शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

गुंतवणुकीशिवाय शेतीत फायदा अशक्य

By admin | Updated: June 27, 2016 01:14 IST

मुख्यमंत्री फडणवीस : ‘शाहू’च्या सहकार्याने सिंचनाचा पथदर्शी प्रकल्प

कोल्हापूर : ज्या क्षेत्रावर सध्या ५५ टक्के लोकसंख्या अवलंबून आहे, त्या शेती क्षेत्राचा सकल उत्पादनातील हिस्सा जेमतेम अकरा टक्के आहे. आतापर्यंत आपण शेतीला फक्त कर्ज देत आलो आहोत. त्यामध्ये भांडवली गुंतवणूक केलेली नाही. यापुढे शेतीत गुंतवणूक केल्याशिवाय ती फायद्याची होणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कागल येथे केले. आजच्या महाराष्ट्रापुढील शेती व दुष्काळाचे सगळे प्रश्न सोडविण्याची ताकद राजर्र्षी शाहूंच्या विचारांमध्ये असल्याचे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी या समारंभात काढले.शाहू कारखान्यावर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या पुढाकाराने हा मेळावा झाला. ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती; परंतु तशी कोणतीही राजकीय चर्चा यावेळी झाली नाही. स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रेरणेतून कागल शहरात उभारण्यात आलेल्या राममंदिराचा लोकार्पण सोहळा आणि शेतकरी मेळावा असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. कारखाना कार्यस्थळावरील सभामंडपात हा दिमाखदार सोहळा झाला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘अज्ञान, कमी जमीनधारणा, भांडवलाची कमतरता आणि बाजाराची सोय नाही या शेतीपुढील खऱ्या अडचणी आहेत, हे राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी ओळखले होते. आजच्या महाराष्ट्राची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. तंत्रज्ञान नसल्याने शेती परडवत नाही. आम्ही कर्ज देतो; परंतु शेतीत गुंतवणूक करत नाही. शेती खऱ्या अर्थाने ३५ टक्के लोकांनाच रोजगार देते; परंतु अन्य २० टक्के लोकांना दुसरे काही काम नसल्याने त्यांचा भार शेतीवर आहे. हा भार कमी करून तिला सेवा आणि उद्योग क्षेत्रांशी जोडल्यावरच शेती परवडेल.’ (प्रतिनिधी)साखर उद्योगाची पुनर्रचना करा साखर कारखानदारीने ‘साखर’ हा बायप्रॉडक्ट (उपपदार्थ) समजून या उद्योगाची पुनर्रचना केल्याशिवाय यापुढील काळात शेतकऱ्यांना एफआरपी देणे शक्य होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी इथेनॉलसह उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधले पाहिजेत.’ मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘विक्रमसिंह घाटगे यांच्या दूरदृष्टीमुळे शाहू कारखान्याने उपसा सिंचन योजना उभारल्या व त्या फायद्यात आणून चालवून दाखविल्या. हा प्रयोग राज्यभर नेण्यासाठी सूक्ष्म सिंचनामध्ये ‘शाहू’चे सहकार्य घेऊन राज्य शासन आणि ‘नाबार्ड’च्या मदतीने पथदर्शी प्रकल्प आम्ही राबवू.’‘मी तर छत्रपतींचा सेवक’मुख्यमंत्री झाल्यावर मी छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक झालो. त्यांच्या विचारानेच काम करण्याचा संकल्प केला. मी त्यांचा सेवक आहे. संभाजीराजे यांच्या खासदारपदी निवडीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्याच सेवकाच्या भूमिकेतून केवळ लखोटा घेऊन जाण्याचे काम केले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कागलमध्ये लगावला. छत्रपतींनी पेशव्यांची नियुक्ती केली आणि पेशव्यांनी फडणवीस नेमले. परंतु, इथे तर फडणवीस यांनीच छत्रपतींची नियुक्ती केल्याची टीका संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीबद्दल शनिवारी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी केली होती. त्यास मुख्यमंत्र्यांनी असे प्रत्युत्तर दिले. संभाजीराजेंची नियुक्ती ही पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनी शाहूंच्या विचारांचा सन्मान म्हणून केली असल्याचेही त्यांनी सांगितले.