शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

तब्बल १८ वर्षांनंतर आई-मुलाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 01:01 IST

जहॉँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : तो सध्या राहत होता कागलमध्ये. त्याचे नातेवाईक कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावातील, तर आई माहेरी म्हणजे सांगली जिल्ह्यातील मांजर्डे गावात राहते. असे हे सर्वजण जवळपास असूनही तो गेली अठरा वर्षे ‘अनाथ’ म्हणून जीवन जगला. कागलमधील काही सामाजिक कार्यकर्ते त्याचे लग्न ठरविण्यासाठी त्याचे किमान रेशनकार्ड, आधारकार्ड ...

जहॉँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : तो सध्या राहत होता कागलमध्ये. त्याचे नातेवाईक कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी गावातील, तर आई माहेरी म्हणजे सांगली जिल्ह्यातील मांजर्डे गावात राहते. असे हे सर्वजण जवळपास असूनही तो गेली अठरा वर्षे ‘अनाथ’ म्हणून जीवन जगला. कागलमधील काही सामाजिक कार्यकर्ते त्याचे लग्न ठरविण्यासाठी त्याचे किमान रेशनकार्ड, आधारकार्ड काढण्यासाठी कागदपत्रे गोळा करीत असताना त्याच्या नातेवाइकांचा शोध लागला. तब्बल १८ वर्षांनंतर या आई-मुलाची आणि बहीण-भावाची भेट झाली. चित्रपटातील एका कथेप्रमाणे हा प्रवास घडला आहे विजय सुरेश उबाळे (मूळ गाव दानोळी, ता. हातकणंगले) या युवकाचा.१९९९ च्या सुमारास विजय याची आई छाया ही कौटुंबिक वादातून माहेरी मांजर्डे (ता. तासगाव, जि. सांगली) येथे निघून गेली. तिच्यासोबत त्याच्या दोन बहिणी शिल्पा आणि चैताली यादेखील गेल्या. तेव्हा विजय पाच ते सहा वर्षांचा असेल, तर बहिणींचे वय आठ आणि दुसरीचे दहा असे होते. वडिलांनी मुलगा म्हणून स्वत:कडे ठेवून घेतले. नंतर काही दिवसांत वडिलांचे निधन झाले. कौटुंबिक वाद इतका टोकाचा होता की, आई अंत्यविधीलाही येऊ शकली नाही. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर विजयला मिरजेच्या अनाथालयात ‘अनाथ’ म्हणून दाखल केले गेले. तेथून दोन वर्षांनंतर त्याची कोल्हापुरात बाल निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली. तेथे काही वर्षे गेल्यानंतर तो कणेरीवाडी येथील अनाथालयात आला. लहान वयात ‘अनाथ’ असल्याचा पक्का समज त्याच्या डोक्यात बसल्याने तसेच त्याच्याकडे कोण नातेवाईकही फिरकले नसल्याने विजय हादेखील सर्व विसरून गेला. बघता बघता ही दहा वर्षे निघून गेली. दहावी परीक्षेनंतर त्याला निरीक्षणगृहातून बाहेर पडावे लागले. कागलमध्ये बाल निरीक्षण गृह चालविणाऱ्या प्रशांत वाळवेकरांनी त्याला आधार दिला. ‘अनाथ’ म्हणून सर्वजण त्याला सहानुभूती दाखवत. वनमित्र संघटनेचे अशोक शिरोळे, सुनील जाधव, आदींनी त्याचे वय लक्षात घेऊन त्याचे लग्न करून द्यावे असा विचार केला. त्यासाठी त्याचे आधार कार्ड, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र बनविण्यासाठी कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात केली. तेव्हा बाल निरीक्षण गृहातील कागदपत्रे तपासता तपासता ते थेट पोहोचले सांगलीच्या शासकीय रुग्णालयात. तेथे त्याचा ‘दानोळी’ गावचा पत्ता मिळाला. दानोळीत गेल्यानंतर सर्व भाऊबंद सापडले, तर त्या ठिकाणी आईचा पत्ता सापडला आणि अशोक शिरोळे, सुनील जाधव हे विजयला घेऊन तासगाव तालुक्यातील मांजर्डे गावात पोहोचले आणि ही १८ वर्षांची ताटातूट अखेर संपुष्टात आली.बहिणींची लग्नेही झालीविजयची आई छाया हिने माहेरी राहून काबाडकष्ट करून दोन्ही मुलींना मोठे केले. मुलगा कोठेतरी हरवून गेला आहे असे समजून त्यांनी चौकशी सोडली. सासरी दानोळीला येण्यास मनाईच होती आणि भाऊ या परिसरातच असताना दोन्ही बहिणींची लग्नेही झाली. त्यांचा संसार सुखात सुरू आहे. १८ वर्षांनंतर भेटलेल्या मुलाला पाहून आईच्या डोळ्यांत अश्रू आलेच, पण लेकीच्या लेकाला पाहून वृद्ध भामाबार्इंनाही आसवे रोखता आली नाहीत.