शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गुंतवणुकीशिवाय शेतीत फायदा अशक्य

By admin | Updated: June 27, 2016 01:14 IST

मुख्यमंत्री फडणवीस : ‘शाहू’च्या सहकार्याने सिंचनाचा पथदर्शी प्रकल्प

कोल्हापूर : ज्या क्षेत्रावर सध्या ५५ टक्के लोकसंख्या अवलंबून आहे, त्या शेती क्षेत्राचा सकल उत्पादनातील हिस्सा जेमतेम अकरा टक्के आहे. आतापर्यंत आपण शेतीला फक्त कर्ज देत आलो आहोत. त्यामध्ये भांडवली गुंतवणूक केलेली नाही. यापुढे शेतीत गुंतवणूक केल्याशिवाय ती फायद्याची होणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कागल येथे केले. आजच्या महाराष्ट्रापुढील शेती व दुष्काळाचे सगळे प्रश्न सोडविण्याची ताकद राजर्र्षी शाहूंच्या विचारांमध्ये असल्याचे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी या समारंभात काढले.शाहू कारखान्यावर आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या पुढाकाराने हा मेळावा झाला. ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती; परंतु तशी कोणतीही राजकीय चर्चा यावेळी झाली नाही. स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रेरणेतून कागल शहरात उभारण्यात आलेल्या राममंदिराचा लोकार्पण सोहळा आणि शेतकरी मेळावा असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. कारखाना कार्यस्थळावरील सभामंडपात हा दिमाखदार सोहळा झाला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘अज्ञान, कमी जमीनधारणा, भांडवलाची कमतरता आणि बाजाराची सोय नाही या शेतीपुढील खऱ्या अडचणी आहेत, हे राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी ओळखले होते. आजच्या महाराष्ट्राची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. तंत्रज्ञान नसल्याने शेती परडवत नाही. आम्ही कर्ज देतो; परंतु शेतीत गुंतवणूक करत नाही. शेती खऱ्या अर्थाने ३५ टक्के लोकांनाच रोजगार देते; परंतु अन्य २० टक्के लोकांना दुसरे काही काम नसल्याने त्यांचा भार शेतीवर आहे. हा भार कमी करून तिला सेवा आणि उद्योग क्षेत्रांशी जोडल्यावरच शेती परवडेल.’ (प्रतिनिधी)साखर उद्योगाची पुनर्रचना करा साखर कारखानदारीने ‘साखर’ हा बायप्रॉडक्ट (उपपदार्थ) समजून या उद्योगाची पुनर्रचना केल्याशिवाय यापुढील काळात शेतकऱ्यांना एफआरपी देणे शक्य होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी इथेनॉलसह उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधले पाहिजेत.’ मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘विक्रमसिंह घाटगे यांच्या दूरदृष्टीमुळे शाहू कारखान्याने उपसा सिंचन योजना उभारल्या व त्या फायद्यात आणून चालवून दाखविल्या. हा प्रयोग राज्यभर नेण्यासाठी सूक्ष्म सिंचनामध्ये ‘शाहू’चे सहकार्य घेऊन राज्य शासन आणि ‘नाबार्ड’च्या मदतीने पथदर्शी प्रकल्प आम्ही राबवू.’‘मी तर छत्रपतींचा सेवक’मुख्यमंत्री झाल्यावर मी छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक झालो. त्यांच्या विचारानेच काम करण्याचा संकल्प केला. मी त्यांचा सेवक आहे. संभाजीराजे यांच्या खासदारपदी निवडीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्याच सेवकाच्या भूमिकेतून केवळ लखोटा घेऊन जाण्याचे काम केले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कागलमध्ये लगावला. छत्रपतींनी पेशव्यांची नियुक्ती केली आणि पेशव्यांनी फडणवीस नेमले. परंतु, इथे तर फडणवीस यांनीच छत्रपतींची नियुक्ती केल्याची टीका संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीबद्दल शनिवारी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी केली होती. त्यास मुख्यमंत्र्यांनी असे प्रत्युत्तर दिले. संभाजीराजेंची नियुक्ती ही पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांनी शाहूंच्या विचारांचा सन्मान म्हणून केली असल्याचेही त्यांनी सांगितले.