शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

दिवाळीनंतर पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा

By admin | Updated: October 16, 2015 00:40 IST

हसन मुश्रीफ : महापालिकेसाठी ‘कागल’मधील दहा हजार कार्यकर्ते दसऱ्यादिवशी कोल्हापुरात

कागल : लोकसभा निवडणुकीपासून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाचा अश्वमेध सुरू आहे. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता पाठीशी असल्याने मनपा निवडणुकीतही विजयाचा अश्वमेध कायम राहील. कोल्हापूरकर आणि कागलकरांचे ऋणानुबंध जुळलेले आहेत. कागल तालुक्यातील दहा हजार कार्यकर्ते दसऱ्यादिवशी कोल्हापूरकरांची सदिच्छा भेट घेऊन राष्ट्रवादीची भूमिका मांडतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. कागल तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा गुरुवारी येथील शाहू सभागृहात आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्यास शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील, नगराध्यक्षा संगीता गाडेकर, नवीद मुश्रीफ, तालुका संघाचे अध्यक्ष शशिकांत खोत, गणपतराव फराकटे, आदी प्रमुख उपस्थित होते. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचीच हवा शहरात आहे. म्हणून कागल तालुक्यातील कार्यकर्त्यांनी शहरातील आपले नातेवाईक, मित्र, स्नेही, सामान्य जनतेची भेट घेऊन संवाद साधावा. त्यासाठी दसऱ्याचा दिवस योग्य असून, चांगल्या विचारांचे सोने वाटप करावे. भाजप-सेना युतीचे सरकार गोरगरिबांच्या सर्व योजना बंद करण्याच्या प्रयत्नात आहे. बांधकाम कामगार, निराधार, अपंग, दलित, घरेलू कामगार अशा असंख्य घटकांवर अन्याय करीत आहे. शासनाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी दिवाळीनंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर एक लाख लोकांचा मोर्चा काढू. ‘न भूतो, न भविष्यती’ असा हा मोर्चा असेल. यावेळी युवराज पाटील म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला ४० ते ४५ जागा हमखास मिळतील, असे सर्वांच्या लक्षात आलेले आहे. यावेळी डी. डी. चौगुले, भैया माने, शशिकांत खोत यांचीही भाषणे झाली. लाटण्याने स्वागत करामुश्रीफ म्हणाले, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची चौकशी यापूर्वी राधानगरी-भुदरगड महसूल कर्मचाऱ्यांतर्फे केली. आता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सांगलीतील अधिकाऱ्यांकडून चौकशी करीत आहेत. त्यांचे स्वागत लाटण्याने केल्याशिवाय राहणार नाहीत. राजे-मंडलिकांची पोकळीमाजी खासदार सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. आपण त्यांच्या कार्याचा हा वसा पुढे नेऊया. त्यासाठी सहकार्याची भूमिका ठेवूया, असे मुश्रीफ म्हणाले.