शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

२००५ नंतरची शिक्षक भरती, अनुदान तपासणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 23:16 IST

कोल्हापूर : १ जानेवारी २००५ नंतर ज्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्यात आली आहे, अशा सर्वांचे प्रस्ताव आणि संंबंधित शाळांना कोणत्या आदेशाने अनुदान सुरू करण्यात आले, याची तपासणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

ठळक मुद्दे नियम बाजूला ठेवून मान्यता दिल्याची प्रकरणे घडली सर्व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागांना शिबिरे भरवावी लागणार दिलेली मान्यता तपासण्याबाबत आदेश दिले आहेत.

कोल्हापूर : १ जानेवारी २००५ नंतर ज्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्यात आली आहे, अशा सर्वांचे प्रस्ताव आणि संंबंधित शाळांना कोणत्या आदेशाने अनुदान सुरू करण्यात आले, याची तपासणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. बारा वर्षांपूर्वीचे प्रस्ताव तपासून शासन नेमके काय साध्य करणार आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

बालभारती मुंबई येथे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत ६ जुलै रोजी एका बैठकीचे आयोजन केले होते. २०१६/१७ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत ही बैठक घेतली होती. त्यामध्ये तावडे यांनी १ जानेवारी २००५ पासूनच्या नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता तपासण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना कळविले असून, शालार्थ प्रणालीतील माहितीच्या आधारे ज्या कर्मचाºयांची नियुक्ती १ जानेवारी २००५ नंतरची असेल, अशा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची दिलेली मान्यता तपासण्याबाबत आदेश दिले आहेत.

ही दिलेली मान्यता अनुदान तत्त्वावरील असल्याने शाळांनाही कोणत्या शासन आदेशानुसार अनुदान सुरू केले आहे, याचीही सखोल तपासणी करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.तपासणीचा अहवाल १५ आॅगस्ट २०१७ पर्यंत शिक्षण आयुक्तांना सादर करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. राज्यात शिक्षक मान्यतेबाबत अनेक नियम बाजूला ठेवून मान्यता दिल्याची प्रकरणे घडली असल्याने शासनाने हा निर्णय घेण्याचे सांगण्यात आले.२ मे २०१२ नंतर भरती बंदशासनाच्या २ मे २०१२ रोजीच्या आदेशानुसार माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांची भरती थांबविली आहे. तरीही जर अशा प्रकारच्या प्रस्तावांना कुणी मान्यता दिली असेल तर तीही तपासणी यातून करणार आहे. मात्र १२ वर्षांपूर्वीच्या अनेक फाइली मिळण्याची शक्यता कमी असताना, आता या तपासणीसाठी पुन्हा एकदा सर्व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागांना शिबिरे भरवावी लागणार आहेत.