शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महापुरानंतर भरपाईबरोबरच पंचनाम्यातही काटछाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:30 IST

दत्ता पाटील म्हाकवे : महापुरामुळे वेदगंगा नदीकाठावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ...

दत्ता पाटील

म्हाकवे : महापुरामुळे वेदगंगा नदीकाठावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. २०१९ पेक्षाही यंदा नुकसानीचे प्रमाण वाढले असताना शासनाकडून भरपाई मात्र तुटपुंजी दिली जात आहे. नुकसानीचे पंचनामे करतानाही अनेक शेतकऱ्यांचे त्यांच्या संपूर्ण क्षेत्रातील पिकांचे पूर्णतः नुकसान झालेले असताना अधिकारी ९० टक्क्यांपर्यंतच नुकसान झाल्याच्या नोंदी करत आहेत. याबाबत शेतकऱ्यांमधून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. यंदाही २०१९प्रमाणेच भरपाई मिळावी, अशीही मागणी होत आहे.

वेदगंगा नदीकाठ निढोरीपासून चिखलीपर्यंत सपाट भाग आहे. त्यामुळे या भागातील शेतीचे पुराने प्रचंड नुकसान होते. यंदा चिकोत्रा खोऱ्यातही प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे उथळ असणाऱ्या चिकोत्रा नदीलाही पूर आला. नानीबाई चिखली येथील संगमाजवळ चिकोत्राच्या पाण्याने वेदगंगेचा प्रवाहच रोखून धरला होता. परिणामी पाण्याची फूग पश्चिमेकडील सपाट भागात वाढत गेली. त्यामुळे चिखलीसह म्हाकवे, परिसरातील गावाच्या शेतीचे नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे सध्या पंचनामे सुरू आहेत. मात्र, पिकांचे पूर्णतः नुकसान होऊनही अधिकारी ९०टक्क्यांपर्यंतच भरपाईसाठी क्षेत्र पात्र धरत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन अधिकारी वेळकाढूपणा करत आहेत.

एकराला दोन गुंठयांची भरपाई...

यंदा उसाला प्रतिगुंठा १३५ म्हणजेच एकरी ५४००रुपये व भात, सोयाबीन पिकाला प्रतिगुंठा ६८ रुपये म्हणजेच एकरी २७२०रुपये इतकी तुटपुंजी भरपाई मिळणार आहे. ही भरपाई जाहीर करतानाही शेतकऱ्यांची चेष्टाच केली असल्याचे जाणकरांतून बोलले जात आहे.

"आमच्या१५७३ या गट नंबरातील संपूर्ण ३८गुंठे ऊसक्षेत्राचे नुकसान झाले. मात्र, केवळ ३०गुंठेच भरपाईसाठी पात्र धरले. त्यामुळे अधिकाऱ्यांची मनमानी थांबायला हवी, तसेच २०१९ प्रमाणे भरपाई मिळाली तरच आम्हाला हातभार लागणार आहे.’’ -

विनोद मारुती जगदाळे

शेतकरी, बानगे

कँप्शन :

पुरामुळे वेदगंगा नदीकाठावरील पूर्णतः नुकसान झालेले आणूर येथील ऊसक्षेत्र...

छाया-दत्तात्रय पाटील, म्हाकवे.