शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

डमी अर्जातही कार्यकर्ते वाऱ्यावर --पत्नी, मुलांच्या नावानेच भरले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 00:52 IST

एवढे कमी म्हणून की काय म्हणून एकेका उमेदवारांनी तर स्वत:चेच चार-चार अर्ज भरले आहेत. कार्यकर्त्यांवर नेत्यांचा विश्वास राहिला नाही की काय, अशी शंका आता या निमित्ताने उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देनिष्ठावंत कार्यकर्त्यापेक्षा रक्ताचे वारसदारच डमी अर्जासाठी सर्वच उमेदवारांनी निवडल्याचे दिसत आहे.

कोल्हापूर : लोकशाही असली तरी घराणेशाहीचा वरचष्मा इतका आहे की, उमेदवारी देताना कार्यकर्त्यांना नेहमीच वा-यावर सोडले जाते. निदान डमी अर्ज भरताना तरी कार्यकर्त्यांचा विचार होईल, ही अपेक्षाही फोल ठरताना दिसत आहे. गुरुवारपर्यंत अर्ज भरलेल्या उमेदवारांच्या नामांकनावर नजर टाकली तर आई, पत्नी, मुलगा यांच्याच नावाने डमी अर्ज भरण्यात आल्याचे दिसते. एवढे कमी म्हणून की काय म्हणून एकेका उमेदवारांनी तर स्वत:चेच चार-चार अर्ज भरले आहेत. कार्यकर्त्यांवर नेत्यांचा विश्वास राहिला नाही की काय, अशी शंका आता या निमित्ताने उपस्थित होत आहे.

काही कारणास्तव छाननीत अर्ज बाद झाला तर गोंधळ नको यासाठी दक्षता म्हणून डमी अर्ज भरले जातात. आतापर्यंत ब-यापैकी नेत्यांच्या जवळील प्रमुख कार्यकर्त्यांचेच अर्ज डमी म्हणून भरले जात होते. यावेळची निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरताना दिसत आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यापेक्षा रक्ताचे वारसदारच डमी अर्जासाठी सर्वच उमेदवारांनी निवडल्याचे दिसत आहे.

राधानगरीतून के. पी. पाटील यांना मुलगा विकास पाटील यांचा डमी अर्ज आला आहे. कागलमधून संजय घाटगे यांचा डमी अर्ज सून सुयशा घाटगे, समरजितसिंह घाटगे यांचा अर्ज पत्नी नवोदिता घाटगे यांच्या नावाने, तर हसन मुश्रीफ यांचा डमी अर्ज मुलगा नवीद मुश्रीफ यांच्या नावाने भरला आहे. करवीरमधून पी. एन. पाटील यांना मुलगा राहुल पाटील यांचा डमी अर्ज आहे. चंद्रदीप नरके यांचा उमेदवारी अर्ज भरण्याआधी त्यांचा डमी अर्ज त्यांची आई शैलाबाई नरके यांच्या नावाने भरून ठेवण्यात आला आहे. कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर यांनी पत्नी वैशाली यांच्या नावाने डमी अर्ज भरला आहे. इचलकरंजीतून सुरेश हाळवणकर यांनीही पत्नी भारती यांच्या नावाने डमी अर्ज भरला आहे. प्रकाश आवाडे यांनीही मुलगा राहुल यांचाच डमी अर्ज दिला आहे. शिरोळमधून उल्हास पाटील यांनीदेखील पत्नी उज्ज्वला यांच्या नावानेच डमी अर्ज भरला आहे.रक्ताच्या वारसदारांनाच डमी अर्जात स्थानपत्नी, मुलगा अशा रक्ताच्या वारसदारांनाच डमी अर्जात स्थान देण्याचे प्रमाण वाढले असताना उमेदवारांनीच स्वत:चेच चार-चार डमी अर्ज भरल्याचीही उदाहरणे आहेत.

त्यात पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात असलेले ऋतुराज पाटील, विनय कोरे, राहुल खंजिरे यांचा समावेश आहे. आपलेच दोन अर्ज भरलेल्यांमध्ये संग्राम कुपेकर, सत्यजित जाधव, अरुण डोंगळे या बड्या नेत्यांचाही समावेश आहे.

टॅग्स :Politicsराजकारणvidhan sabhaविधानसभा