शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

गोपनीय बाबी उघड करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:25 IST

कोल्हापूर : सत्तेच्या हव्यासापोटी कायदा मोडणे, यंत्रणेत दुफळी माजवणे, गोपनीय बाबी जगजाहीर करणे हा भाजपने केलेला राजद्रोहच आहे. सत्ता ...

कोल्हापूर : सत्तेच्या हव्यासापोटी कायदा मोडणे, यंत्रणेत दुफळी माजवणे, गोपनीय बाबी जगजाहीर करणे हा भाजपने केलेला राजद्रोहच आहे. सत्ता कोणाची आहे, यापेक्षा राज्याची प्रतिमा डागाळली गेली हे अधिक क्लेशदायक असल्याने याच्या मुळाशी हे सरकार जाणार आहे. यात सहभागी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच आहे, असे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. गोपनीय बाबी उघड करायच्या नसतात, पण सत्तेच्या हव्यासापोटी फडणवीस यांनी ती नैतिकताही पाळली नाही, त्यामुळे थाेडी जरी विश्वासार्हता शिल्लक असेल तर त्यांनी स्वत:हून नावे जाहीर करावीत, असे आवाहनही पाटील यांनी केले.

कृषी विधेयकाच्या विरोधात शुक्रवारी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या निमित्ताने कोल्हापुरातही काँग्रेस कमिटीमध्ये एकदिवसीय उपोषण झाले. या आंदोलनापूर्वी पत्रकार बैठक घेऊन पालकमंत्री पाटील यांनी फोन टॅपिंगवरून भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, भाजपकडून बहुमत नसतानाही पुन्हा सत्तेवर येईन हा जयघोष अधिकाऱ्यांच्या जिवावरच केला जात होता, हे रश्मी शुक्ला प्रकरणामुळे जनतेपुढे आले आहे. सत्तेसाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचा, बहुमतातील सरकार पाडण्याचा उद्योग करण्यापेक्षा भाजपने विरोधी पक्ष म्हणून जबाबदारपणे काम करण्यातच महाराष्ट्राचे हित आहे, असा सल्लाही दिला.

राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने माहिती हाती लागल्यानंतर त्याची जाहीर वाच्यता करणे हे फडणवीस यांच्यासारख्या जबाबदार नेत्याला शोभत नाही. याचा राज्याच्या प्रतिमेवर व संबंधित अधिकाऱ्यांच्या सीआरवर परिणाम होतो. केंद्रातील एकाधिकारशाहीच्या दबावालाच हे अधिकारी बळी पडत असल्यानेच अशा घटना घडत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. राज्यातील प्रशासकीय यंत्रणा, सुरक्षेच्या बाबतीतील गोपनीय अहवाल विरोधी पक्षनेत्यांकडे कुणी दिला, कसा बाहेर आला याचा तर आम्ही शोध घेऊच, पण गेली २० वर्षे राजकारणात विश्वासार्हता निर्माण करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी तो पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणे हे सुरक्षेच्या दृष्टीने चुकीचे आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

चौकट ०१

आमदारांनी उघडपणे बोलावे

राजेंद्र पाटील-यड्रावकर हे बाेलते झाले, अजून किती तरी जण यात असतील, त्यांनीही पुढे येऊन बोलायला हवे, नाही तर पुढे याचे गंभीर परिणाम राज्याला भोगावे लागतील, असा सूचक इशाराही दिला.

चौकट ०२

पोलिसांची प्रतिमा डागाळली

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सर्व प्रकरणावर स्वत: चौकशीस सामोरे जाऊ असे सांगितल्याने त्यांचा खरेपणा सिद्ध होतो, असे सांगताना सतेज पाटील यांनी कोविड काळात अडीच लाख पोलिसांची उजळलेली प्रतिमा बेजबाबदार विरोधी पक्षनेत्यांमुळे डागाळली गेली, असा आरोपही केला.