शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

खाद्यतेलाचा अतिरिक्त साठा जप्त

By admin | Updated: October 24, 2015 00:21 IST

जिल्हा पुरवठा विभागाची कारवाई : कागलच्या बरकत नायकवडी यांच्यावर गुन्हा दाखल

कागल/कोल्हापूर : खाद्यतेलाचा मर्यादेपेक्षा अतिरिक्त साठा केल्याप्रकरणी कागल येथील बरकत नायकवडी यांच्यावर गुरुवारी (दि. २२) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पुरवठा विभागाने छापा टाकून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे खाद्यतेल जप्त केले. इचलकरंजी येथे तपासणीवेळी परवाना न दाखविलेल्या डाळ आणि खाद्यतेलाची चार दुकाने सील करण्यात आली. शुक्रवारी पुरवठा विभागाकडून शहरात विविध ठिकाणी छापे टाकून दुकाने व गोदामांची तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दिवाळीपर्यंत ही धडक कारवाई सुरू राहणार आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.खाद्यतेल, डाळ आणि खाद्यतेल बियांचा मर्यादेपेक्षा अतिरिक्त साठा केला असल्याच्या संशयावरून जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील परवानाधारकांची दुकाने, गोदामांवर बुधवार (दि. २१)पासून छापे टाकून धडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. यामध्ये आतापर्यंत अदानी विल्मर लिमिटेड व गोल्डन व्हॅली अ‍ॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या उजळाईवाडी (ता. करवीर) येथील भाडेतत्त्वावरील गोदामात एकत्रित सुमारे ९५ लाख रुपयांच्या खाद्यतेलाचा अतिरिक्त साठा सापडला. पुरवठा कार्यालयाने जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी या खाद्यतेलाचा साठा ताब्यात घेतला. याबाबत या कंपन्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुरवठा विभागाने गुरुवारी कागल येथे धडक कारवाई केली. यामध्ये किरकोळ खाद्यतेल परवानाधारक बरकत नायकवडी यांच्याकडे मर्यादेपेक्षा म्हणजे २० क्विंटलपेक्षा अधिक २८.६१ क्विंटल इतका साठा आढळल्याने तो ताब्यात घेण्यात आला. याबाबत त्यांच्याविरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत क-७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी प्रांत मोनिका सिंह, तहसीलदार शांताराम सांगडे उपस्थित होते. इचलकरंजी येथे तपासणीवेळी परवाना उपलब्ध करून न दिल्याबद्दल खाद्यतेलाची दोन व डाळीची दोन दुकाने सील केली. जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. शुक्रवारीही रात्री उशिरापर्यंत शाहू मार्केट यार्डसह शहराच्या विविध भागांतील दुकाने व गोदामांची तपासणी सुरू होती. (प्रतिनिधी)