शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोईल गावचा ‘आदर्श गणेशा’ --प्राचीन परंपरा

By admin | Updated: September 6, 2016 23:44 IST

: ‘एक गाव-एक गणपती’, मंदिरातच केला जातो गणेशोत्सोव--मंतरलेले दिवस

सिद्धेश आचरेकर -- मालवण -कोकणला अनेक वर्षांची धार्मिक परंपरा आहे. प्रत्येक गावाची वेगळी परंपरा असून विज्ञान युगातही अंधश्रद्धा नव्हे तर श्रद्धा म्हणून जोपासली जाते. प्रत्येक धार्मिक सणाला व उत्सवाला वेगवेगळे महत्त्व येथे प्राप्त झाले आहे. कोकणचा महाउत्सव म्हणून गणेशोत्सव वर्णिला जातो. घरोघर गणपतीच्या मूर्ती बसवून अखंड कोकण भक्तीसागरात लोटतो. गणेशभक्तांच्या उत्साहाला अक्षरश: उधाण आलेले असते. हे नाकारून चालणार नाही पण नदीच्या कुशीत बसलेल्या एका गावात कोणाच्याही घरात गणपती पूजन केले जात नाही. अहो, इतकेच काय तर गणपतीचे छायाचित्रही तुम्हाला कोणा ग्रामस्थांच्या घरात चुकूनही दिसणार नाही. हे गाव आहे मालवण तालुक्यातील कोईल.कोकणातील गणेशोत्सवात घराघरांत मातीच्या गणपती मूर्ती विराजमान होतात. पाच दिवसांपासून ते ११ ते २१ दिवसांपर्यंत हा उत्सव होत असतो. कोईल गावात मात्र सारे काही वेगळे असते. घराघरांत गणपती पूजन न करता गावाची ग्रामदेवता श्री गणेश मंदिरातील मूर्तीचे पूजन केले जाते. कोईल गावात ज्यावेळी गणपती स्थानापन्न झाले त्यावेळी पूर्वजांनी मंदिरातील गणपतीशिवाय कुठच्याही मूर्तीची पूजा होणार नाही असे वचन दिले. त्यानुसार गावाची परंपरा अखंडपणे भक्तिमय वातावरणात सुरू आहे. गावात साटम महाराजांच्या जन्मस्थानाची वास्तु आहे. सातेरी देवीचे मंदिर आहे. त्याची यथासांग पूजा केली जाते. गणेश मंदिरात माघी गणेशोत्सव आणि वार्षिकोत्सवही दिमाखात साजरे होतात. गणेशोत्सव काळात गावातील ग्रामस्थांच्या भक्तीने गणपती मंदिर बहरून जाते. गणेशोत्सवात जरी घराघरांत ‘बाप्पा’ विराजमान होत नसला तरी कुठेच उत्साहाची कमी नसते. नैवेद्याचा थाटमाट तोच असतो जो समस्त कोकणवासियांच्या घराघरांत असतो. श्रद्धाळू भाविकांच्या भक्तीने गणपती मंदिर अहोरात्र फुलून जाते. कोईलमध्ये या लौकिक सोहळ्याचे नेत्रसुख घेणे ही एक पर्वणीच असते. देवळात अकरा दिवस आरती होते. गावकऱ्यांकडून गाऱ्हाणी घातली जातात. प्रत्येक घरातून देण्यात आलेल्या शिधातून गणपतीचा प्रसाद होतो. घराघरांत गणपती पूजन होत नसले तरी गौरीचे पूजन केले जाते. काही मुंबईस्थित ग्रामस्थांना गावी येण्यास शक्य न झाल्यास ते श्रीफळाची पूजा करतात. कोईलच्या गणेशोत्सवाविषयी...कोईल चारिवडे गावातील जनता गावाबाहेरील मातीतून कोणतीही मूर्ती घडवत नाहीत. कुठच्याही भागातील मातीच्या मूर्तीला हात लावून नमस्कार करत नाहीत. या श्रद्धेची परंपरा येथे पिढ्यानपिढ्या जोपासली गेली आहे. मात्र गणेशोत्सवात गणरायाची आराधना करण्यात कोणतीही कसूर ठेवली जात नाही. कोईल गावाचा गणेशोत्सव थाटात साजरा होतो. यावेळी गावातील गणपती मंदिरातील काळ्या दगडात कोरलेली अडीच ते तीन फुटाच्या पाषाणाची यथासांग विधीवत पूजा होते. हा अकरा दिवस गावचा उत्सव संपूर्ण वातावरण मंगलमय करणारा असतो. ‘एक गाव एक गणपती’ ही कोईलवासियांची प्राचीन परंपरा आहे. ११ दिवस गणेशोत्सवानंतर विसर्जनासाठी पालखी सजवली जाते. स्वयंभू मंदिरातील गणपती मूर्तीचे विसर्जन न होता फुलपात्रे, निर्माल्य त्या पालखीत ठेवली जातात. ढोलताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढून गडनदीपात्रात निर्माल्याचे विसर्जन केले जाते. यावेळी भक्तांकडून काही चूक झाली असल्यास मनोमन क्षमा मागितली जाते. कोईल येथील धार्मिक कार्यक्रमात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्यावेळी मुस्लिम बांधवांची वस्ती असल्याचे दाखलेही ग्रामस्थांकडे आहेत..सीमेबाहेरील मातीला ग्रामस्थ हातही लावत नाहीत गावात सीमेपलीकडून कोणत्याही कारणासाठी माती आणू नये. तशा मातीची मूर्ती करू नये अशी परंपरा असल्याने गणपती मंदिर परिसरातील विशिष्ट जागेवरील माती नागपंचमी दिवशी घराघरात नागाच्या मूर्तीसाठी वापरली जाते. गणपतीच्या मंदिरात कृष्णाष्टमीचा उत्सव होतो तेव्हाही हीच माती मूर्तीसाठी वापरतात. हरितालिका मूर्ती असो वा सरस्वतीची मूर्ती गावातील मातीच यासाठी वापरली जाते. गावाबाहेरच्या मातीच्या मूर्तीला कोईलवासीय हात लावत नाहीत. मूर्ती पूजेबाबत नव्हे तर गणपतीच्या मूर्तीसाठी आवश्यक असणारा कोणताही भाग कोईल गावच्या सीमेतून नेला जात नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.