शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनानंतर उद्योजकांचा बंद मागे

By admin | Updated: January 12, 2015 00:42 IST

वीजदरवाढ : मुख्यमंत्र्यांबरोबर आठवड्यात बैठक घेऊ : सुजित मिणचेकर

कोल्हापूर : वीज दरवाढीमुळे राज्यातील उद्योगांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कसरत करावी लागण्याचे असल्याचे आम्ही जाणतो. त्यामुळे विजेचे दर कमी करण्याबाबत ठोस कार्यवाही व्हावी, यासाठी पुढील आठवड्यात मुंबईत मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री अर्थमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्यासमवेत उद्योजकांची बैठक घेतली जाईल, असे आश्वासन आमदार सुजित मिणचेकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांना दिले. या आश्वासनानंतर उद्या, सोमवारपासून तीन दिवस पुकारलेला बंद उद्योजकांनी आज, रविवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. सरकारने अनुदान बंद केल्याच्या निषेधार्थ आणि अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजदर खाली येईपर्यंत नवीन दरवाढ करू नये, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील उद्योग उद्या, सोमवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय उद्योजकांनी दोन दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र, याचवेळी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशने (स्मॅक) ‘बंद’मध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. शनिवारपर्यंत बंदबाबत जिल्ह्णातील उद्योजकीय संघटनांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसत होते. अशा स्थितीत आमदार सुचित मिणचेकर यांनी आज, रविवारी गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा), कागल-पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील ‘मॅक’चे पदाधिकारी, उद्योजकांशी भेट घेतली. त्यांच्याशी वीज दरवाढीबाबत चर्चा केली. यावेळी आमदार मिणचेकर यांनी वीज दरवाढ कमी करण्याबाबत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापुरातील बैठक उद्योजकांना दिली असल्याचे उद्योजकांना सांगितले. शिवाय वीज दरवाढ उद्योगांना मारक असल्याचे आम्ही जाणतो. त्यामुळे दरवाढ कमी करण्याबाबत सरकारकडून ठोस पावले उचलली जातील. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत उद्योजकांची पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यावर चर्चेसाठी सकारात्मकपणे तयारी दाखवीत उद्योजकांनी सोमवारपासून पुकारलेला बंद मागे घेतला. त्या दृष्टीने गोशिमा, मॅककडून दूरध्वनी, एसएमएसच्या माध्यमातून उद्योजकांना याबाबतचा निर्णय कळविण्यात आला. (प्रतिनिधी)धक्का द्यायला हवा होता...वीज दरवाढीच्या अनुदानापोटी ७०६ कोटींचे अनुदान राज्य सरकारने बंद केल्याने औद्योगिक विजेच्या दरात वाढ झाली. जानेवारीपासून वीज बिले वाढून आल्याने उद्योजक संतप्त झाले. फेब्रुवारीपासून सुमारे वीस टक्के दरवाढीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सरकारसमवेत चर्चा करूच; पण तीन दिवसांच्या बंदच्या माध्यमातून नव्या सरकारला वीज दरवाढ आणि आपल्या मागण्यांबाबत एक धक्का द्यायला हवा होता, अशादेखील प्रतिक्रिया काही उद्योजकांनी व्यक्त केल्या.