शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर आता ‘तक्रार निवारणा’ची जबाबदारी

By admin | Updated: May 23, 2017 01:09 IST

पुरवठा विभागासंदर्भात एक तक्रार दाखल, पुढील कार्यवाही सुरू

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : अन्नधान्य आणि आहार वितरणासंदर्भातील तक्रारी जलदगतीने निर्गत होण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी ‘जिल्हा तक्रार निवारण अधिकारी’ नियुक्त केला आहे. त्याची जबाबदारी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. कोल्हापूरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आतापर्यंत पुरवठा विभागाशी संबंधित एक तक्रार दाखल झाली आहे.पुरवठा विभागाशी संबंधित तक्रारींचे निर्गतीकरण लवकर होण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची ‘जिल्हा तक्रार निवारण अधिकारी’यांच्याकडे स्वतंत्ररित्या ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. यासंदर्भात शासनाने ७ एप्रिल २०१७ ला शासननिर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. ही नियुक्ती फक्त पुरवठा विभागाच्या तक्रारींसाठीच करण्यात आली आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत राज्यातील जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी अधिनियमाच्या ‘कलम १५’ अन्वये संबंधित जिल्ह्यातील अन्न सुरक्षा योजनेशी संबंधित नसलेल्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची ‘जिल्हा तक्रार निवारण अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये कोल्हापूरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे आतापर्यंत एक तक्रार दाखल झाली असून त्यावर पुढील कार्यवाही सुरू आहे.पुरवठा विभागाशी संबंधित तक्रारी या तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे दाखल करायच्या असून त्यावर सुनावणी घेऊन त्यांनी यावर निर्णय द्यायचा आहे. अशी या पदाची रचना करण्यात आली आहे. पुरवठा विभाग म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणाली ही सर्वसामान्य घटकांशी निगडित आहे. या प्रणालीचा परिघ मोठा असल्याने दररोज या प्रणालीशी अनेक लोकांचा संपर्क येत असतो. तसेच अनेक अडचणी, समस्या व अन्यायाही सामोरे जावे लागते. त्यामुळे दाद मागायची कोणाकडे हा प्रश्न सर्वसामान्यांना पडायचा. या नवीन नियुक्तीमुळे पुरवठा विभागातील तक्रारींबद्दल दाद मागण्याचा मार्ग सुलभ झाला आहे.पुरवठा विभागाशी तक्रारींसंदर्भात निवारण करण्यासाठी आपली ‘जिल्हा तक्रार निवारण अधिकारी’ म्हणून नियुक्ती केली आहे. महिन्याभरात आपल्याकडे एक तक्रार झाली असून त्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. - नंदकुमार काटकर, अप्पर जिल्हाधिकारी