शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

रंकाळ्याचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ कागदावरच

By admin | Updated: December 17, 2014 23:02 IST

ठोस उपायांची गरज : कागदी घोडे नाचविण्यातच प्रशासन आघाडीवर

कोल्हापूर : ढासळणाऱ्या संरक्षण भिंती, खराब रस्त्यांमुळे पसरलेले धुळीचे साम्राज्य, नावालाच असलेले बगीचे, कागदावरचीच नौकाविहार, दररोज मिसळणाऱ्या मैलामिश्रित सांडपाण्यामुळे काळे-निळे होत असलेले पाणी, आदी समस्यांनी ऐतिहासिक रंकाळ्याला घेरले आहे. रंकाळ्यासाठी १०० कोटींचा निधी द्या, अशी मागणी शासनाकडे करून प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे रंकाळ्याचा कागदावरचा अ‍ॅक्शन प्लॅन सत्यात उतरवून रंकाळ्याची दुरवस्था रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.रंकाळा तलाव संवर्धनाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी महापालिकेची खास महासभाही झाली. तीनवेळा ‘एक दिवस रंकाळा’ हा उपक्रमही राबविला गेला. मात्र, रंकाळा प्रदूषणप्रश्नी महानगरपालिका प्रशासन ढिम्मच आहे. संरक्षक कठड्याची पडझड व सांडपाण्यामुळे रंकाळ्याला अवकळा आली आहे. रंकाळ्याची संरक्षक भिंत दोन ठिकाणी पडली आहे. वर्षभरापासून त्याच्या दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे. यानंतर पडलेल्या भगदाडाची दुरुस्ती करण्याची तसदीही महापालिकेने घेतलेली नाही. शाम हौसिंग सोसायटीकडून थेट तलावात मिसळणारा नाला वळविण्यासाठी दुधाळीपर्यंत ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम पूर्ण होऊनही पूर्णक्षमतेने सांडपाणी वळविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. यापूर्वीही दोनवेळा रंकाळ्यासाठी केंद्राच्या तलाव संवर्धन योजनेतून निधी मिळाला. मात्र, रंकाळ्याचे दुखणे ‘जैसे थे’च आहे. (प्रतिनिधी)सांडपाण्याचे दुखणेशाम सोसायटी व साने गुरुजी वसाहतीतून आलेले सांडपाणी रंकाळ्यात मिसळते. केंदाळ समूळ नष्ट करण्यासाठी १५ लाख रुपये खर्च करून विव्हिल किडे सोडण्यात आले; पण जलपर्णी कमी झाल्या नाहीत. वरचेवर केंदाळाचे दुखणे वर तोंड काढतच असते. बोट खरेदी करण्याकरिता ४५ लाखांची तरतूद केली; पण गेल्या तीन वर्षांत अद्याप ती खरेदी केली नाही. बोटीमुळे पर्यटनाबरोबरच पाणी ढवळून पाण्यातील आॅक्सिजन वाढण्यासाठीही मदत होणार आहे. प्रशासनाची उदासीनताच रंकाळ्याचे दुखणे वाढवीत आहे.नुसताच ‘प्लॅन’ तलावाभोवती चोहोबाजूंनी असलेल्या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. पडत चाललेल्या संरक्षक भिंतींसह रंकाळ्याची संपूर्ण डागडुजी व मजबुतीकरणासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याच्या सूचना आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी देऊन सहा महिने उलटले; मात्र, हा ‘प्लॅन’ काही प्रत्यक्षात ‘अ‍ॅक्शन’मध्ये उतरलाच नाही.उपायांची गरज संपूर्ण पाणी उपसून गाळ काढणे.अतिरिक्त झालेले पाणी बाहेर जाण्याची सोय करणे.तटबंदीचे वयोमान संपल्याने मजबुतीकरणाची गरज.नैसर्गिक पुनर्भरणासाठी धरण सुरक्षा संस्थेच्या तज्ज्ञांची मदत घेणे.तत्काळ निधीची उपलब्धता करून कामास सुरुवात करणे.