शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १८ वर्षांनंतर आई-मुलाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:01 IST

जहॉँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : तो सध्या राहत होता कागलमध्ये. त्याचे नातेवाईक कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावातील, तर आई माहेरी म्हणजे सांगली जिल्ह्यातील मांजर्डे गावात राहते. असे हे सर्वजण जवळपास असूनही तो गेली अठरा वर्षे ‘अनाथ’ म्हणून जीवन जगला. कागलमधील काही सामाजिक कार्यकर्ते त्याचे लग्न ठरविण्यासाठी त्याचे किमान रेशनकार्ड, आधारकार्ड ...

जहॉँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : तो सध्या राहत होता कागलमध्ये. त्याचे नातेवाईक कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावातील, तर आई माहेरी म्हणजे सांगली जिल्ह्यातील मांजर्डे गावात राहते. असे हे सर्वजण जवळपास असूनही तो गेली अठरा वर्षे ‘अनाथ’ म्हणून जीवन जगला. कागलमधील काही सामाजिक कार्यकर्ते त्याचे लग्न ठरविण्यासाठी त्याचे किमान रेशनकार्ड, आधारकार्ड काढण्यासाठी कागदपत्रे गोळा करीत असताना त्याच्या नातेवाइकांचा शोध लागला. तब्बल १८ वर्षांनंतर या आई-मुलाची आणि बहीण-भावाची भेट झाली. चित्रपटातील एका कथेप्रमाणे हा प्रवास घडला आहे विजय सुरेश उबाळे (मूळ गाव दानोळी, ता. हातकणंगले) या युवकाचा.१९९९ च्या सुमारास विजय याची आई छाया ही कौटुंबिक वादातून माहेरी मांजर्डे (ता. तासगाव, जि. सांगली) येथे निघून गेली. तिच्यासोबत त्याच्या दोन बहिणी शिल्पा आणि चैताली यादेखील गेल्या. तेव्हा विजय पाच ते सहा वर्षांचा असेल, तर बहिणींचे वय आठ आणि दुसरीचे दहा असे होते. वडिलांनी मुलगा म्हणून स्वत:कडे ठेवून घेतले. नंतर काही दिवसांत वडिलांचे निधन झाले. कौटुंबिक वाद इतका टोकाचा होता की, आई अंत्यविधीलाही येऊ शकली नाही. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर विजयला मिरजेच्या अनाथालयात ‘अनाथ’ म्हणून दाखल केले गेले. तेथून दोन वर्षांनंतर त्याची कोल्हापुरात बाल निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली. तेथे काही वर्षे गेल्यानंतर तो कणेरीवाडी येथील अनाथालयात आला. लहान वयात ‘अनाथ’ असल्याचा पक्का समज त्याच्या डोक्यात बसल्याने तसेच त्याच्याकडे कोण नातेवाईकही फिरकले नसल्याने विजय हादेखील सर्व विसरून गेला. बघता बघता ही दहा वर्षे निघून गेली. दहावी परीक्षेनंतर त्याला निरीक्षणगृहातून बाहेर पडावे लागले. कागलमध्ये बाल निरीक्षण गृह चालविणाऱ्या प्रशांत वाळवेकरांनी त्याला आधार दिला. ‘अनाथ’ म्हणून सर्वजण त्याला सहानुभूती दाखवत. वनमित्र संघटनेचे अशोक शिरोळे, सुनील जाधव, आदींनी त्याचे वय लक्षात घेऊन त्याचे लग्न करून द्यावे असा विचार केला. त्यासाठी त्याचे आधार कार्ड, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र बनविण्यासाठी कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात केली. तेव्हा बाल निरीक्षण गृहातील कागदपत्रे तपासता तपासता ते थेट पोहोचले सांगलीच्या शासकीय रुग्णालयात. तेथे त्याचा ‘दानोळी’ गावचा पत्ता मिळाला. दानोळीत गेल्यानंतर सर्व भाऊबंद सापडले, तर त्या ठिकाणी आईचा पत्ता सापडला आणि अशोक शिरोळे, सुनील जाधव हे विजयला घेऊन तासगाव तालुक्यातील मांजर्डे गावात पोहोचले आणि ही १८ वर्षांची ताटातूट अखेर संपुष्टात आली.बहिणींची लग्नेही झालीविजयची आई छाया हिने माहेरी राहून काबाडकष्ट करून दोन्ही मुलींना मोठे केले. मुलगा कोठेतरी हरवून गेला आहे असे समजून त्यांनी चौकशी सोडली. सासरी दानोळीला येण्यास मनाईच होती आणि भाऊ या परिसरातच असताना दोन्ही बहिणींची लग्नेही झाली. त्यांचा संसार सुखात सुरू आहे. १८ वर्षांनंतर भेटलेल्या मुलाला पाहून आईच्या डोळ्यांत अश्रू आलेच, पण लेकीच्या लेकाला पाहून वृद्ध भामाबार्इंनाही आसवे रोखता आली नाहीत.