शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

नव्या राजकीय समीकरणामुळे कार्यकर्ते संभ्रमात

By admin | Updated: January 24, 2017 00:39 IST

गेल्या निवडणुकीत भाजपकडे शिरोली, कोरोची, कबनूर हे हक्काचे मतदारसंघ होते

हातकणंगले -- दत्ता बिडकर हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी पारंपरिक विरोधक पक्षीय अजेंडा बाजूला ठेवून एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आघाड्या करून राजकारण करण्यासाठी सरसावले आहेत. कालपर्यंत जातीयवादी पक्ष म्हणून हिणवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्तेसाठी शिवसेना-भाजप बरोबर हातमिळवणी करून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची गोची झाली आहे.तालुक्यात भाजपने जनसुराज्य, ताराराणी आघाडी आणि नव्याने दाखल झालेले जि.प.चे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांना नव्या राजकीय समीकरणानुसार भाजपने आपल्याकडे चासोबत घेऊन नवीन आघाडी केली आहे. या र जि. प. मतदारसंघ ठेवले आहेत. शिरोली आमदार अमल महाडिक यांच्या सौभाग्यवती शौमिका महाडिक यांच्यासाठी, तर हातकणंगले अरुण इंगवले यांच्यासाठी, तसेच आमदार सुरेश हाळवणकर यांनी कोरोची व कबनूर कार्यकर्त्यांच्या सोयीकडे ठेवल्याने भाजपच्या पदरी फक्त हातकणंगले मतदारसंघ वाढीव मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत भाजपकडे शिरोली, कोरोची, कबनूर हे हक्काचे मतदारसंघ होते. भाजपच्या नव्या आघाडीमधील ताराराणी आघाडीसाठी कुंभोज, हुपरी व रेंदाळ हे तीन मतदारसंघ सोडले आहेत. ताराराणी आघाडीने रुकडी आणि पट्टणकोडोलीवर हक्क सांगितला होता. मात्र, ऐनवेळी आघाडीत समाविष्ट झालेल्या धैर्यशील माने यांच्यासाठी हे मतदारसंघ सोडल्याने महादेवराव महाडिक यांची खदखद वाढली आहे. या आघाडीतील जनसुराज्य पक्षासाठी घुणकी व भादोले हे मतदारसंघ सोडले आहेत. त्यांचा हातकणंगले किंवा कुंभोजसाठी आग्रह आहे. तालुक्यात भाजप आणि मित्र पक्षांच्या आघाडीविरुद्ध काँग्रेस- राष्ट्रवादीसह शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी आघाडी आकाराला येत आहे. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला जातीयवादी संबोधले, त्याच शिवसेनेबरोबर आघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी जोर, बैठका मारत आहे. तालुक्यातील ११ जिल्हा परिषद आणि २२ पंचायत समिती गणांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाची एकट्याने निवडणुका जिंकण्याची परिस्थिती नाही. एकमेकांवर आगपाखड करणारे, जातीयवादी शक्तींना पाठबळ देणारे, निवडणुका आल्या की फक्त आपले आणि नात्यागोत्याचे राजकारण करणारे, पक्षाचा अजेंडा बाजूला ठेवून गटातटाचे लेबल चालवणारे पारंपरिक विरोधक असूनही गळ्यात गळे घालून नव्या आघाड्या करून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करणाऱ्या आणि मतदार आणि कार्यकर्ते आपलेच असल्याचे गृहीत धरून राजकारण करणाऱ्या नेतेमंडळींना या निवडणुकीत किती जनाधार मिळणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.