शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

मंत्र्यांच्या तंबीनंतर यंत्रणा लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:44 IST

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याबद्दल कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त व इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिल्यानंतर मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची यंत्रणा कामाला लागली. त्यांनी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी केली व इचलकरंजीतील प्रदूषण करणाऱ्या घटकांचे सर्वेक्षण सुरू केले.महापालिकेच्या ...

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याबद्दल कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त व इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिल्यानंतर मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची यंत्रणा कामाला लागली. त्यांनी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी केली व इचलकरंजीतील प्रदूषण करणाऱ्या घटकांचे सर्वेक्षण सुरू केले.महापालिकेच्या १७ एमएलडी क्षमतेचे दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्ण झाले असले तरी ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. त्यामध्ये किमान चार टँकर पाणी व जैविक कल्चर सोडण्याची गरज आहे. ती व्यवस्था झालेली नाही. या कामाची पाहणी व प्रत्यक्ष पंचनामा करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तिथे गेले होते; परंतु तिथे महापालिकेचे कुणी अधिकारी बोलावूनही आले नसल्याने ही कार्यवाही झाली नाही. आम्ही अगोदर महापालिकेकडून योग्य ती कार्यवाही व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत. ती न झाल्यास कारवाई केली जाईल, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. प्रादेशिक अधिकाºयांना फोन केल्यावर त्यांच्याकडे कार्यवाही अथवा कारवाईचे कोणतेच अपडेट्स नव्हते. याबाबत आज, बुधवारी मी माहिती घेऊन आपल्याला सांगतो, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, थेट पर्यावरण मंत्र्यांनी आदेश देऊनही पंचगंगा प्रदूषणाबाबत महापालिका प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप व तशी लेखी तक्रार प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सायंकाळी केली. यापूर्वी या प्रदूषणाबाबत उच्च न्यायालय, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी आणि आता थेट मंत्र्यांनी आदेश देऊनही महापालिका मात्र प्रदूषणाबाबत फारशी गंभीर नसल्याचा आरोप देसाई यांनी या तक्रारीत केला आहे.दोषी प्रोसेसर्सबंद करणारइचलकरंजीतील प्रोसेसर्सच्या सांडपाण्यावर योग्य ती प्रक्रिया पार पडते की नाही याची तपासणी करण्याबरोबरच दोषी कारखाने बंद करण्यात येतील, असा इशारा मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी दिला.