शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

गळतीचा फायदा कर्नाटकला

By admin | Updated: December 30, 2015 00:25 IST

बरगे घालूनही गळती : राजापूर बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाया

संदीप बावचे -- शिरोळराजापूर (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातून अद्यापही लाखो लिटर पाणी कर्नाटकच्या दिशेने वाहत आहे. सांगली पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच अद्यापही सर्वच बरग्यांतून लाखो लिटर पाणी वाहून जात आहे.गळतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने कर्नाटकातील गावांना याचा फायदा होत आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांचा यावर्षी तरी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता आहे.राजापूर बंधारा हा कृष्णा नदीवरील व शिरोळ तालुक्यातील शेवटचा बंधारा आहे. या बंधाऱ्याला पाणी तटवून तालुक्यातील बहुतांशी गावांना शेती व पिण्याच्या पाण्यासह इचलकरंजी शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो. या बंधाऱ्यावर सांगली पाटबंधारे विभागाचे नियंत्रण आहे. प्रत्येकवर्षी उन्हाळ््यात पाणी सोडण्यावरून वाद निर्माण होतो. सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असताना साडेनऊ फुटांपर्यंत पाणी तटवून ठेवणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतरच पाटबंधारे विभागाचे अधिकारी जागे होतात, अशी वस्तुस्थिती आहे. आमदार उल्हास पाटील यांच्या आदेशानंतर पाटबंधारे विभागाला जाग आली. त्यानंतर बरगे घालण्यात आले आहेत. मात्र, या बरग्यांतून मोठ्या प्रमाणात पाणी कर्नाटकच्या दिशेने वाहत आहे. बंधाऱ्याला एकूण ६५ दरवाजे असून, पाटबंधारा विभागाने लोखंडी व लाकडी बरगे घातलेले आहेत. मात्र, योग्य नियोजनाअभावी सर्वच दरवाजांतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. या गळतीचे अधिकाऱ्यांकडून गांभीर्य न घेतल्याने पाणी असेच वाहत राहिले, तर शिरोळ तालुक्याला शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी भविष्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती पाहून किमान मोठी गळती थांबविण्याचे व त्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. बंधाऱ्यावर लोखंडी बरगे घालण्यासाठी खा. राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, अपुऱ्या निधीमुळे चांगल्या पद्धतीची बरगे याठिकाणी बसले नाहीत.आमदारांनी वेधले लक्षपाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाल्याची दखल घेत राजापूर बंधाऱ्याच्या प्रश्नाबाबतचे निवेदन आ. उल्हास पाटील यांनी विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे कार्यवाहीसाठी दिले आहे. पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे बंधाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. एका बाजूला राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना बंधाऱ्यातील गळतीतून लाखो लिटर पाणी कर्नाटक राज्यात वाया जात असल्याचे अधिवेशनात आमदार पाटील यांनी लक्ष वेधले.