शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चरणस्पर्शानंतर सूर्यकिरणे लुप्त

By admin | Updated: February 3, 2016 00:48 IST

अंबाबाई किरणोत्सव : अंतिम दिवशीही अडथळे कायम; भाविकांची निराशा

कोल्हापूर : किरणोत्सव मार्गातील अडथळे काढण्याकडे महापालिकेने गांभीर्याने न पाहिल्याने मंगळवारी, तिसऱ्या व अंतिम दिवशी सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटांपर्यंत सूर्यकिरणे अंबाबाई देवीचा चरणस्पर्श करून पुढे लुप्त झाल्याने भाविकांना काही प्रमाणातच किरणोत्सव सोहळ्याचा लाभ मिळाला. गेले तीन दिवस सुरू असलेला हा किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. अंतिम दिवशी सूर्यकिरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा होती; पण एका जाहिरातीच्या फलकाच्या अडथळ्यामुळे ही सूर्यकिरणे देवीचा चरणस्पर्श करून किंचितशी वर सरकली. रविवार (दि. ३१ जानेवारी) पासून या किरणोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सूर्यकिरणांनी देवीला चरणस्पर्श केला होता. दुसऱ्या दिवशी (सोमवारी) ढगाळ वातावरणामुळे ही सूर्यकिरणे मंदिराच्या पश्चिम दरवाजातून आत येऊन फक्त गरुड मंडपापर्यंतच पोहोचली. त्यानंतर किरणोत्सव झाला नाही. मंगळवारी, तिसऱ्या दिवशी सूर्योदय सकाळी ७.०५ वाजता आणि सूर्यास्त सायंकाळी ६.२९ वाजता होता. हवेत ३५ टक्के आर्द्रता असल्याने सूर्यकिरणे श्री अंबाबाई देवीच्या कमरेपर्यंत पोहोचतील, अशी शक्यता खगोल अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर व प्रा. किशोर हिरासकर यांनी व्यक्त केली होती; पण सूर्यकिरणांच्या मार्गात अनेक अडथळे आल्याने सायंकाळी ६.०४ मिनिटांनी मंदिराच्या पितळी उंबरठ्यापर्यंत आलेली सूर्यकिरणे ६.१४ ते ६.१८ वाजेपर्यंत देवीच्या मूर्तीस चरणस्पर्श करीत किंचित वर सरकत लुप्त झाली. यावेळी देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, सदस्या संगीता खाडे, के. आय. टी. कॉलेजचे प्राध्यापक, विवेकानंद कॉलेजचे विद्यार्थी, आदी उपस्थित होते. मंदिरात सूर्यकिरणांन प्रवेश केल्यानंतर ती पुढे सरकत असताना भाविकांतून ‘अंबा माता की जय’चा गजर उत्स्फूर्तपणे होत होता. सायंकाळी किरणांचा प्रवास ४सायंकाळी ५.१५ वा. - महाद्वार रोड ४५.३० वा. - गरुड मंडप ४५.३९ वा. - गणपती मंदिरामागे ४५.४८ वा. - कासव चौक ४६.०४ वा. - पितळी उंबरठा ४६.०९ वा. - पहिली पायरी ४६.१० वा. - दुसरी पायरी ४६.१४ वा. - तिसरी पायरी ४६.१५ ते ६.१८ वाजेपर्यंत चरणस्पर्श ते किंचितशी वर सरकली अडथळे दूर करण्यात अपयश या किरणोत्सव मार्गात महाद्वार रोडवरील रोमॅँटिक या कापड दुकानाच्या जाहिरातीच्या फलकाचा अडथळा येत असल्याचे तज्ज्ञांचे मत होते. हा फलक लोकभावना म्हणून किरणोत्सवात तीन दिवस काढावा, याबाबत देवस्थान समितीने महापालिकेला कळविले होते; पण अखेरच्या दिवशीही तो काढलाच गेला नाही; अगर तो काढण्याबाबत महापालिकेने कोणतेही प्रयत्न केलेले नसल्याचे दिसून आले. किरणोत्सव सोहळ्याच्या अंतिम दिवसावेळी महापालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नसल्याने भाविकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. हा फलक काढला असता तर किरणोत्सव आणखी किमान दीड मिनिट जादा वेळ होऊन सूर्यकिरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली असती, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. किरणोत्सव सोहळ्यात फक्त चर्चाच; पुन्हा... वर्षातून दोनवेळा हा श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा होतो. त्यापूर्वी तज्ज्ञांद्वारे किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांचा अभ्यास केला जातो. अडथळ्यांबाबत महानगरपालिकेला कळविले जाते; पण प्रत्यक्षात हे अडथळे दूर करण्याबाबत महापालिकेत उदासीनता दिसून येते. सोहळ्याचे तीन दिवस संपले की चर्चा संपते. ती पुन्हा पुढील किरणोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा सुरू होते, असे अलीकडे दिसून येत आहे.