शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
3
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
5
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
6
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
7
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
8
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
9
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
10
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
11
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
12
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
13
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
14
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
15
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
16
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
17
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
18
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
19
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
20
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

आमसभेनंतर प्रतीक्षा प्रश्नांच्या सोडवणुकीची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2016 00:28 IST

शिरोळ आमसभा विश्लेषण : अधिकाऱ्यांबरोबर आमदारांचे पाठपुराव्याचे आश्वासन, नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या

संदीप बावचे -- शिरोळ -तब्बल नऊ वर्षानंतर झालेल्या आमसभेत शिरोळ तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी, वाळू, नदी प्रदूषण यांसह शासकीय कामातील दिरंगाईचा पंचनामा नागरिकांनी या सभेत केला. प्रलंबित प्रश्नांच्या कामाबाबत अधिकाऱ्यांबरोबर आमदारांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. पुढील वर्षीही आमसभा होईल, असेही स्पष्ट केल्यामुळे नागरिकांच्या प्रलंबित कामांचा निपटारा करणे हेच आव्हान शासकीय अधिकाऱ्यांसमोर आहे. शिरोळ येथे ५३ वर्षांतील २० वी आमसभा गुरुवारी पार पडली. या सभेला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. शेती, उद्योग आणि सहकाराशी नाळ जुळलेल्या तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांचा मारा सभेत अधिकच जाणवला. पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न नागरिकांनी प्रभावीपणे मांडून नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोग्याबाबत तक्रारी करताना एखाद्या साथीच्या आजाराचा फैलाव झाल्यानंतरच आरोग्य यंत्रणा जागी होते. याबाबत तिखट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. आमसभेत वाळू उपशावरून जोरदार चर्चा झाली. यंदा पाऊस कमी झाल्याने व पिण्याच्या पाण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार असल्याने वाळू लिलावाला नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. उपसा बंदी म्हणून सभेत ठरावही करण्यात आला आहे. अनुदानित शिक्षण संस्था नियमबाह्य डोनेशन आकारतात, याबाबतही तक्रारी झाल्याने येणाऱ्या जूनमध्ये याबाबत शिक्षण विभाग कोणती कार्यवाही करते याकडेही लक्ष लागून राहिले आहे. जयसिंगपुरात पिलरवरील उड्डाणपूल करण्याची मागणी नागरिकांनी केली असली, तरी येणाऱ्या काळात त्याबाबत शासन पातळीवर कोणता निर्णय होतो हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.वीज वितरण कार्यालयाकडून दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी आमसभेत मोठ्या प्रमाणात उमटल्या. एकूणच तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या आमसभेत संतप्त नागरिकांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यामुळे तालुक्यात शासकीय यंत्रणेचे चांगलेच वाभाडे निघाले. गैरकारभार करणाऱ्या विभागाची त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्याचा ठराव सभेत करण्यात आला आहे. एकूणच आमसभा झाली. जनतेने आपले दबलेले प्रश्न या ठिकाणी मांडले, विविध प्रश्नांबाबत ठरावही झाले, अधिकाऱ्यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही दिले आहे. आमदार उल्हास पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या कामाचा लेखाजोखा केला जाईल, जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी व ठरावाच्या पाठपुराव्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिल्यामुळे नागरिकांच्या आमसभेतून अपेक्षा लागून राहिल्या आहेत. निश्चितच आमदार पाटील यांनी पुढाकार घेऊन आमसभेच्या निमित्ताने आपण जनतेबरोबर असल्याचे दाखवून दिले आहे. आता खरी गरज आहे, ती नागरिकांच्या प्रश्नांचा निपटारा होण्याची. तरच आमसभा निश्चितपणाने यशस्वी पार पडली असेच म्हणावे लागेल.गेल्या ५३ वर्षात २० वी आमसभा शिरोळ येथे झाली. याबाबत नागरिकांनी खंत व्यक्त केली असलीतरी आ. उल्हास पाटील यांच्या माध्यमातून नऊ वर्षानंतर झालेली ही आमसभा निश्चितच चर्चेची ठरली आहे. सभेत विविध विषयांवर ठराव झाले आहेत, यामुळे शासकिय विभागाचे अधिकारी कोणत्या पद्धतीने नागरिकांच्या प्रश्नांचा निपटारा करतात हे येणाऱ्या काळात समजणार आहे.