिलेल्या दृष्टांतानुसार गावातील सामान्य कुटुंबातील स्त्रीवर अन्याय होऊ नये म्हणून लक्ष्मीबाई पाटील या पाटलांच्या सुनेने आपल्या चिमुकल्यासह सती जाण्याचा निर्णय घेतला होता.तलावाच्या निर्मितीनंतर केवळ दोनवेळा या तलावातील गाळ काढण्याचा प्रयत्न नियोजनाअभावी पूर्ण झाला नाही. दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील यांनी तेराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून सुमारे दहा लाखांचा निधी मंजूर करून दोन महिन्यांपासून तलावातील गाळ काढण्याचे काम चालू ठेवले आहे. गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना तलावाच्या मध्यभागी असणारा दगडी चबुतऱ्याच्या बांधकामातील सुमारे दहा फूट उंचीचा लाकडी खांब मात्र आजदेखील सुस्थितीत आहे. पाटलांच्या सुनेचे बलिदानाचे प्रतीक म्हणून असलेला हा सतीचा खांब पुन्हा चर्चेत आला आहे. ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांनी १९९० मध्ये याच विषयावर ‘अंगाई’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. वैशिष्ट्यपूर्ण दगडी चेंबरतलावातील संपूर्ण पाणी बाहेर काढण्यासाठी २७ छिद्रे व १२ फूट उंची असलेला दगडी बांधकामाचा वैशिष्ट्यपूर्ण चेंबर येथे पहावयास मिळतो. गाळ काढताना उघडा झालेला हा दगडी चेंबर आणि सतीचा खांब पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांची वर्दळ मात्र वाढत आहे.तलावाच्या मध्यभागी असलेल्या सतीच्या खांबामुळे भेडसगाव येथील भवानी तलावाचे ऐतिहासिक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. नियोजनबद्ध प्रयत्नामुळे तलावातील गाळ काढण्याचे कठीण काम पूर्ण झाले आहे. भविष्यात या तलावाला गतवैभव प्राप्त होणार आहे.- चंद्रकुमार नलगे, ज्येष्ठ साहित्यिक