शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
2
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
3
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
4
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
5
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
6
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
7
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
8
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
9
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
11
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
12
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
13
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
14
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
15
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
16
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
17
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
18
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
19
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
20
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

आमसभेनंतर प्रतीक्षा प्रश्नांच्या सोडवणुकीची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2016 00:28 IST

शिरोळ आमसभा विश्लेषण : अधिकाऱ्यांबरोबर आमदारांचे पाठपुराव्याचे आश्वासन, नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या

संदीप बावचे -- शिरोळ -तब्बल नऊ वर्षानंतर झालेल्या आमसभेत शिरोळ तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी, वाळू, नदी प्रदूषण यांसह शासकीय कामातील दिरंगाईचा पंचनामा नागरिकांनी या सभेत केला. प्रलंबित प्रश्नांच्या कामाबाबत अधिकाऱ्यांबरोबर आमदारांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यामुळे नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. पुढील वर्षीही आमसभा होईल, असेही स्पष्ट केल्यामुळे नागरिकांच्या प्रलंबित कामांचा निपटारा करणे हेच आव्हान शासकीय अधिकाऱ्यांसमोर आहे. शिरोळ येथे ५३ वर्षांतील २० वी आमसभा गुरुवारी पार पडली. या सभेला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. शेती, उद्योग आणि सहकाराशी नाळ जुळलेल्या तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांचा मारा सभेत अधिकच जाणवला. पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न नागरिकांनी प्रभावीपणे मांडून नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोग्याबाबत तक्रारी करताना एखाद्या साथीच्या आजाराचा फैलाव झाल्यानंतरच आरोग्य यंत्रणा जागी होते. याबाबत तिखट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. आमसभेत वाळू उपशावरून जोरदार चर्चा झाली. यंदा पाऊस कमी झाल्याने व पिण्याच्या पाण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार असल्याने वाळू लिलावाला नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. उपसा बंदी म्हणून सभेत ठरावही करण्यात आला आहे. अनुदानित शिक्षण संस्था नियमबाह्य डोनेशन आकारतात, याबाबतही तक्रारी झाल्याने येणाऱ्या जूनमध्ये याबाबत शिक्षण विभाग कोणती कार्यवाही करते याकडेही लक्ष लागून राहिले आहे. जयसिंगपुरात पिलरवरील उड्डाणपूल करण्याची मागणी नागरिकांनी केली असली, तरी येणाऱ्या काळात त्याबाबत शासन पातळीवर कोणता निर्णय होतो हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.वीज वितरण कार्यालयाकडून दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी आमसभेत मोठ्या प्रमाणात उमटल्या. एकूणच तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या आमसभेत संतप्त नागरिकांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यामुळे तालुक्यात शासकीय यंत्रणेचे चांगलेच वाभाडे निघाले. गैरकारभार करणाऱ्या विभागाची त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्याचा ठराव सभेत करण्यात आला आहे. एकूणच आमसभा झाली. जनतेने आपले दबलेले प्रश्न या ठिकाणी मांडले, विविध प्रश्नांबाबत ठरावही झाले, अधिकाऱ्यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही दिले आहे. आमदार उल्हास पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या कामाचा लेखाजोखा केला जाईल, जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी व ठरावाच्या पाठपुराव्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिल्यामुळे नागरिकांच्या आमसभेतून अपेक्षा लागून राहिल्या आहेत. निश्चितच आमदार पाटील यांनी पुढाकार घेऊन आमसभेच्या निमित्ताने आपण जनतेबरोबर असल्याचे दाखवून दिले आहे. आता खरी गरज आहे, ती नागरिकांच्या प्रश्नांचा निपटारा होण्याची. तरच आमसभा निश्चितपणाने यशस्वी पार पडली असेच म्हणावे लागेल.गेल्या ५३ वर्षात २० वी आमसभा शिरोळ येथे झाली. याबाबत नागरिकांनी खंत व्यक्त केली असलीतरी आ. उल्हास पाटील यांच्या माध्यमातून नऊ वर्षानंतर झालेली ही आमसभा निश्चितच चर्चेची ठरली आहे. सभेत विविध विषयांवर ठराव झाले आहेत, यामुळे शासकिय विभागाचे अधिकारी कोणत्या पद्धतीने नागरिकांच्या प्रश्नांचा निपटारा करतात हे येणाऱ्या काळात समजणार आहे.