शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

प्रवेश अर्ज १६ जूनपासून मिळणार

By admin | Updated: June 9, 2016 01:23 IST

अकरावी प्रवेश वेळापत्रक जाहीर : शहरातील ३२ महाविद्यालयांत प्रक्रिया

कोल्हापूर : महाविद्यालयीन प्रवेशाचा पहिला टप्पा असणाऱ्या अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची सुरुवात १६ जूनपासून होणार आहे. शहरातील ३२ महाविद्यालयांमध्ये ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत पालक आणि विद्यार्थ्यांच्या प्रबोधनाचे वर्ग रविवार (दि. १२) पासून सुरू होतील. या प्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे अध्यक्ष व शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी सांगितले.कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया वेगळी आहे. यात शहरातील मराठी, इंग्रजी माध्यमांची ३२ कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यांची एकत्रित प्रवेश क्षमता १३५०० आहे. दहावीच्या टक्केवारीवर प्रवेशाची सूत्रे निश्चित केली असल्याने समितीकडून वाढीव प्रवेश क्षमतेचे नियोजन करण्यात येईल. ‘एमसीव्हीसी’ अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही. प्रवेश प्रक्रियेबाबत लिपिक, शिक्षक आणि अर्ज वितरण-संकलन केंद्रांवरील अधिकारी, कर्मचारी तसेच दहावी उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचे उद्बोधन वर्ग रविवार (दि. १२) ते मंगळवारपर्यंत (दि. १४) घेण्यात येणार आहेत. अकरावीचे वर्ग ११ जुलैपासून सुरू होणार असल्याचे गोंधळी यांनी सांगितले. दरम्यान, यावर्षी शहरातील विविध शाळांमधील नियमित व पुनर्परीक्षार्थी असे एकूण ७९४९ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. शहरालगतच्या काही तालुक्यांतूनही विद्यार्थी शहरातील महाविद्यालयांत अकरावीसाठी प्रवेशित होतात. त्यांचे प्रमाण आणि अकरावी प्रवेशाची सध्याची क्षमता लक्षात घेता विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी फारसा ताण घेण्याची गरज नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)निवड यादीनंतर ‘अ‍ॅप’वर माहितीयावर्षी पहिल्यांदाच शहरातील महाविद्यालयांची यादी, अनुदानित-विनाअनुदानित महाविद्यालये, तेथील प्रवेश क्षमता, वसतिगृहांची सुविधा, आदी स्वरूपांतील माहिती मोबाईल अ‍ॅपवर दिली जाणार आहे. प्रवेशाची निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर टप्प्याटप्प्यांने माहिती देण्यात येणार असल्याचे माहिती समितीचे कार्याध्यक्ष डॉ. व्ही. बी. हेळवी यांनी दिली.