शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर झेडपीच्या खात्यात ५ कोटी जमा

By admin | Updated: December 18, 2014 00:35 IST

संजय कुलकर्णी ,जालना एकीकडे ग्रामीण भागात दुष्काळाचे चटके आणि दुसरीकडे तेथे काम करण्यासाठी निधीची चणचण अशा चक्रव्युहात सापडलेल्या

संजय कुलकर्णी ,जालनाएकीकडे ग्रामीण भागात दुष्काळाचे चटके आणि दुसरीकडे तेथे काम करण्यासाठी निधीची चणचण अशा चक्रव्युहात सापडलेल्या जिल्हा परिषदेला अखेर ‘लोकमत’ च्या वृत्तानंतर नियोजन मंडळाकडून तातडीने ५ कोटींचा निधी मिळाला आहे.११ डिसेंबरच्या हॅलो जालनाच्या अंकातून ‘नियोजन मंडळाने जि.प.चा कोट्यवधीचा निधी ठेवला अडवून’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित झाले होते. चालू आर्थिक वर्षात गेल्या आठ महिन्यात जिल्हा नियोजन मंडळाने जिल्हा परिषदेच्या ‘बीडीएस’ (निधी वितरण प्रणाली) वर ११.४८ कोटींचाच निधी जमा केला होता. वास्तविक २०१४-१५ या वर्षासाठी नियोजन मंडळाअंतर्गत जिल्हा परिषदेला ४६.३९ कोटींचा निधी मंजूर आहे. आरोग्य, सिंचन आणि पशुसंवर्धन या प्रमुख तीन विभागांसाठी एक रूपयादेखील दिलेला नाही. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासाठी केवळ १५ लाखांचा निधी दिला. निधीअभावी ग्रामीण भागात नादुरूस्त हातपंप दुरूस्तीची कामे किंवा त्यासाठीचे सुटे भाग मागविण्याचे आदेशही जि.प. यंत्रणेला देता येईना.दरम्यान, लोकमत च्या वृत्तानंतर नियोजन मंडळाने १७ डिसेंबर २०१४ पर्यंत ४.५४ कोटींचा निधी बीडीएसवर जमा केला आहे. त्यानुसार सद्यस्थितीत शिक्षण विभागासाठी ४ कोटी २३ लाख ६४ हजार, आरोग्य विभागासाठी ४४.१२ लाख, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासाठी ३ कोटी १५ लाख, ग्रामपंचायत विभागासाठी ४ कोटी ६० लाख, मार्ग व पुलांसाठी ३ कोटी ६० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मात्र पशुसंवर्धन आणि लघुपाटबंधारे विभागाचे निधीचे खाते अद्याप उघडलेले नाही. त्यामुळे या विभागांसाठीही निधी मिळणे आवश्यक आहे. डीपीडीसीने दिलेल्या या निधीमुळे आता काही कामांना चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांमधून बोलले जाते. गेल्या आठ महिन्यांपासून निधी बीडीएसवर न टाकल्याने जिल्हा परिषदेच्या योजनांची किंवा विविध विभागांची कामे ठप्प होती. ४गेल्या सहा दिवसात शिक्षण विभागाला ९० लाखांचा निधी देण्यात आला. यात प्राथमिक शाळेच्या इमारत बांधकामासाठी जि.प. अनुदान, ई-लर्निंग या योजनांचा समावेश आहे. पाणीपुरवठा विभागाला ३ कोटींचा निधी देण्यात आला. यात नळांद्वारे पाणीपुरवठा खास उपाय या कामांचा समावेश आहे. तर आरोग्य विभागासाठी ४४ लाखांचा निधी देण्यात आला आहे. ४डीपीडीसीकडून सुमारे ५ कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने काही कामांना आता गती येण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा योजना, हातपंपांची दुरूस्ती, आरोग्य विभागासाठी औषधींची खरेदी इत्यादी कामे यात प्रामुख्याने मार्गी लागतील, असा विश्वास जि.प. सदस्यांमधून व्यक्त केला जात आहे.