शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणुकीशिवाय शेतीत फायदा अशक्य

By admin | Updated: June 27, 2016 01:14 IST

मुख्यमंत्री फडणवीस : ‘शाहू’च्या सहकार्याने सिंचनाचा पथदर्शी प्रकल्प

कोल्हापूर : ज्या क्षेत्रावर सध्या ५५ टक्के लोकसंख्या अवलंबून आहे, त्या शेती क्षेत्राचा सकल उत्पादनातील हिस्सा जेमतेम अकरा टक्के आहे. आतापर्यंत आपण शेतीला फक्त कर्ज देत आलो आहोत. त्यामध्ये भांडवली गुंतवणूक केलेली नाही. यापुढे शेतीत गुंतवणूक केल्याशिवाय ती फायद्याची होणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कागल येथे केले. आजच्या महाराष्ट्रापुढील शेती व दुष्काळाचे सगळे प्रश्न सोडविण्याची ताकद राजर्र्षी शाहूंच्या विचारांमध्ये असल्याचे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी या समारंभात काढले.शाहू कारखान्यावर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या पुढाकाराने हा मेळावा झाला. ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती; परंतु तशी कोणतीही राजकीय चर्चा यावेळी झाली नाही. स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रेरणेतून कागल शहरात उभारण्यात आलेल्या राममंदिराचा लोकार्पण सोहळा आणि शेतकरी मेळावा असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. कारखाना कार्यस्थळावरील सभामंडपात हा दिमाखदार सोहळा झाला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘अज्ञान, कमी जमीनधारणा, भांडवलाची कमतरता आणि बाजाराची सोय नाही या शेतीपुढील खऱ्या अडचणी आहेत, हे राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी ओळखले होते. आजच्या महाराष्ट्राची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. तंत्रज्ञान नसल्याने शेती परडवत नाही. आम्ही कर्ज देतो; परंतु शेतीत गुंतवणूक करत नाही. शेती खऱ्या अर्थाने ३५ टक्के लोकांनाच रोजगार देते; परंतु अन्य २० टक्के लोकांना दुसरे काही काम नसल्याने त्यांचा भार शेतीवर आहे. हा भार कमी करून तिला सेवा आणि उद्योग क्षेत्रांशी जोडल्यावरच शेती परवडेल.’ (प्रतिनिधी)साखर उद्योगाची पुनर्रचना करा साखर कारखानदारीने ‘साखर’ हा बायप्रॉडक्ट (उपपदार्थ) समजून या उद्योगाची पुनर्रचना केल्याशिवाय यापुढील काळात शेतकऱ्यांना एफआरपी देणे शक्य होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी इथेनॉलसह उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधले पाहिजेत.’ मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘विक्रमसिंह घाटगे यांच्या दूरदृष्टीमुळे शाहू कारखान्याने उपसा सिंचन योजना उभारल्या व त्या फायद्यात आणून चालवून दाखविल्या. हा प्रयोग राज्यभर नेण्यासाठी सूक्ष्म सिंचनामध्ये ‘शाहू’चे सहकार्य घेऊन राज्य शासन आणि ‘नाबार्ड’च्या मदतीने पथदर्शी प्रकल्प आम्ही राबवू.’‘मी तर छत्रपतींचा सेवक’मुख्यमंत्री झाल्यावर मी छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक झालो. त्यांच्या विचारानेच काम करण्याचा संकल्प केला. मी त्यांचा सेवक आहे. संभाजीराजे यांच्या खासदारपदी निवडीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्याच सेवकाच्या भूमिकेतून केवळ लखोटा घेऊन जाण्याचे काम केले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कागलमध्ये लगावला. छत्रपतींनी पेशव्यांची नियुक्ती केली आणि पेशव्यांनी फडणवीस नेमले. परंतु, इथे तर फडणवीस यांनीच छत्रपतींची नियुक्ती केल्याची टीका संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीबद्दल शनिवारी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी केली होती. त्यास मुख्यमंत्र्यांनी असे प्रत्युत्तर दिले. संभाजीराजेंची नियुक्ती ही पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनी शाहूंच्या विचारांचा सन्मान म्हणून केली असल्याचेही त्यांनी सांगितले.