शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

कन्या वाचवण्यासाठी कृती हवी

By admin | Updated: January 3, 2015 00:12 IST

देविदास इंगळे : उत्तुरात संत ज्ञानेश्वर लोकशिक्षण व्याख्यानमालेस प्रारंभ

उत्तूर : कन्या वाचवण्यासाठी केवळ संकल्प न करता त्याची कृती हवी, योगदान महत्त्वाचे आहे, तरच कन्या वाचवल्या जातील, असे प्रतिपादन उत्तूर (ता. आजरा) येथील त्रिवेणी सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आयोजित संत ज्ञानेश्वर लोकशिक्षण व्याख्यानमालेत ‘संकल्प करू मोलाचा : कन्यारत्न वाचवण्याचा’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना देविदास इंगळे (पुणे) यांनी केले.संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे यांच्या हस्ते करून व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला. इंगळे म्हणाले, संकल्प हा व्यक्तिगत व सामूहिक स्वरूपाचा असतो. स्वच्छता ही आपल्या उंबऱ्यापर्यंत न करता बाहेरची स्वच्छता ठेवणेही गरज आहे. प्रत्येकाने कन्या वाचवली पाहिजे, नाही तर जीवनच अंधकारमय बनेल. मुलगा हवा या हव्यासापोटी कन्या रोखली जाते, हे दुर्दैव आहे. गर्भपात करून घेऊ नये, यासाठी महिलांनी खंबीर उभे राहिले पाहिजे. शासन कायदे करते; पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही. कन्या वाचवणे ही जबाबदारी प्रत्येक स्त्री-पुरुषाची आहे. केवळ संकल्प करून उपयोग नाही, तर ती सत्यात उतरली पाहिजे.यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य उमेश आपटे, माजी सभापती वसंतराव धुरे, सरपंच सुप्रिया पाटील, पं. स. सदस्या निर्मला व्हनबट्टे, उपसरपंच संजय उत्तूरकर, देशभूषण देशमाने, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.त्रिवेणीचे अध्यक्ष टी. के. पाटील यांनी स्वागत केले. अतिथी परिचय सदानंद पुंडपळ यांनी करून दिला. सुहास पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. महेश करंबळी यांनी आभार मानले. (वार्ताहर)