शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गुंतवणुकीशिवाय शेतीत फायदा अशक्य

By admin | Updated: June 27, 2016 01:14 IST

मुख्यमंत्री फडणवीस : ‘शाहू’च्या सहकार्याने सिंचनाचा पथदर्शी प्रकल्प

कोल्हापूर : ज्या क्षेत्रावर सध्या ५५ टक्के लोकसंख्या अवलंबून आहे, त्या शेती क्षेत्राचा सकल उत्पादनातील हिस्सा जेमतेम अकरा टक्के आहे. आतापर्यंत आपण शेतीला फक्त कर्ज देत आलो आहोत. त्यामध्ये भांडवली गुंतवणूक केलेली नाही. यापुढे शेतीत गुंतवणूक केल्याशिवाय ती फायद्याची होणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कागल येथे केले. आजच्या महाराष्ट्रापुढील शेती व दुष्काळाचे सगळे प्रश्न सोडविण्याची ताकद राजर्र्षी शाहूंच्या विचारांमध्ये असल्याचे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी या समारंभात काढले.शाहू कारखान्यावर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या पुढाकाराने हा मेळावा झाला. ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती; परंतु तशी कोणतीही राजकीय चर्चा यावेळी झाली नाही. स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रेरणेतून कागल शहरात उभारण्यात आलेल्या राममंदिराचा लोकार्पण सोहळा आणि शेतकरी मेळावा असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. कारखाना कार्यस्थळावरील सभामंडपात हा दिमाखदार सोहळा झाला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘अज्ञान, कमी जमीनधारणा, भांडवलाची कमतरता आणि बाजाराची सोय नाही या शेतीपुढील खऱ्या अडचणी आहेत, हे राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी ओळखले होते. आजच्या महाराष्ट्राची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. तंत्रज्ञान नसल्याने शेती परडवत नाही. आम्ही कर्ज देतो; परंतु शेतीत गुंतवणूक करत नाही. शेती खऱ्या अर्थाने ३५ टक्के लोकांनाच रोजगार देते; परंतु अन्य २० टक्के लोकांना दुसरे काही काम नसल्याने त्यांचा भार शेतीवर आहे. हा भार कमी करून तिला सेवा आणि उद्योग क्षेत्रांशी जोडल्यावरच शेती परवडेल.’ (प्रतिनिधी)साखर उद्योगाची पुनर्रचना करा साखर कारखानदारीने ‘साखर’ हा बायप्रॉडक्ट (उपपदार्थ) समजून या उद्योगाची पुनर्रचना केल्याशिवाय यापुढील काळात शेतकऱ्यांना एफआरपी देणे शक्य होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी इथेनॉलसह उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधले पाहिजेत.’ मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘विक्रमसिंह घाटगे यांच्या दूरदृष्टीमुळे शाहू कारखान्याने उपसा सिंचन योजना उभारल्या व त्या फायद्यात आणून चालवून दाखविल्या. हा प्रयोग राज्यभर नेण्यासाठी सूक्ष्म सिंचनामध्ये ‘शाहू’चे सहकार्य घेऊन राज्य शासन आणि ‘नाबार्ड’च्या मदतीने पथदर्शी प्रकल्प आम्ही राबवू.’‘मी तर छत्रपतींचा सेवक’मुख्यमंत्री झाल्यावर मी छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक झालो. त्यांच्या विचारानेच काम करण्याचा संकल्प केला. मी त्यांचा सेवक आहे. संभाजीराजे यांच्या खासदारपदी निवडीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्याच सेवकाच्या भूमिकेतून केवळ लखोटा घेऊन जाण्याचे काम केले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कागलमध्ये लगावला. छत्रपतींनी पेशव्यांची नियुक्ती केली आणि पेशव्यांनी फडणवीस नेमले. परंतु, इथे तर फडणवीस यांनीच छत्रपतींची नियुक्ती केल्याची टीका संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीबद्दल शनिवारी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी केली होती. त्यास मुख्यमंत्र्यांनी असे प्रत्युत्तर दिले. संभाजीराजेंची नियुक्ती ही पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनी शाहूंच्या विचारांचा सन्मान म्हणून केली असल्याचेही त्यांनी सांगितले.