शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

चरणस्पर्शानंतर सूर्यकिरणे लुप्त

By admin | Updated: February 3, 2016 00:48 IST

अंबाबाई किरणोत्सव : अंतिम दिवशीही अडथळे कायम; भाविकांची निराशा

कोल्हापूर : किरणोत्सव मार्गातील अडथळे काढण्याकडे महापालिकेने गांभीर्याने न पाहिल्याने मंगळवारी, तिसऱ्या व अंतिम दिवशी सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटांपर्यंत सूर्यकिरणे अंबाबाई देवीचा चरणस्पर्श करून पुढे लुप्त झाल्याने भाविकांना काही प्रमाणातच किरणोत्सव सोहळ्याचा लाभ मिळाला. गेले तीन दिवस सुरू असलेला हा किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. अंतिम दिवशी सूर्यकिरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा होती; पण एका जाहिरातीच्या फलकाच्या अडथळ्यामुळे ही सूर्यकिरणे देवीचा चरणस्पर्श करून किंचितशी वर सरकली. रविवार (दि. ३१ जानेवारी) पासून या किरणोत्सव सोहळ्याला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सूर्यकिरणांनी देवीला चरणस्पर्श केला होता. दुसऱ्या दिवशी (सोमवारी) ढगाळ वातावरणामुळे ही सूर्यकिरणे मंदिराच्या पश्चिम दरवाजातून आत येऊन फक्त गरुड मंडपापर्यंतच पोहोचली. त्यानंतर किरणोत्सव झाला नाही. मंगळवारी, तिसऱ्या दिवशी सूर्योदय सकाळी ७.०५ वाजता आणि सूर्यास्त सायंकाळी ६.२९ वाजता होता. हवेत ३५ टक्के आर्द्रता असल्याने सूर्यकिरणे श्री अंबाबाई देवीच्या कमरेपर्यंत पोहोचतील, अशी शक्यता खगोल अभ्यासक डॉ. मिलिंद कारंजकर व प्रा. किशोर हिरासकर यांनी व्यक्त केली होती; पण सूर्यकिरणांच्या मार्गात अनेक अडथळे आल्याने सायंकाळी ६.०४ मिनिटांनी मंदिराच्या पितळी उंबरठ्यापर्यंत आलेली सूर्यकिरणे ६.१४ ते ६.१८ वाजेपर्यंत देवीच्या मूर्तीस चरणस्पर्श करीत किंचित वर सरकत लुप्त झाली. यावेळी देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, सदस्या संगीता खाडे, के. आय. टी. कॉलेजचे प्राध्यापक, विवेकानंद कॉलेजचे विद्यार्थी, आदी उपस्थित होते. मंदिरात सूर्यकिरणांन प्रवेश केल्यानंतर ती पुढे सरकत असताना भाविकांतून ‘अंबा माता की जय’चा गजर उत्स्फूर्तपणे होत होता. सायंकाळी किरणांचा प्रवास ४सायंकाळी ५.१५ वा. - महाद्वार रोड ४५.३० वा. - गरुड मंडप ४५.३९ वा. - गणपती मंदिरामागे ४५.४८ वा. - कासव चौक ४६.०४ वा. - पितळी उंबरठा ४६.०९ वा. - पहिली पायरी ४६.१० वा. - दुसरी पायरी ४६.१४ वा. - तिसरी पायरी ४६.१५ ते ६.१८ वाजेपर्यंत चरणस्पर्श ते किंचितशी वर सरकली अडथळे दूर करण्यात अपयश या किरणोत्सव मार्गात महाद्वार रोडवरील रोमॅँटिक या कापड दुकानाच्या जाहिरातीच्या फलकाचा अडथळा येत असल्याचे तज्ज्ञांचे मत होते. हा फलक लोकभावना म्हणून किरणोत्सवात तीन दिवस काढावा, याबाबत देवस्थान समितीने महापालिकेला कळविले होते; पण अखेरच्या दिवशीही तो काढलाच गेला नाही; अगर तो काढण्याबाबत महापालिकेने कोणतेही प्रयत्न केलेले नसल्याचे दिसून आले. किरणोत्सव सोहळ्याच्या अंतिम दिवसावेळी महापालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नसल्याने भाविकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. हा फलक काढला असता तर किरणोत्सव आणखी किमान दीड मिनिट जादा वेळ होऊन सूर्यकिरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहोचली असती, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. किरणोत्सव सोहळ्यात फक्त चर्चाच; पुन्हा... वर्षातून दोनवेळा हा श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळा होतो. त्यापूर्वी तज्ज्ञांद्वारे किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांचा अभ्यास केला जातो. अडथळ्यांबाबत महानगरपालिकेला कळविले जाते; पण प्रत्यक्षात हे अडथळे दूर करण्याबाबत महापालिकेत उदासीनता दिसून येते. सोहळ्याचे तीन दिवस संपले की चर्चा संपते. ती पुन्हा पुढील किरणोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा सुरू होते, असे अलीकडे दिसून येत आहे.