शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

आश्वासनानंतर उद्योजकांचा बंद मागे

By admin | Updated: January 12, 2015 00:42 IST

वीजदरवाढ : मुख्यमंत्र्यांबरोबर आठवड्यात बैठक घेऊ : सुजित मिणचेकर

कोल्हापूर : वीज दरवाढीमुळे राज्यातील उद्योगांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कसरत करावी लागण्याचे असल्याचे आम्ही जाणतो. त्यामुळे विजेचे दर कमी करण्याबाबत ठोस कार्यवाही व्हावी, यासाठी पुढील आठवड्यात मुंबईत मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री अर्थमंत्री आणि उद्योगमंत्री यांच्यासमवेत उद्योजकांची बैठक घेतली जाईल, असे आश्वासन आमदार सुजित मिणचेकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांना दिले. या आश्वासनानंतर उद्या, सोमवारपासून तीन दिवस पुकारलेला बंद उद्योजकांनी आज, रविवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. सरकारने अनुदान बंद केल्याच्या निषेधार्थ आणि अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजदर खाली येईपर्यंत नवीन दरवाढ करू नये, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील उद्योग उद्या, सोमवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय उद्योजकांनी दोन दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र, याचवेळी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशने (स्मॅक) ‘बंद’मध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. शनिवारपर्यंत बंदबाबत जिल्ह्णातील उद्योजकीय संघटनांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसत होते. अशा स्थितीत आमदार सुचित मिणचेकर यांनी आज, रविवारी गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा), कागल-पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील ‘मॅक’चे पदाधिकारी, उद्योजकांशी भेट घेतली. त्यांच्याशी वीज दरवाढीबाबत चर्चा केली. यावेळी आमदार मिणचेकर यांनी वीज दरवाढ कमी करण्याबाबत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापुरातील बैठक उद्योजकांना दिली असल्याचे उद्योजकांना सांगितले. शिवाय वीज दरवाढ उद्योगांना मारक असल्याचे आम्ही जाणतो. त्यामुळे दरवाढ कमी करण्याबाबत सरकारकडून ठोस पावले उचलली जातील. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमवेत उद्योजकांची पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यावर चर्चेसाठी सकारात्मकपणे तयारी दाखवीत उद्योजकांनी सोमवारपासून पुकारलेला बंद मागे घेतला. त्या दृष्टीने गोशिमा, मॅककडून दूरध्वनी, एसएमएसच्या माध्यमातून उद्योजकांना याबाबतचा निर्णय कळविण्यात आला. (प्रतिनिधी)धक्का द्यायला हवा होता...वीज दरवाढीच्या अनुदानापोटी ७०६ कोटींचे अनुदान राज्य सरकारने बंद केल्याने औद्योगिक विजेच्या दरात वाढ झाली. जानेवारीपासून वीज बिले वाढून आल्याने उद्योजक संतप्त झाले. फेब्रुवारीपासून सुमारे वीस टक्के दरवाढीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सरकारसमवेत चर्चा करूच; पण तीन दिवसांच्या बंदच्या माध्यमातून नव्या सरकारला वीज दरवाढ आणि आपल्या मागण्यांबाबत एक धक्का द्यायला हवा होता, अशादेखील प्रतिक्रिया काही उद्योजकांनी व्यक्त केल्या.