शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अखेर झेडपीच्या खात्यात ५ कोटी जमा

By admin | Updated: December 18, 2014 00:35 IST

संजय कुलकर्णी ,जालना एकीकडे ग्रामीण भागात दुष्काळाचे चटके आणि दुसरीकडे तेथे काम करण्यासाठी निधीची चणचण अशा चक्रव्युहात सापडलेल्या

संजय कुलकर्णी ,जालनाएकीकडे ग्रामीण भागात दुष्काळाचे चटके आणि दुसरीकडे तेथे काम करण्यासाठी निधीची चणचण अशा चक्रव्युहात सापडलेल्या जिल्हा परिषदेला अखेर ‘लोकमत’ च्या वृत्तानंतर नियोजन मंडळाकडून तातडीने ५ कोटींचा निधी मिळाला आहे.११ डिसेंबरच्या हॅलो जालनाच्या अंकातून ‘नियोजन मंडळाने जि.प.चा कोट्यवधीचा निधी ठेवला अडवून’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित झाले होते. चालू आर्थिक वर्षात गेल्या आठ महिन्यात जिल्हा नियोजन मंडळाने जिल्हा परिषदेच्या ‘बीडीएस’ (निधी वितरण प्रणाली) वर ११.४८ कोटींचाच निधी जमा केला होता. वास्तविक २०१४-१५ या वर्षासाठी नियोजन मंडळाअंतर्गत जिल्हा परिषदेला ४६.३९ कोटींचा निधी मंजूर आहे. आरोग्य, सिंचन आणि पशुसंवर्धन या प्रमुख तीन विभागांसाठी एक रूपयादेखील दिलेला नाही. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासाठी केवळ १५ लाखांचा निधी दिला. निधीअभावी ग्रामीण भागात नादुरूस्त हातपंप दुरूस्तीची कामे किंवा त्यासाठीचे सुटे भाग मागविण्याचे आदेशही जि.प. यंत्रणेला देता येईना.दरम्यान, लोकमत च्या वृत्तानंतर नियोजन मंडळाने १७ डिसेंबर २०१४ पर्यंत ४.५४ कोटींचा निधी बीडीएसवर जमा केला आहे. त्यानुसार सद्यस्थितीत शिक्षण विभागासाठी ४ कोटी २३ लाख ६४ हजार, आरोग्य विभागासाठी ४४.१२ लाख, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागासाठी ३ कोटी १५ लाख, ग्रामपंचायत विभागासाठी ४ कोटी ६० लाख, मार्ग व पुलांसाठी ३ कोटी ६० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मात्र पशुसंवर्धन आणि लघुपाटबंधारे विभागाचे निधीचे खाते अद्याप उघडलेले नाही. त्यामुळे या विभागांसाठीही निधी मिळणे आवश्यक आहे. डीपीडीसीने दिलेल्या या निधीमुळे आता काही कामांना चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे अधिकाऱ्यांमधून बोलले जाते. गेल्या आठ महिन्यांपासून निधी बीडीएसवर न टाकल्याने जिल्हा परिषदेच्या योजनांची किंवा विविध विभागांची कामे ठप्प होती. ४गेल्या सहा दिवसात शिक्षण विभागाला ९० लाखांचा निधी देण्यात आला. यात प्राथमिक शाळेच्या इमारत बांधकामासाठी जि.प. अनुदान, ई-लर्निंग या योजनांचा समावेश आहे. पाणीपुरवठा विभागाला ३ कोटींचा निधी देण्यात आला. यात नळांद्वारे पाणीपुरवठा खास उपाय या कामांचा समावेश आहे. तर आरोग्य विभागासाठी ४४ लाखांचा निधी देण्यात आला आहे. ४डीपीडीसीकडून सुमारे ५ कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने काही कामांना आता गती येण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा योजना, हातपंपांची दुरूस्ती, आरोग्य विभागासाठी औषधींची खरेदी इत्यादी कामे यात प्रामुख्याने मार्गी लागतील, असा विश्वास जि.प. सदस्यांमधून व्यक्त केला जात आहे.