शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळ्याचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ कागदावरच

By admin | Updated: December 17, 2014 23:02 IST

ठोस उपायांची गरज : कागदी घोडे नाचविण्यातच प्रशासन आघाडीवर

कोल्हापूर : ढासळणाऱ्या संरक्षण भिंती, खराब रस्त्यांमुळे पसरलेले धुळीचे साम्राज्य, नावालाच असलेले बगीचे, कागदावरचीच नौकाविहार, दररोज मिसळणाऱ्या मैलामिश्रित सांडपाण्यामुळे काळे-निळे होत असलेले पाणी, आदी समस्यांनी ऐतिहासिक रंकाळ्याला घेरले आहे. रंकाळ्यासाठी १०० कोटींचा निधी द्या, अशी मागणी शासनाकडे करून प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे रंकाळ्याचा कागदावरचा अ‍ॅक्शन प्लॅन सत्यात उतरवून रंकाळ्याची दुरवस्था रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.रंकाळा तलाव संवर्धनाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी महापालिकेची खास महासभाही झाली. तीनवेळा ‘एक दिवस रंकाळा’ हा उपक्रमही राबविला गेला. मात्र, रंकाळा प्रदूषणप्रश्नी महानगरपालिका प्रशासन ढिम्मच आहे. संरक्षक कठड्याची पडझड व सांडपाण्यामुळे रंकाळ्याला अवकळा आली आहे. रंकाळ्याची संरक्षक भिंत दोन ठिकाणी पडली आहे. वर्षभरापासून त्याच्या दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे. यानंतर पडलेल्या भगदाडाची दुरुस्ती करण्याची तसदीही महापालिकेने घेतलेली नाही. शाम हौसिंग सोसायटीकडून थेट तलावात मिसळणारा नाला वळविण्यासाठी दुधाळीपर्यंत ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम पूर्ण होऊनही पूर्णक्षमतेने सांडपाणी वळविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. यापूर्वीही दोनवेळा रंकाळ्यासाठी केंद्राच्या तलाव संवर्धन योजनेतून निधी मिळाला. मात्र, रंकाळ्याचे दुखणे ‘जैसे थे’च आहे. (प्रतिनिधी)सांडपाण्याचे दुखणेशाम सोसायटी व साने गुरुजी वसाहतीतून आलेले सांडपाणी रंकाळ्यात मिसळते. केंदाळ समूळ नष्ट करण्यासाठी १५ लाख रुपये खर्च करून विव्हिल किडे सोडण्यात आले; पण जलपर्णी कमी झाल्या नाहीत. वरचेवर केंदाळाचे दुखणे वर तोंड काढतच असते. बोट खरेदी करण्याकरिता ४५ लाखांची तरतूद केली; पण गेल्या तीन वर्षांत अद्याप ती खरेदी केली नाही. बोटीमुळे पर्यटनाबरोबरच पाणी ढवळून पाण्यातील आॅक्सिजन वाढण्यासाठीही मदत होणार आहे. प्रशासनाची उदासीनताच रंकाळ्याचे दुखणे वाढवीत आहे.नुसताच ‘प्लॅन’ तलावाभोवती चोहोबाजूंनी असलेल्या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. पडत चाललेल्या संरक्षक भिंतींसह रंकाळ्याची संपूर्ण डागडुजी व मजबुतीकरणासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याच्या सूचना आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी देऊन सहा महिने उलटले; मात्र, हा ‘प्लॅन’ काही प्रत्यक्षात ‘अ‍ॅक्शन’मध्ये उतरलाच नाही.उपायांची गरज संपूर्ण पाणी उपसून गाळ काढणे.अतिरिक्त झालेले पाणी बाहेर जाण्याची सोय करणे.तटबंदीचे वयोमान संपल्याने मजबुतीकरणाची गरज.नैसर्गिक पुनर्भरणासाठी धरण सुरक्षा संस्थेच्या तज्ज्ञांची मदत घेणे.तत्काळ निधीची उपलब्धता करून कामास सुरुवात करणे.