शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

मंत्र्यांच्या तंबीनंतर यंत्रणा लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:44 IST

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याबद्दल कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त व इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिल्यानंतर मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची यंत्रणा कामाला लागली. त्यांनी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी केली व इचलकरंजीतील प्रदूषण करणाऱ्या घटकांचे सर्वेक्षण सुरू केले.महापालिकेच्या ...

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याबद्दल कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त व इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिल्यानंतर मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची यंत्रणा कामाला लागली. त्यांनी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी केली व इचलकरंजीतील प्रदूषण करणाऱ्या घटकांचे सर्वेक्षण सुरू केले.महापालिकेच्या १७ एमएलडी क्षमतेचे दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्ण झाले असले तरी ते अद्याप कार्यान्वित झालेले नाही. त्यामध्ये किमान चार टँकर पाणी व जैविक कल्चर सोडण्याची गरज आहे. ती व्यवस्था झालेली नाही. या कामाची पाहणी व प्रत्यक्ष पंचनामा करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तिथे गेले होते; परंतु तिथे महापालिकेचे कुणी अधिकारी बोलावूनही आले नसल्याने ही कार्यवाही झाली नाही. आम्ही अगोदर महापालिकेकडून योग्य ती कार्यवाही व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत. ती न झाल्यास कारवाई केली जाईल, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. प्रादेशिक अधिकाºयांना फोन केल्यावर त्यांच्याकडे कार्यवाही अथवा कारवाईचे कोणतेच अपडेट्स नव्हते. याबाबत आज, बुधवारी मी माहिती घेऊन आपल्याला सांगतो, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, थेट पर्यावरण मंत्र्यांनी आदेश देऊनही पंचगंगा प्रदूषणाबाबत महापालिका प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप व तशी लेखी तक्रार प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सायंकाळी केली. यापूर्वी या प्रदूषणाबाबत उच्च न्यायालय, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी आणि आता थेट मंत्र्यांनी आदेश देऊनही महापालिका मात्र प्रदूषणाबाबत फारशी गंभीर नसल्याचा आरोप देसाई यांनी या तक्रारीत केला आहे.दोषी प्रोसेसर्सबंद करणारइचलकरंजीतील प्रोसेसर्सच्या सांडपाण्यावर योग्य ती प्रक्रिया पार पडते की नाही याची तपासणी करण्याबरोबरच दोषी कारखाने बंद करण्यात येतील, असा इशारा मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी दिला.