शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

गळतीचा फायदा कर्नाटकला

By admin | Updated: December 30, 2015 00:25 IST

बरगे घालूनही गळती : राजापूर बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाया

संदीप बावचे -- शिरोळराजापूर (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातून अद्यापही लाखो लिटर पाणी कर्नाटकच्या दिशेने वाहत आहे. सांगली पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच अद्यापही सर्वच बरग्यांतून लाखो लिटर पाणी वाहून जात आहे.गळतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने कर्नाटकातील गावांना याचा फायदा होत आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांचा यावर्षी तरी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता आहे.राजापूर बंधारा हा कृष्णा नदीवरील व शिरोळ तालुक्यातील शेवटचा बंधारा आहे. या बंधाऱ्याला पाणी तटवून तालुक्यातील बहुतांशी गावांना शेती व पिण्याच्या पाण्यासह इचलकरंजी शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो. या बंधाऱ्यावर सांगली पाटबंधारे विभागाचे नियंत्रण आहे. प्रत्येकवर्षी उन्हाळ््यात पाणी सोडण्यावरून वाद निर्माण होतो. सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असताना साडेनऊ फुटांपर्यंत पाणी तटवून ठेवणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतरच पाटबंधारे विभागाचे अधिकारी जागे होतात, अशी वस्तुस्थिती आहे. आमदार उल्हास पाटील यांच्या आदेशानंतर पाटबंधारे विभागाला जाग आली. त्यानंतर बरगे घालण्यात आले आहेत. मात्र, या बरग्यांतून मोठ्या प्रमाणात पाणी कर्नाटकच्या दिशेने वाहत आहे. बंधाऱ्याला एकूण ६५ दरवाजे असून, पाटबंधारा विभागाने लोखंडी व लाकडी बरगे घातलेले आहेत. मात्र, योग्य नियोजनाअभावी सर्वच दरवाजांतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. या गळतीचे अधिकाऱ्यांकडून गांभीर्य न घेतल्याने पाणी असेच वाहत राहिले, तर शिरोळ तालुक्याला शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी भविष्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती पाहून किमान मोठी गळती थांबविण्याचे व त्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. बंधाऱ्यावर लोखंडी बरगे घालण्यासाठी खा. राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, अपुऱ्या निधीमुळे चांगल्या पद्धतीची बरगे याठिकाणी बसले नाहीत.आमदारांनी वेधले लक्षपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाल्याची दखल घेत राजापूर बंधाऱ्याच्या प्रश्नाबाबतचे निवेदन आ. उल्हास पाटील यांनी विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे कार्यवाहीसाठी दिले आहे. पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे बंधाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. एका बाजूला राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना बंधाऱ्यातील गळतीतून लाखो लिटर पाणी कर्नाटक राज्यात वाया जात असल्याचे अधिवेशनात आमदार पाटील यांनी लक्ष वेधले.