शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
3
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
4
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
5
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
6
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
7
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
8
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
10
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
11
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
12
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
13
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
14
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
15
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
16
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
17
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
18
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
19
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
20
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार

गोपनीय बाबी उघड करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:25 IST

कोल्हापूर : सत्तेच्या हव्यासापोटी कायदा मोडणे, यंत्रणेत दुफळी माजवणे, गोपनीय बाबी जगजाहीर करणे हा भाजपने केलेला राजद्रोहच आहे. सत्ता ...

कोल्हापूर : सत्तेच्या हव्यासापोटी कायदा मोडणे, यंत्रणेत दुफळी माजवणे, गोपनीय बाबी जगजाहीर करणे हा भाजपने केलेला राजद्रोहच आहे. सत्ता कोणाची आहे, यापेक्षा राज्याची प्रतिमा डागाळली गेली हे अधिक क्लेशदायक असल्याने याच्या मुळाशी हे सरकार जाणार आहे. यात सहभागी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच आहे, असे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. गोपनीय बाबी उघड करायच्या नसतात, पण सत्तेच्या हव्यासापोटी फडणवीस यांनी ती नैतिकताही पाळली नाही, त्यामुळे थाेडी जरी विश्वासार्हता शिल्लक असेल तर त्यांनी स्वत:हून नावे जाहीर करावीत, असे आवाहनही पाटील यांनी केले.

कृषी विधेयकाच्या विरोधात शुक्रवारी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या निमित्ताने कोल्हापुरातही काँग्रेस कमिटीमध्ये एकदिवसीय उपोषण झाले. या आंदोलनापूर्वी पत्रकार बैठक घेऊन पालकमंत्री पाटील यांनी फोन टॅपिंगवरून भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, भाजपकडून बहुमत नसतानाही पुन्हा सत्तेवर येईन हा जयघोष अधिकाऱ्यांच्या जिवावरच केला जात होता, हे रश्मी शुक्ला प्रकरणामुळे जनतेपुढे आले आहे. सत्तेसाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचा, बहुमतातील सरकार पाडण्याचा उद्योग करण्यापेक्षा भाजपने विरोधी पक्ष म्हणून जबाबदारपणे काम करण्यातच महाराष्ट्राचे हित आहे, असा सल्लाही दिला.

राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने माहिती हाती लागल्यानंतर त्याची जाहीर वाच्यता करणे हे फडणवीस यांच्यासारख्या जबाबदार नेत्याला शोभत नाही. याचा राज्याच्या प्रतिमेवर व संबंधित अधिकाऱ्यांच्या सीआरवर परिणाम होतो. केंद्रातील एकाधिकारशाहीच्या दबावालाच हे अधिकारी बळी पडत असल्यानेच अशा घटना घडत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. राज्यातील प्रशासकीय यंत्रणा, सुरक्षेच्या बाबतीतील गोपनीय अहवाल विरोधी पक्षनेत्यांकडे कुणी दिला, कसा बाहेर आला याचा तर आम्ही शोध घेऊच, पण गेली २० वर्षे राजकारणात विश्वासार्हता निर्माण करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी तो पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणे हे सुरक्षेच्या दृष्टीने चुकीचे आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

चौकट ०१

आमदारांनी उघडपणे बोलावे

राजेंद्र पाटील-यड्रावकर हे बाेलते झाले, अजून किती तरी जण यात असतील, त्यांनीही पुढे येऊन बोलायला हवे, नाही तर पुढे याचे गंभीर परिणाम राज्याला भोगावे लागतील, असा सूचक इशाराही दिला.

चौकट ०२

पोलिसांची प्रतिमा डागाळली

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सर्व प्रकरणावर स्वत: चौकशीस सामोरे जाऊ असे सांगितल्याने त्यांचा खरेपणा सिद्ध होतो, असे सांगताना सतेज पाटील यांनी कोविड काळात अडीच लाख पोलिसांची उजळलेली प्रतिमा बेजबाबदार विरोधी पक्षनेत्यांमुळे डागाळली गेली, असा आरोपही केला.