शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

स्टार ८३१ अनलॉकनंतर भाजीपाला ३० टक्क्यांनी महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाल्यानंतर कोल्हापुरात लॉकडाऊनचे निर्बंध काहीसे शिथिल केले आहेत. ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाल्यानंतर कोल्हापुरात लॉकडाऊनचे निर्बंध काहीसे शिथिल केले आहेत. त्यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढली असून त्याचा परिणाम दरावर झाला आहे. भाजीपाल्याच्या दरात सुमारे ३० टक्के वाढ झाली आहे. शेवगा शेंग, कोबी, ओली मिरची, गवार, कारली, दोडका या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाल्याची खरेदी-विक्री सुरू असली तरी त्याचा उठाव होत नव्हता. लग्नसमारंभ, हॉटेल बंद राहिल्याने भाजीपाल्याच्या विक्रीवर परिणाम झाला. त्यामुळे कोल्हापूर बाजार समितीत रोज ६०० क्विंटल भाजीपाला शिल्लक राहत होता. मात्र आता कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने प्रशासनाने निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. मात्र खरीप पेरणीमुळे स्थानिक भाजीपाल्याची आवक कमी झाली, त्याचबरोबर गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात पावसाने झोडपून काढले. त्यामुळेही आवकेवर परिणाम झाला. आवक कमी आणि मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. कोबी, ओली मिरची, गवार, कारली, दोडका, काकडी, वाल, फ्लाॅवर, कोथिंबीर, शेवगा शेंग, मेथीच्या दरात १५ पासून ७२ टक्क्यांपर्यंत वाढ झालेली आहे.

वांगी, टोमॅटो, ढब्बू स्थिर

वांगी, टोमॅटो, ढब्बू, घेवडा, भेंडी, वरणा, गाजरचे दर इतर भाज्यांच्या दराएवढेच आहेत. मात्र गेल्या आठवड्याच्या तुलनेत ते स्थिर दिसत आहेत.

तुलनात्मक भाजीपाल्याचे दर रुपयात (प्रतिकिलो)

भाजीपाला २ जून २२ जून

कोबी ५.५० ७.५०

ओली मिरची १५ १७.५०

गवार ४० ५०

कारली ३० ४०

दोडका २५ ३२

काकडी १२.५० २२.५०

वाल ४५ ६५

शेवगा शेंग २५ ४२.५०

मेथी १० (पेंढी) १२ (पेंढी)

कोथिंबीर ६.५० (पेंढी) ८.५० (पेंढी)

कोट-

भाजीपाल्याचे दर वाढलेला दिसतो. मात्र प्रत्यक्षात त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. प्रत्यक्ष माल विक्रीसाठी गेल्यानंतर व्यापारी आपल्या हिशेबानेच खरेदी करत असल्याने भाव वाढला हे फक्त ऐकायला मिळते.

- मारुती पाटील (शेतकरी, वंदूर)

एकीकडे सततच्या लॉकडाऊनमुळे कामे नाहीत, आणि दुसरीकडे भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने आमचे बजेट कोलमडले आहे.

- सोनाली शेळके (गृहिणी, पाचगाव)

लॉकडाऊनमुळे भाजीपाल्याचा उठाव नसल्याने दर कमी होते, आता मार्केट काहीसे नियमित झाल्याने उठाव होत आहे. त्यामुळे दरात थोडी वाढ झाली आहे.

- सलीम बागवान (भाजीपाला व्यापारी, शाहू मार्केट यार्ड)

पावसामुळे भाज्यांच्या आवकेवर काहीसा परिणाम झाला आणि त्यात मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. कडक दरामुळे शेतकऱ्यांकडून घ्यायचे कसे आणि त्याची विक्री करायची कशी, असा प्रश्न आमच्यासमोर आहे.

- भारत मोहिते (भाजीपाला व्यापारी)