शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर २६ तासांनंतर रेल्वे रुळावर

By admin | Updated: April 24, 2015 01:10 IST

मिरज-पुणे रेल्वेमार्ग : पाचशे कामगारांनी दिवसरात्र केले काम

आदर्की : मिरज-पुणे लोहमार्गावर बुधवार, दि. २२ रोजी पहाटेच्या सुमारास मालगाडीचे १६ डबे घसरून भीषण अपघात वाठार-आदर्की रेल्वे स्थानकादरम्यान झाल्याने या मार्गावर सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. अखेर गुरुवार, दि.२३ रोजी दोन क्रेन, तीन जेसीबी, ४०० रेल्वे कर्मचारी, ५०० हमाल अशी मोठी फौज रेल्वे प्रशासनाने उभी करून दिवस-रात्र युद्धपातळीवर काम करून सकाळी सात वाजता तब्बल २६ तासांनंतर रेल्वेलाईन सुरळीत करण्यात यश आले. मिरज-पुणे लोहमार्गावर आदर्की, ता. फलटण येथे सांगलीहून गुहाटी (आसाम)कडे रायगाव शुगर वर्क्सची साखर घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे १६ डबे घसरून रेल्वे प्रशासनाचे कोट्यवधींचे नुकसान झाले. बुधवारी पहाटे अपघात घडल्यानंतर तातडीने अधिकाऱ्यांनी मिरज व दौंड येथून अपघात मदत पथक व दोन क्रेन, तीन जेसीबी दोन छोटी क्रेन व ५०० हमाल बोलावून अपघातग्रस्त माल डब्यातून साखर बाहेर काढून काही डबे क्रेनच्या साह्याने बाहेर काढले तर काही गॅस कटरने तोडून बाहेर काढण्यात आले. तीव्र उन्हामुळे व कामगारांना वेळेत जेवण न मिळाल्यामुळे काम मंदगतीने सुरू होते. लाईनवर १० डब्यांपैकी सायंकाळी सातपर्यंत सहा डबे बाहेर काढले. त्यानंतर सहा जनरेटरद्वारे दिव्याचा प्रकाश प्लॅश बोर्डवर पाडून १५० कामगारांनी सकाळी सात वाजेपर्यंत रेल्वेलाईन सुरळीत रेल्वे गाड्या सोडण्यात आले. गुरुवारी रेल्वेलाईन बाहेर गेलेल्या माल डब्यातून साखर काढण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)