शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर आता ‘तक्रार निवारणा’ची जबाबदारी

By admin | Updated: May 23, 2017 01:09 IST

पुरवठा विभागासंदर्भात एक तक्रार दाखल, पुढील कार्यवाही सुरू

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : अन्नधान्य आणि आहार वितरणासंदर्भातील तक्रारी जलदगतीने निर्गत होण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी ‘जिल्हा तक्रार निवारण अधिकारी’ नियुक्त केला आहे. त्याची जबाबदारी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. कोल्हापूरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आतापर्यंत पुरवठा विभागाशी संबंधित एक तक्रार दाखल झाली आहे.पुरवठा विभागाशी संबंधित तक्रारींचे निर्गतीकरण लवकर होण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची ‘जिल्हा तक्रार निवारण अधिकारी’यांच्याकडे स्वतंत्ररित्या ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. यासंदर्भात शासनाने ७ एप्रिल २०१७ ला शासननिर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ही नियुक्ती फक्त पुरवठा विभागाच्या तक्रारींसाठीच करण्यात आली आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत राज्यातील जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी अधिनियमाच्या ‘कलम १५’ अन्वये संबंधित जिल्ह्यातील अन्न सुरक्षा योजनेशी संबंधित नसलेल्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची ‘जिल्हा तक्रार निवारण अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये कोल्हापूरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे आतापर्यंत एक तक्रार दाखल झाली असून त्यावर पुढील कार्यवाही सुरू आहे.पुरवठा विभागाशी संबंधित तक्रारी या तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे दाखल करायच्या असून त्यावर सुनावणी घेऊन त्यांनी यावर निर्णय द्यायचा आहे. अशी या पदाची रचना करण्यात आली आहे. पुरवठा विभाग म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणाली ही सर्वसामान्य घटकांशी निगडित आहे. या प्रणालीचा परिघ मोठा असल्याने दररोज या प्रणालीशी अनेक लोकांचा संपर्क येत असतो. तसेच अनेक अडचणी, समस्या व अन्यायाही सामोरे जावे लागते. त्यामुळे दाद मागायची कोणाकडे हा प्रश्न सर्वसामान्यांना पडायचा. या नवीन नियुक्तीमुळे पुरवठा विभागातील तक्रारींबद्दल दाद मागण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.पुरवठा विभागाशी तक्रारींसंदर्भात निवारण करण्यासाठी आपली ‘जिल्हा तक्रार निवारण अधिकारी’ म्हणून नियुक्ती केली आहे. महिन्याभरात आपल्याकडे एक तक्रार झाली असून त्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. - नंदकुमार काटकर, अप्पर जिल्हाधिकारी