शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

तब्बल २0 वर्षांनंतर कवठेगुलंदला आरोग्य केंद्र

By admin | Updated: October 27, 2016 19:25 IST

जागेची तांत्रिक अडचण झाली दूर : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात इमारत पायाखुदाई

अजित चंपुणावर --बुबनाळ --नदी पलीकडील बुबनाळसह आलास, शेडशाळ, गणेशवाडीसह सात गावांंसाठी तब्बल २0 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न निकाली निघाला आहे. हे आरोग्य केंद्र अल्पावधीतच नागरिकांच्या सेवेसाठी येत असून, या भागातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कवठेगुलंद येथील गेली २० वर्षे प्रलंबित असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रास चार कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी या केंद्रासाठी एक कोटी २० लाखांचा निधीही प्राप्त झाला होता. मात्र, केवळ जागा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे करण्याची तांत्रिक अडचण होती. माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक व आलास जिल्हा परिषद सदस्या सुनंदा दानोळे यांचे प्रयत्न मोलाचे ठरले. कवठेगुलंद ग्रामपंचायतीने गट नं. २६८ मधील ०-९३ आर जागा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे केल्याने ही तांत्रिक अडचणही दूर झाली. दरम्यान, शासकीय आरोग्य सेवासुविधा मिळावी, यासाठी कवठेगुलंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात यावे, यासाठी सातत्याने प्रयत्न झाले. प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न गेली २० वर्षे प्रलंबित होता. आरोग्य केंद्र मंजूर आहे. मात्र, कार्यवाहीविना ते कागदावरच राहिले होते. नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आलास, बुबनाळ, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी या सात गावांसाठी आरोग्य उपकेंद्रे आहे. मात्र, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णांना आरोग्य सुविधा मिळण्यास अडचणी ठरत होत्या. त्यामुळे या भागातील नागरिकांना एकतर नृसिंहवाडी, कुरुंदवाड अथवा जयसिंगपूर, मिरज, सांगली या ठिकाणी उपचारांसाठी जावे लागत होते. एकीकडे कवठेगुलंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर आहे. मात्र, कार्यवाही का होत नाही? फक्त आरोग्य केंद्र मंजुरीचे आश्वासन मिळत होते. दानोळे व मादनाईक यांच्या पाठपुराव्याला खास. शेट्टींचे सहकार्य मिळाले. परिणामी, २० वर्षांहून अधिक काळ रेंगाळलेल्या कवठेगुलंद प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न निकाली निघाला. या आरोग्य केंद्रास चार कोटींचा निधीही मंजूर होऊन एक कोटी ९० लाखांचा निधी प्रत्यक्षात मिळाला. जागेची तांत्रिक अडचण कवठेगुलंद ग्रामपंचायतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे करून दूर केली. त्यामुळे नव्या इमारतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला. गेल्या २0 वर्षांहून अधिक काळ कवठेगुलंद प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न प्रलंबित होता. जागेची तांत्रिक अडचणही दूर झाल्यामुळे इमारत बांधकामासाठी जी आवश्यक प्रक्रिया आहे ती अंतिम टप्प्यात आली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पायाखुदाई कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर आठ ते दहा महिन्यांत सुसज्ज अशा सर्व अत्याधुनिक आरोग्य सेवासुविधांसह प्राथमिक आरोग्य केंद्र नागरिकांसाठी सज्ज होणार आहे. - सुनंदा दानोळे, जि. प. सदस्या, आलास.