शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

छाननीत बाद होता-होता आबा वाचले!

By admin | Updated: September 30, 2014 00:16 IST

उमेदवारी अर्ज वैध : अजितराव घोरपडे यांनी केली होती तक्रार

तासगाव : गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) आज, सोमवारी छाननीत बाद होता-होता वाचले. त्यांचा राष्ट्रवादीकडून दाखल केलेला उमेदवारी अर्ज बाद करण्यात यावा, असा आक्षेप माजीमंत्री व भाजपचे उमेदवार अजितराव घोरपडे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदविल्यानंतर मतदारसंघासह राज्यात खळबळ उडाली. बेळगावात सीमाप्रश्नी केलेल्या भाषणावरून तेथील पोलीस ठाण्यात पाटील यांच्याविरुद्ध तक्रार नोंद असून, ती माहिती उमेदवारी अर्जात दिली नसल्याचा दावा घोरपडे यांनी केला होता. तथापि, निवडणूक आयोगाची कार्य पुस्तिका, भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या तरतुदी व सर्वोच्च न्यायालयाचे आदेश यांचा अभ्यास करून पाटंील यांचा अर्ज वैध ठरविल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांनी दिली. बेळगावात सीमाप्रश्नी मराठी भाषिकांच्या कार्यक्रमात पाटील यांनी भाषण केले होते. त्यानंतर त्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याची तक्रार तेथील पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. यासंदर्भातील माहिती उमेदवारी अर्जातील रकान्यात नमूद करण्यात आली नसल्याची तक्रार अजितराव घोरपडे यांनी दिली. या प्रकरणात त्यांना शिक्षा होणार असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा, असेही त्यात म्हटले होते.मात्र, या संदर्भातील प्रतिवाद प्रतिज्ञापत्र आर. आर. पाटील यांनी अर्जासोबत जोडले आहे. पाटील यांच्यावर गुन्हा नोंद नाही, तर केवळ एफआरआय नोंद आहे, असेही निकम यांनी स्पष्ट केले.या सर्व बाबींचा विचार करून आणि निवडणूक निरीक्षकांचा सल्ला घेऊन पाटील यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. गहमंत्री पाटील यांचे प्रतिज्ञापत्र खोटे असल्याची दुसरी तक्रार अपक्ष उमेदवार सूर्यकांत बापूसाहेब बोधले यांनीही दिली होती. तीही फेटाळण्यात आली.दरम्यान, उमेदवारी अर्जावर हरकत घेतल्याचे वृत्त मतदारसंघात वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे दोन्ही पक्षांचे समर्थक निवडणूक कार्यालयात आल्याने तणाव निर्माण झाला होता. राज्य राखीव दलाचे पोलीस पथक तैनात करण्यात आले होते. अखेर दुपारी चार वाजता आर, आर. पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आल्याची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. (वार्ताहर)