शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

पराभवानंतर शिवसेनेत अस्वस्थता

By admin | Updated: November 9, 2015 00:29 IST

महापालिकेचे राजकारण : आमदार क्षीरसागर विरोधकांना उकळ्या

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्याने पक्षात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते नेत्यांवर थेट आगपाखड करू लागल्याने त्याचे दूरगामी परिणाम पक्षसंघटनेवर होणार हे निश्चित आहे. निवडणुकीतील अपयशाने आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधकांना चांगल्याच उकळ्या फुटल्या असून, त्यांनी ‘मातोश्री’पर्यंत योग्य तो संदेश पोहोचविण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेच्या दृष्टीने महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची होती. गेले दहा वर्षे शहरातून शिवसेनेचा आमदार निवडून येतो, पण महापालिकेवर सत्ता का मिळत नाही? असा प्रश्न शिवसैनिकांसह पक्षाच्या वरिष्ठांना पडत होता. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेतील आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यातील अंतर्गत वाद मिटवून पक्षश्रेष्ठींनी दोघांनाही कामाला लावले होते. गेले सहा महिने महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पक्षाने येथे भगव्या सप्ताहासारखे कार्यक्रम घेऊन वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला. निवडणूक जाहीर झाल्यानंतर शहरात वातावरणनिर्मिती करण्यात ते सगळ्यात पुढे होते; पण उमेदवार निवडीनंतर पक्षांतर्गत धुसफुस सुरू झाली. केवळ इलेक्टिव्ह मेरिट हे कारण पुढे करत निष्ठावंत शिवसैनिकांना डावलण्यात आले. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनीच बंडखोरी केल्याने पक्षाला मोठा फटका बसला. उमेदवारी देताना झालेले साटे-लोटे व बंडखोरी पाहता पक्षाला फारसे यश मिळणार नाही, हे निश्चित होते. प्रमुख विरोधी पक्षांनी तर शिवसेनेला प्रतिस्पर्धीच मानले नसल्याने त्यांच्यावर टीका करून आपली ताकदही वाया घालविली नाही. अपेक्षेप्रमाणे पक्षाला फक्त चार जागा मिळाल्या, त्याही स्वत:च्या ताकदीवरच आल्या. गेले सहा वर्षे शहरात शिवसेनेचे आमदार असताना पक्षाची वाताहत होतेच कशी? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. निवडणुकीत नेत्यांनी खेळलेल्या अंतर्गत खेळ्या, त्याचा निकालावर झालेला परिणाम याचा लेखाजोखा पक्षश्रेष्ठींनी मागविला आहे. दुसऱ्या फळीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांनीही नेत्यांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. त्यांनी थेट राजीनाम्याची मागणी केल्याने आगामी काळात पक्षसंघटना टिकविणे नेत्यांसमोर आव्हान आहे. कोल्हापूरकरांनी लाटेतही सहा आमदार दिल्याने मंत्रिपदाची संधी आहे. मंत्रिपदासाठी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये क्षीरसागर यांचे नाव सुरुवातीपासून आघाडीवर आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना किंगमेकर ठरली असती तर आमदार क्षीरसागर यांच्यादृष्टीने जमेची बाजू ठरली असती; पण नामुष्कीजनक पराभवामुळे श्रेष्ठींच्या दरबारी त्यांचे वजन काहीसे कमी होणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूरला संधी मिळालीच तर क्षीरसागर यांचे स्पर्धक वाढणार आहेत. आमदार नरके यांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे. ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके यांचे शिवसेनेतील नेत्यांशी जुने संबंध आहेत. त्यांच्यामार्फत त्यांनी यंत्रणा कार्यरत केली आहे. आमदार मिणचेकर यांच्यासाठी एक बडा उद्योगपती प्रयत्नशील आहे. त्यामुळे मंत्रिपदाची संधी मिळाली तर ती कोणाला? हे जरी खरे असले तरी या संधी मागे पालिकेचे राजकारण असणार हे निश्चित आहे. (प्रतिनिधी)‘सोयीच्या राजकारणा’ने वजाबाकीशिवसेनेने ओढून-ताणून ८१ उमेदवार उभे केले होते; पण उमेदवारी देताना त्यांनी अनेक ठिकाणी विधानसभा निवडणुकीतील उपकाराची परतफेड केल्याचे स्पष्ट दिसते. ‘सोयीचे राजकारण’ करण्यात नेते यशस्वी ठरले; पण पक्षात मात्र वजाबाकीच झाल्याची चर्चा सुरू आहे.