शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नव्या राजकीय समीकरणामुळे कार्यकर्ते संभ्रमात

By admin | Updated: January 24, 2017 00:39 IST

गेल्या निवडणुकीत भाजपकडे शिरोली, कोरोची, कबनूर हे हक्काचे मतदारसंघ होते

हातकणंगले -- दत्ता बिडकर हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी पारंपरिक विरोधक पक्षीय अजेंडा बाजूला ठेवून एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आघाड्या करून राजकारण करण्यासाठी सरसावले आहेत. कालपर्यंत जातीयवादी पक्ष म्हणून हिणवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्तेसाठी शिवसेना-भाजप बरोबर हातमिळवणी करून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची गोची झाली आहे.तालुक्यात भाजपने जनसुराज्य, ताराराणी आघाडी आणि नव्याने दाखल झालेले जि.प.चे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांना नव्या राजकीय समीकरणानुसार भाजपने आपल्याकडे चासोबत घेऊन नवीन आघाडी केली आहे. या र जि. प. मतदारसंघ ठेवले आहेत. शिरोली आमदार अमल महाडिक यांच्या सौभाग्यवती शौमिका महाडिक यांच्यासाठी, तर हातकणंगले अरुण इंगवले यांच्यासाठी, तसेच आमदार सुरेश हाळवणकर यांनी कोरोची व कबनूर कार्यकर्त्यांच्या सोयीकडे ठेवल्याने भाजपच्या पदरी फक्त हातकणंगले मतदारसंघ वाढीव मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत भाजपकडे शिरोली, कोरोची, कबनूर हे हक्काचे मतदारसंघ होते. भाजपच्या नव्या आघाडीमधील ताराराणी आघाडीसाठी कुंभोज, हुपरी व रेंदाळ हे तीन मतदारसंघ सोडले आहेत. ताराराणी आघाडीने रुकडी आणि पट्टणकोडोलीवर हक्क सांगितला होता. मात्र, ऐनवेळी आघाडीत समाविष्ट झालेल्या धैर्यशील माने यांच्यासाठी हे मतदारसंघ सोडल्याने महादेवराव महाडिक यांची खदखद वाढली आहे. या आघाडीतील जनसुराज्य पक्षासाठी घुणकी व भादोले हे मतदारसंघ सोडले आहेत. त्यांचा हातकणंगले किंवा कुंभोजसाठी आग्रह आहे. तालुक्यात भाजप आणि मित्र पक्षांच्या आघाडीविरुद्ध काँग्रेस- राष्ट्रवादीसह शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी आघाडी आकाराला येत आहे. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला जातीयवादी संबोधले, त्याच शिवसेनेबरोबर आघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी जोर, बैठका मारत आहे. तालुक्यातील ११ जिल्हा परिषद आणि २२ पंचायत समिती गणांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाची एकट्याने निवडणुका जिंकण्याची परिस्थिती नाही. एकमेकांवर आगपाखड करणारे, जातीयवादी शक्तींना पाठबळ देणारे, निवडणुका आल्या की फक्त आपले आणि नात्यागोत्याचे राजकारण करणारे, पक्षाचा अजेंडा बाजूला ठेवून गटातटाचे लेबल चालवणारे पारंपरिक विरोधक असूनही गळ्यात गळे घालून नव्या आघाड्या करून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करणाऱ्या आणि मतदार आणि कार्यकर्ते आपलेच असल्याचे गृहीत धरून राजकारण करणाऱ्या नेतेमंडळींना या निवडणुकीत किती जनाधार मिळणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.