शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

डमी अर्जातही कार्यकर्ते वाऱ्यावर --पत्नी, मुलांच्या नावानेच भरले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 00:52 IST

एवढे कमी म्हणून की काय म्हणून एकेका उमेदवारांनी तर स्वत:चेच चार-चार अर्ज भरले आहेत. कार्यकर्त्यांवर नेत्यांचा विश्वास राहिला नाही की काय, अशी शंका आता या निमित्ताने उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देनिष्ठावंत कार्यकर्त्यापेक्षा रक्ताचे वारसदारच डमी अर्जासाठी सर्वच उमेदवारांनी निवडल्याचे दिसत आहे.

कोल्हापूर : लोकशाही असली तरी घराणेशाहीचा वरचष्मा इतका आहे की, उमेदवारी देताना कार्यकर्त्यांना नेहमीच वा-यावर सोडले जाते. निदान डमी अर्ज भरताना तरी कार्यकर्त्यांचा विचार होईल, ही अपेक्षाही फोल ठरताना दिसत आहे. गुरुवारपर्यंत अर्ज भरलेल्या उमेदवारांच्या नामांकनावर नजर टाकली तर आई, पत्नी, मुलगा यांच्याच नावाने डमी अर्ज भरण्यात आल्याचे दिसते. एवढे कमी म्हणून की काय म्हणून एकेका उमेदवारांनी तर स्वत:चेच चार-चार अर्ज भरले आहेत. कार्यकर्त्यांवर नेत्यांचा विश्वास राहिला नाही की काय, अशी शंका आता या निमित्ताने उपस्थित होत आहे.

काही कारणास्तव छाननीत अर्ज बाद झाला तर गोंधळ नको यासाठी दक्षता म्हणून डमी अर्ज भरले जातात. आतापर्यंत ब-यापैकी नेत्यांच्या जवळील प्रमुख कार्यकर्त्यांचेच अर्ज डमी म्हणून भरले जात होते. यावेळची निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरताना दिसत आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यापेक्षा रक्ताचे वारसदारच डमी अर्जासाठी सर्वच उमेदवारांनी निवडल्याचे दिसत आहे.

राधानगरीतून के. पी. पाटील यांना मुलगा विकास पाटील यांचा डमी अर्ज आला आहे. कागलमधून संजय घाटगे यांचा डमी अर्ज सून सुयशा घाटगे, समरजितसिंह घाटगे यांचा अर्ज पत्नी नवोदिता घाटगे यांच्या नावाने, तर हसन मुश्रीफ यांचा डमी अर्ज मुलगा नवीद मुश्रीफ यांच्या नावाने भरला आहे. करवीरमधून पी. एन. पाटील यांना मुलगा राहुल पाटील यांचा डमी अर्ज आहे. चंद्रदीप नरके यांचा उमेदवारी अर्ज भरण्याआधी त्यांचा डमी अर्ज त्यांची आई शैलाबाई नरके यांच्या नावाने भरून ठेवण्यात आला आहे. कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर यांनी पत्नी वैशाली यांच्या नावाने डमी अर्ज भरला आहे. इचलकरंजीतून सुरेश हाळवणकर यांनीही पत्नी भारती यांच्या नावाने डमी अर्ज भरला आहे. प्रकाश आवाडे यांनीही मुलगा राहुल यांचाच डमी अर्ज दिला आहे. शिरोळमधून उल्हास पाटील यांनीदेखील पत्नी उज्ज्वला यांच्या नावानेच डमी अर्ज भरला आहे.रक्ताच्या वारसदारांनाच डमी अर्जात स्थानपत्नी, मुलगा अशा रक्ताच्या वारसदारांनाच डमी अर्जात स्थान देण्याचे प्रमाण वाढले असताना उमेदवारांनीच स्वत:चेच चार-चार डमी अर्ज भरल्याचीही उदाहरणे आहेत.

त्यात पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात असलेले ऋतुराज पाटील, विनय कोरे, राहुल खंजिरे यांचा समावेश आहे. आपलेच दोन अर्ज भरलेल्यांमध्ये संग्राम कुपेकर, सत्यजित जाधव, अरुण डोंगळे या बड्या नेत्यांचाही समावेश आहे.

टॅग्स :Politicsराजकारणvidhan sabhaविधानसभा