शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नव्या राजकीय समीकरणामुळे कार्यकर्ते संभ्रमात

By admin | Updated: January 24, 2017 00:39 IST

गेल्या निवडणुकीत भाजपकडे शिरोली, कोरोची, कबनूर हे हक्काचे मतदारसंघ होते

हातकणंगले -- दत्ता बिडकर हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी पारंपरिक विरोधक पक्षीय अजेंडा बाजूला ठेवून एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आघाड्या करून राजकारण करण्यासाठी सरसावले आहेत. कालपर्यंत जातीयवादी पक्ष म्हणून हिणवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्तेसाठी शिवसेना-भाजप बरोबर हातमिळवणी करून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची गोची झाली आहे.तालुक्यात भाजपने जनसुराज्य, ताराराणी आघाडी आणि नव्याने दाखल झालेले जि.प.चे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांना नव्या राजकीय समीकरणानुसार भाजपने आपल्याकडे चासोबत घेऊन नवीन आघाडी केली आहे. या र जि. प. मतदारसंघ ठेवले आहेत. शिरोली आमदार अमल महाडिक यांच्या सौभाग्यवती शौमिका महाडिक यांच्यासाठी, तर हातकणंगले अरुण इंगवले यांच्यासाठी, तसेच आमदार सुरेश हाळवणकर यांनी कोरोची व कबनूर कार्यकर्त्यांच्या सोयीकडे ठेवल्याने भाजपच्या पदरी फक्त हातकणंगले मतदारसंघ वाढीव मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत भाजपकडे शिरोली, कोरोची, कबनूर हे हक्काचे मतदारसंघ होते. भाजपच्या नव्या आघाडीमधील ताराराणी आघाडीसाठी कुंभोज, हुपरी व रेंदाळ हे तीन मतदारसंघ सोडले आहेत. ताराराणी आघाडीने रुकडी आणि पट्टणकोडोलीवर हक्क सांगितला होता. मात्र, ऐनवेळी आघाडीत समाविष्ट झालेल्या धैर्यशील माने यांच्यासाठी हे मतदारसंघ सोडल्याने महादेवराव महाडिक यांची खदखद वाढली आहे. या आघाडीतील जनसुराज्य पक्षासाठी घुणकी व भादोले हे मतदारसंघ सोडले आहेत. त्यांचा हातकणंगले किंवा कुंभोजसाठी आग्रह आहे. तालुक्यात भाजप आणि मित्र पक्षांच्या आघाडीविरुद्ध काँग्रेस- राष्ट्रवादीसह शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी आघाडी आकाराला येत आहे. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला जातीयवादी संबोधले, त्याच शिवसेनेबरोबर आघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी जोर, बैठका मारत आहे. तालुक्यातील ११ जिल्हा परिषद आणि २२ पंचायत समिती गणांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाची एकट्याने निवडणुका जिंकण्याची परिस्थिती नाही. एकमेकांवर आगपाखड करणारे, जातीयवादी शक्तींना पाठबळ देणारे, निवडणुका आल्या की फक्त आपले आणि नात्यागोत्याचे राजकारण करणारे, पक्षाचा अजेंडा बाजूला ठेवून गटातटाचे लेबल चालवणारे पारंपरिक विरोधक असूनही गळ्यात गळे घालून नव्या आघाड्या करून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करणाऱ्या आणि मतदार आणि कार्यकर्ते आपलेच असल्याचे गृहीत धरून राजकारण करणाऱ्या नेतेमंडळींना या निवडणुकीत किती जनाधार मिळणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.