शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

आमसभेनंतर प्रतीक्षा प्रश्नांच्या सोडवणुकीची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2016 00:28 IST

शिरोळ आमसभा विश्लेषण : अधिकाऱ्यांबरोबर आमदारांचे पाठपुराव्याचे आश्वासन, नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या

संदीप बावचे -- शिरोळ -तब्बल नऊ वर्षानंतर झालेल्या आमसभेत शिरोळ तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी, वाळू, नदी प्रदूषण यांसह शासकीय कामातील दिरंगाईचा पंचनामा नागरिकांनी या सभेत केला. प्रलंबित प्रश्नांच्या कामाबाबत अधिकाऱ्यांबरोबर आमदारांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. पुढील वर्षीही आमसभा होईल, असेही स्पष्ट केल्यामुळे नागरिकांच्या प्रलंबित कामांचा निपटारा करणे हेच आव्हान शासकीय अधिकाऱ्यांसमोर आहे. शिरोळ येथे ५३ वर्षांतील २० वी आमसभा गुरुवारी पार पडली. या सभेला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. शेती, उद्योग आणि सहकाराशी नाळ जुळलेल्या तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांचा मारा सभेत अधिकच जाणवला. पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न नागरिकांनी प्रभावीपणे मांडून नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोग्याबाबत तक्रारी करताना एखाद्या साथीच्या आजाराचा फैलाव झाल्यानंतरच आरोग्य यंत्रणा जागी होते. याबाबत तिखट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. आमसभेत वाळू उपशावरून जोरदार चर्चा झाली. यंदा पाऊस कमी झाल्याने व पिण्याच्या पाण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार असल्याने वाळू लिलावाला नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. उपसा बंदी म्हणून सभेत ठरावही करण्यात आला आहे. अनुदानित शिक्षण संस्था नियमबाह्य डोनेशन आकारतात, याबाबतही तक्रारी झाल्याने येणाऱ्या जूनमध्ये याबाबत शिक्षण विभाग कोणती कार्यवाही करते याकडेही लक्ष लागून राहिले आहे. जयसिंगपुरात पिलरवरील उड्डाणपूल करण्याची मागणी नागरिकांनी केली असली, तरी येणाऱ्या काळात त्याबाबत शासन पातळीवर कोणता निर्णय होतो हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.वीज वितरण कार्यालयाकडून दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी आमसभेत मोठ्या प्रमाणात उमटल्या. एकूणच तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या आमसभेत संतप्त नागरिकांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यामुळे तालुक्यात शासकीय यंत्रणेचे चांगलेच वाभाडे निघाले. गैरकारभार करणाऱ्या विभागाची त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्याचा ठराव सभेत करण्यात आला आहे. एकूणच आमसभा झाली. जनतेने आपले दबलेले प्रश्न या ठिकाणी मांडले, विविध प्रश्नांबाबत ठरावही झाले, अधिकाऱ्यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही दिले आहे. आमदार उल्हास पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या कामाचा लेखाजोखा केला जाईल, जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी व ठरावाच्या पाठपुराव्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिल्यामुळे नागरिकांच्या आमसभेतून अपेक्षा लागून राहिल्या आहेत. निश्चितच आमदार पाटील यांनी पुढाकार घेऊन आमसभेच्या निमित्ताने आपण जनतेबरोबर असल्याचे दाखवून दिले आहे. आता खरी गरज आहे, ती नागरिकांच्या प्रश्नांचा निपटारा होण्याची. तरच आमसभा निश्चितपणाने यशस्वी पार पडली असेच म्हणावे लागेल.गेल्या ५३ वर्षात २० वी आमसभा शिरोळ येथे झाली. याबाबत नागरिकांनी खंत व्यक्त केली असलीतरी आ. उल्हास पाटील यांच्या माध्यमातून नऊ वर्षानंतर झालेली ही आमसभा निश्चितच चर्चेची ठरली आहे. सभेत विविध विषयांवर ठराव झाले आहेत, यामुळे शासकिय विभागाचे अधिकारी कोणत्या पद्धतीने नागरिकांच्या प्रश्नांचा निपटारा करतात हे येणाऱ्या काळात समजणार आहे.