शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

बिद्री कारखान्यावर प्रशासक नेमा

By admin | Updated: June 6, 2015 00:28 IST

प्रकाश आबीटकर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार

कोल्हापूर : दूधगंगा-वेदगंगा साखर कारखाना, बिद्री (ता. कागल)च्या वाढीव १७ हजार सभासदांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जुलैमध्ये अपेक्षित आहे, तोपर्यंत कारखान्याची निवडणूक घेता येणार नाही. संचालकांची मुदत ३१ मे रोजी संपलेली आहे, नवीन घटना दुरुस्तीनुसार संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्ती करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबीटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आबीटकर म्हणाले, कोट्यवधी रुपयांची शेतकऱ्यांची देणी आहेत, कामगारांचे पगार नाहीत, व्यापाऱ्यांचे पैसे द्यायचे आहेत, असे असताना सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल करून वकील फीवर १ कोटी रुपये तर उच्च न्यायालयातील वकील खर्च वीस लाख रुपये खर्च केले. ५६ कोटींचे देणी असताना कारखान्याने जिल्हा बँकेकडे पुन्हा २१ कोटींचे मध्यम मुदत कर्ज घेण्याचा प्रस्ताव दिला आहे पण मुळात ४५ कोटींनी कारखाना शॉर्टमार्जिनमध्ये असताना पुन्हा मध्यम मुदत कर्ज देऊ नये, अशी मागणी नाबार्ड व जिल्हा बँकेला करणार आहे. संचालक मंडळावर आठ दिवसांत कारवाई झाली नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आम्ही भेटणार आहोत. यावेळी माजी आमदार दिनकरराव जाधव, बाबूराव देसाई, मधुकर देसाई, बाबासाहेब पाटील, सत्यजित जाधव, रावसाहेब चौगले आदी उपस्थित होते.मांत्रिकावर सव्वासात लाखांचा खर्चकारखान्याच्या इमारतीचा वास्तुदोष निवारण्यासाठी ७ लाख २२ हजार खर्च एका मांत्रिकावर करणाऱ्या बिद्री साखर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून ‘उत्कृष्ट तांत्रिकते’चा पुरस्कार दिला जातो. याचा उल्लेख लेखापरीक्षण अहवालात केला आहे. ही बाब हास्यास्पद असून, असे पुरस्कार देणाऱ्या ‘वसंतदादा शुगर’चे डोके ठिकाणावर आहे काय? अशी घणाघाती टीका मारुतराव जाधव-तळाशीकर यांनी पत्रकार परिषदेत केली. संबंधितांवर अंधश्रद्धा निर्र्मूलन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहे. ‘सहवीज’मध्ये ३० कोटी फटका !१ मेगावॅट सहवीज प्रकल्पासाठी ४ कोटी खर्च येतो. ‘बिद्री’ने २० मेगावॅटसाठी १३० कोटी रुपये खर्च केले. त्यामध्ये १८ कोटी जादा खर्च झाला. एक वर्षात प्रकल्प पूर्ण न झाल्याने १२ कोटी व्याजाचा फटका कारखान्याला सहन करावा लागला. असा गलथान कारभार करणाऱ्यांना खुर्चीवर राहण्याचा अधिकार नसल्याचे मारुतराव जाधव यांनी सांगितले. केवळ ३९ सभासद पात्र