शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
11
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
12
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
13
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
14
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
15
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
16
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
17
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
18
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
19
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
20
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

रंकाळ्याचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ कागदावरच

By admin | Updated: December 17, 2014 23:02 IST

ठोस उपायांची गरज : कागदी घोडे नाचविण्यातच प्रशासन आघाडीवर

कोल्हापूर : ढासळणाऱ्या संरक्षण भिंती, खराब रस्त्यांमुळे पसरलेले धुळीचे साम्राज्य, नावालाच असलेले बगीचे, कागदावरचीच नौकाविहार, दररोज मिसळणाऱ्या मैलामिश्रित सांडपाण्यामुळे काळे-निळे होत असलेले पाणी, आदी समस्यांनी ऐतिहासिक रंकाळ्याला घेरले आहे. रंकाळ्यासाठी १०० कोटींचा निधी द्या, अशी मागणी शासनाकडे करून प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे रंकाळ्याचा कागदावरचा अ‍ॅक्शन प्लॅन सत्यात उतरवून रंकाळ्याची दुरवस्था रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.रंकाळा तलाव संवर्धनाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी महापालिकेची खास महासभाही झाली. तीनवेळा ‘एक दिवस रंकाळा’ हा उपक्रमही राबविला गेला. मात्र, रंकाळा प्रदूषणप्रश्नी महानगरपालिका प्रशासन ढिम्मच आहे. संरक्षक कठड्याची पडझड व सांडपाण्यामुळे रंकाळ्याला अवकळा आली आहे. रंकाळ्याची संरक्षक भिंत दोन ठिकाणी पडली आहे. वर्षभरापासून त्याच्या दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे. यानंतर पडलेल्या भगदाडाची दुरुस्ती करण्याची तसदीही महापालिकेने घेतलेली नाही. शाम हौसिंग सोसायटीकडून थेट तलावात मिसळणारा नाला वळविण्यासाठी दुधाळीपर्यंत ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम पूर्ण होऊनही पूर्णक्षमतेने सांडपाणी वळविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. यापूर्वीही दोनवेळा रंकाळ्यासाठी केंद्राच्या तलाव संवर्धन योजनेतून निधी मिळाला. मात्र, रंकाळ्याचे दुखणे ‘जैसे थे’च आहे. (प्रतिनिधी)सांडपाण्याचे दुखणेशाम सोसायटी व साने गुरुजी वसाहतीतून आलेले सांडपाणी रंकाळ्यात मिसळते. केंदाळ समूळ नष्ट करण्यासाठी १५ लाख रुपये खर्च करून विव्हिल किडे सोडण्यात आले; पण जलपर्णी कमी झाल्या नाहीत. वरचेवर केंदाळाचे दुखणे वर तोंड काढतच असते. बोट खरेदी करण्याकरिता ४५ लाखांची तरतूद केली; पण गेल्या तीन वर्षांत अद्याप ती खरेदी केली नाही. बोटीमुळे पर्यटनाबरोबरच पाणी ढवळून पाण्यातील आॅक्सिजन वाढण्यासाठीही मदत होणार आहे. प्रशासनाची उदासीनताच रंकाळ्याचे दुखणे वाढवीत आहे.नुसताच ‘प्लॅन’ तलावाभोवती चोहोबाजूंनी असलेल्या उद्यानाची दुरवस्था झाली आहे. पडत चाललेल्या संरक्षक भिंतींसह रंकाळ्याची संपूर्ण डागडुजी व मजबुतीकरणासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याच्या सूचना आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी देऊन सहा महिने उलटले; मात्र, हा ‘प्लॅन’ काही प्रत्यक्षात ‘अ‍ॅक्शन’मध्ये उतरलाच नाही.उपायांची गरज संपूर्ण पाणी उपसून गाळ काढणे.अतिरिक्त झालेले पाणी बाहेर जाण्याची सोय करणे.तटबंदीचे वयोमान संपल्याने मजबुतीकरणाची गरज.नैसर्गिक पुनर्भरणासाठी धरण सुरक्षा संस्थेच्या तज्ज्ञांची मदत घेणे.तत्काळ निधीची उपलब्धता करून कामास सुरुवात करणे.