शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

वकिलांचे आंदोलन टायरी पेटवून

By admin | Updated: December 14, 2014 00:56 IST

महालोक अदालतवर बहिष्कार : २० वकिलांसह २७जण अटकेत

कोल्हापूर : प्रथम सर्किट बेंच व त्यानंतर उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ या मागणीसाठी आज, शनिवारी वकिलांनी टायर पेटवून व पक्षकारांच्या नोटिसा जाळून टाउन हॉल येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर आंदोलन केले; तसेच महालोक अदालतवर बहिष्कार टाकला. यावेळी येथे आलेल्या काही पक्षकारांनी तसेच शहरातील विविध पक्ष, संघटना यांच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा दर्शविला. यावेळी एका पक्षकाराची वकिलांबरोबर शाब्दिक चकमक झाली. त्यावरून वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान, जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी (पान ४ वर)पोलिसांनी २० वकिलांसह २७ जणांना अटक केली. कोल्हापूरसह सांगली, सातारा,रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी उच्च न्यायालयाचे खंडपीठ मागणीसाठी काल, शुक्रवारपासून वकिलांनी एक दिवसाचे काम बंद आंदोलन करून न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. आज, शनिवारी राष्ट्रीय महालोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सुमारे दहा वाजल्यापासून पक्षकार जिल्हा न्यायालयासमोर येऊ लागले. त्यावेळी वकिलांनी त्यांना खंडपीठाच्या आंदोलनास पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. त्यानुसार पक्षकारांनी वकिलांच्या विनंतीला मान देऊन महालोक अदालतच्या आलेल्या नोटिसा त्यांच्याकडे देऊन पाठिंबा दिला. त्यानंतर ११ वाजण्याच्या सुमारास सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनस्थळी आले. याठिकाणी कोणत्याही स्थितीत खंडपीठ झालेच पाहिजे, अशा घोषणा देत सर्वजण सीपीआर हॉस्पिटल चौक (चिमासाहेब महाराज चौक) येथे आले. सर्वांनी मानवी साखळी करून सुमारे दहा ते १५ मिनिटे ‘रास्ता रोको’ केला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली.त्यानंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सर्व आंदोलक पुन्हा जिल्हा न्यायालयाजवळ आले. त्यावेळी पक्षकार हरी नारायण कुलकर्णी (रा. हिरवडे खालसा, ता.करवीर) हे महालोक अदालतसाठी आले. त्यावेळी वकिलांनी त्यांना अडविले. यावरून वकील व त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली.‘मी लोकन्यायालयासाठी जाणारच’ असा आक्रमक पवित्रा कुलकर्णी यांनी घेतला. त्यावरून काही वकील व आंदोलकांनी त्यांना धक्काबुकी केली. हा प्रकार सुरू असताना पोलिसांनी त्यांच्या तावडीतून कुलकर्णी यांची सुटका केली. याच सुमारास आंदोलकांनी रस्त्यावर टायर व नोटिसा पेटवून संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक व जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे, उपाध्यक्ष अ‍ॅड. के. व्ही. पाटील, अ‍ॅड. राजेंद्र मंडलिक यांच्यासह २० वकील व सात सामाजिक कार्यकर्त्यांना अशा २७ जणांना ताब्यात घेतले. सर्वांना पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता झाली. पोलीस ठाण्याच्या येथून सर्वजण दसरा चौक,सीपीआरचौक मार्गे ‘वुई वॉन्ट खंडपीठ’अशा घोषणा देत आंदोलनस्थळी आले. यानंतर सायंकाळपर्यंत याच ठिकाणी थांबून होते.अटक केलेल्या वकिलांची नावे : विवेक घाटगे, राजेंद्र मंडलिक, के. व्ही. पाटील, माजी अध्यक्ष अजित मोहिते, प्रकाश मोरे, राजेंद्र किंकर, सुशांत गुडाळकर, समीर पाटील, सतीश खोतलांडे, तेहझीज नदाफ, आनंदराव जाधव, दीपक पिंपळे, पंडित सडोलीकर, योगेश साळोखे, मयांक बोरसे, सतीश कुणकेकर, विनोद सूर्यवंशी, नंदकुमार पा. पाटील, सागर पिसाळ, विजय महाजन यांच्यासह प्रसाद जाधव, जयदीप शेळके, सुरेश दिनकर गायकवाड. दरम्यान, या सर्वांवर लक्ष्पीपुरी पोलिसांकडून मुंबई पोलीस कायदा ६८-अ नुसार कारवाई करण्यात आली.यांनी दिला पाठिंबा...टोल समिती, पक्षकार जिल्हा महासंघ, यादवनगरमधील छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, कोल्हापूर जिल्हा धान्य व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष विनोद डुणूंग, मराठी चित्रपट महामंडळाचे सदस्य मंगेश मंगेशकर, ‘एआयबीएसएनएल’चे महाराष्ट्र अध्यक्ष व सीएओ के. ए. मोहिरे, बीएसएनएल लेबर अ‍ॅँड कॉन्ट्रॅक्टर लेबर असोसिएशन यांच्यासह विविध पक्ष, संघटनांमधील कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला.