शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

गोपनीय बाबी उघड करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:25 IST

कोल्हापूर : सत्तेच्या हव्यासापोटी कायदा मोडणे, यंत्रणेत दुफळी माजवणे, गोपनीय बाबी जगजाहीर करणे हा भाजपने केलेला राजद्रोहच आहे. सत्ता ...

कोल्हापूर : सत्तेच्या हव्यासापोटी कायदा मोडणे, यंत्रणेत दुफळी माजवणे, गोपनीय बाबी जगजाहीर करणे हा भाजपने केलेला राजद्रोहच आहे. सत्ता कोणाची आहे, यापेक्षा राज्याची प्रतिमा डागाळली गेली हे अधिक क्लेशदायक असल्याने याच्या मुळाशी हे सरकार जाणार आहे. यात सहभागी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच आहे, असे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. गोपनीय बाबी उघड करायच्या नसतात, पण सत्तेच्या हव्यासापोटी फडणवीस यांनी ती नैतिकताही पाळली नाही, त्यामुळे थाेडी जरी विश्वासार्हता शिल्लक असेल तर त्यांनी स्वत:हून नावे जाहीर करावीत, असे आवाहनही पाटील यांनी केले.

कृषी विधेयकाच्या विरोधात शुक्रवारी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या निमित्ताने कोल्हापुरातही काँग्रेस कमिटीमध्ये एकदिवसीय उपोषण झाले. या आंदोलनापूर्वी पत्रकार बैठक घेऊन पालकमंत्री पाटील यांनी फोन टॅपिंगवरून भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, भाजपकडून बहुमत नसतानाही पुन्हा सत्तेवर येईन हा जयघोष अधिकाऱ्यांच्या जिवावरच केला जात होता, हे रश्मी शुक्ला प्रकरणामुळे जनतेपुढे आले आहे. सत्तेसाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचा, बहुमतातील सरकार पाडण्याचा उद्योग करण्यापेक्षा भाजपने विरोधी पक्ष म्हणून जबाबदारपणे काम करण्यातच महाराष्ट्राचे हित आहे, असा सल्लाही दिला.

राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने माहिती हाती लागल्यानंतर त्याची जाहीर वाच्यता करणे हे फडणवीस यांच्यासारख्या जबाबदार नेत्याला शोभत नाही. याचा राज्याच्या प्रतिमेवर व संबंधित अधिकाऱ्यांच्या सीआरवर परिणाम होतो. केंद्रातील एकाधिकारशाहीच्या दबावालाच हे अधिकारी बळी पडत असल्यानेच अशा घटना घडत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. राज्यातील प्रशासकीय यंत्रणा, सुरक्षेच्या बाबतीतील गोपनीय अहवाल विरोधी पक्षनेत्यांकडे कुणी दिला, कसा बाहेर आला याचा तर आम्ही शोध घेऊच, पण गेली २० वर्षे राजकारणात विश्वासार्हता निर्माण करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी तो पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणे हे सुरक्षेच्या दृष्टीने चुकीचे आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

चौकट ०१

आमदारांनी उघडपणे बोलावे

राजेंद्र पाटील-यड्रावकर हे बाेलते झाले, अजून किती तरी जण यात असतील, त्यांनीही पुढे येऊन बोलायला हवे, नाही तर पुढे याचे गंभीर परिणाम राज्याला भोगावे लागतील, असा सूचक इशाराही दिला.

चौकट ०२

पोलिसांची प्रतिमा डागाळली

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सर्व प्रकरणावर स्वत: चौकशीस सामोरे जाऊ असे सांगितल्याने त्यांचा खरेपणा सिद्ध होतो, असे सांगताना सतेज पाटील यांनी कोविड काळात अडीच लाख पोलिसांची उजळलेली प्रतिमा बेजबाबदार विरोधी पक्षनेत्यांमुळे डागाळली गेली, असा आरोपही केला.