शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राज्य बँकेतील दोषींवर कारवाई होणारच

By admin | Updated: November 22, 2014 00:10 IST

चंद्रकांत पाटील : ऊसदरप्रश्नी सरकारची सकारात्मक पावले

कोल्हापूर : राज्य सहकारी बॅँकेच्या भ्रष्टाचारातील दोषींवर कारवाई होणारच, असे स्पष्ट करून कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे नागरिकांशी संवाद साधताना पत्रकारांना दिली. राष्ट्रवादीने भाजप सरकारला पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर बॅँक भ्रष्टाचारातील दोषींवर कारवाई होणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी वरील माहिती दिली. शेतकरी संघटनांनी काल, गुरुवारीच आंदोलनाची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, साखर कारखानदारी उद्योगातील सरकारची भूमिकाही शून्य असते. कारखानदार व ऊस उत्पादकांनीच दरावर निर्णय घेतला पाहिजे; परंतु सरकारचीही प्रत्यक्षातील भूमिका हवी. त्यामुळे कायद्याप्रमाणे स्थापन झालेली ऊस नियंत्रण समिती अशासकीय होती. त्यामध्ये आपण वा मुख्यमंत्रीही नव्हते. समिती पूर्वीच झाली असती तर दराचा प्रश्न निर्माण झाला नसता; परंतु आपण या पदावर आल्यानंतर ती तातडीने स्थापन केली. ते म्हणाले की, काही कारखाने भ्रष्टाचार वा ते नीट न चालविल्यामुळे प्रचंड कर्जबाजारी झाले आहेत. त्यांना मदत किती करायची व त्यातून ते कसे बाहेर पडणार हा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)आठशे कोटी मिळूनही ओरड का?सरकारने परचेस टॅक्स माफ केल्याने ८०० कोटी रुपये कारखान्यांना मिळाले आहेत. असे असतानाही त्यांच्याकडून ओरड होत असेल तर ते बरोबर नाही. साखर कारखान्यांबाबत २००० कोटी रुपये केंद्र सरकारकडे मागावे लागतील. त्यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची नुकतीच पहिली भेट आपण व मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.