शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

तब्बल १८ वर्षांनंतर आई-मुलाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:01 IST

जहॉँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : तो सध्या राहत होता कागलमध्ये. त्याचे नातेवाईक कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावातील, तर आई माहेरी म्हणजे सांगली जिल्ह्यातील मांजर्डे गावात राहते. असे हे सर्वजण जवळपास असूनही तो गेली अठरा वर्षे ‘अनाथ’ म्हणून जीवन जगला. कागलमधील काही सामाजिक कार्यकर्ते त्याचे लग्न ठरविण्यासाठी त्याचे किमान रेशनकार्ड, आधारकार्ड ...

जहॉँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : तो सध्या राहत होता कागलमध्ये. त्याचे नातेवाईक कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावातील, तर आई माहेरी म्हणजे सांगली जिल्ह्यातील मांजर्डे गावात राहते. असे हे सर्वजण जवळपास असूनही तो गेली अठरा वर्षे ‘अनाथ’ म्हणून जीवन जगला. कागलमधील काही सामाजिक कार्यकर्ते त्याचे लग्न ठरविण्यासाठी त्याचे किमान रेशनकार्ड, आधारकार्ड काढण्यासाठी कागदपत्रे गोळा करीत असताना त्याच्या नातेवाइकांचा शोध लागला. तब्बल १८ वर्षांनंतर या आई-मुलाची आणि बहीण-भावाची भेट झाली. चित्रपटातील एका कथेप्रमाणे हा प्रवास घडला आहे विजय सुरेश उबाळे (मूळ गाव दानोळी, ता. हातकणंगले) या युवकाचा.१९९९ च्या सुमारास विजय याची आई छाया ही कौटुंबिक वादातून माहेरी मांजर्डे (ता. तासगाव, जि. सांगली) येथे निघून गेली. तिच्यासोबत त्याच्या दोन बहिणी शिल्पा आणि चैताली यादेखील गेल्या. तेव्हा विजय पाच ते सहा वर्षांचा असेल, तर बहिणींचे वय आठ आणि दुसरीचे दहा असे होते. वडिलांनी मुलगा म्हणून स्वत:कडे ठेवून घेतले. नंतर काही दिवसांत वडिलांचे निधन झाले. कौटुंबिक वाद इतका टोकाचा होता की, आई अंत्यविधीलाही येऊ शकली नाही. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर विजयला मिरजेच्या अनाथालयात ‘अनाथ’ म्हणून दाखल केले गेले. तेथून दोन वर्षांनंतर त्याची कोल्हापुरात बाल निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली. तेथे काही वर्षे गेल्यानंतर तो कणेरीवाडी येथील अनाथालयात आला. लहान वयात ‘अनाथ’ असल्याचा पक्का समज त्याच्या डोक्यात बसल्याने तसेच त्याच्याकडे कोण नातेवाईकही फिरकले नसल्याने विजय हादेखील सर्व विसरून गेला. बघता बघता ही दहा वर्षे निघून गेली. दहावी परीक्षेनंतर त्याला निरीक्षणगृहातून बाहेर पडावे लागले. कागलमध्ये बाल निरीक्षण गृह चालविणाऱ्या प्रशांत वाळवेकरांनी त्याला आधार दिला. ‘अनाथ’ म्हणून सर्वजण त्याला सहानुभूती दाखवत. वनमित्र संघटनेचे अशोक शिरोळे, सुनील जाधव, आदींनी त्याचे वय लक्षात घेऊन त्याचे लग्न करून द्यावे असा विचार केला. त्यासाठी त्याचे आधार कार्ड, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र बनविण्यासाठी कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात केली. तेव्हा बाल निरीक्षण गृहातील कागदपत्रे तपासता तपासता ते थेट पोहोचले सांगलीच्या शासकीय रुग्णालयात. तेथे त्याचा ‘दानोळी’ गावचा पत्ता मिळाला. दानोळीत गेल्यानंतर सर्व भाऊबंद सापडले, तर त्या ठिकाणी आईचा पत्ता सापडला आणि अशोक शिरोळे, सुनील जाधव हे विजयला घेऊन तासगाव तालुक्यातील मांजर्डे गावात पोहोचले आणि ही १८ वर्षांची ताटातूट अखेर संपुष्टात आली.बहिणींची लग्नेही झालीविजयची आई छाया हिने माहेरी राहून काबाडकष्ट करून दोन्ही मुलींना मोठे केले. मुलगा कोठेतरी हरवून गेला आहे असे समजून त्यांनी चौकशी सोडली. सासरी दानोळीला येण्यास मनाईच होती आणि भाऊ या परिसरातच असताना दोन्ही बहिणींची लग्नेही झाली. त्यांचा संसार सुखात सुरू आहे. १८ वर्षांनंतर भेटलेल्या मुलाला पाहून आईच्या डोळ्यांत अश्रू आलेच, पण लेकीच्या लेकाला पाहून वृद्ध भामाबार्इंनाही आसवे रोखता आली नाहीत.