शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

कारवाई केवळ एकावर

By admin | Updated: August 7, 2014 00:23 IST

कीटकनाशकांची १५६० दुकाने : तपासणी अहवालावर शंका

सांगली : जिल्ह्यात कीटकनाशक औषध विक्रेत्यांची एक हजार ५६० दुकाने असून, त्यांच्याकडून बोगस कीटकनाशके शेतकऱ्यांना विक्री होऊ नयेत म्हणून ३२ गुणनियंत्रकांची नियुक्ती केली आहे. या गुणनियंत्रकांनी चार महिन्यात केवळ ४२ नमुने काढले असून त्यापैकी एकाच कंपनीचे कीटकनाशक अप्रमाणित आल्याचे खुद्द जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा परिषद कृषी विकास अधिकाऱ्यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात सांगितले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी आणि कीटकनाशक कंपन्यांचे साटेलोटे असल्याचा आरोपही केल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.एका सामाजिक संस्थेने बोगस कीटकनाशकांची सर्वाधिक विक्री सांगलीत होत आहे, बोगस कंपन्यांकडून कशा पध्दतीने कीटकनाशकांची विक्री होते याची माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी आर. जे. भोसले, कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. पांडुरंग मोहिते आदींना उपस्थित केले होते. यावेळी प्रा. डॉ. मोहिते म्हणाले की, बोगस कीटकनाशकांमुळे राज्याच्या महसूलचा तोटा होत आहेच, शिवाय बोगस कीटकनाशकांना आकर्षक नावे देऊन ती शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत. यामुळे महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कृषी महाविद्यालयाचे अधिकारीच बोगस कीटकनाशकांवर सडेतोडपणे बोलू लागल्यामुळे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. सामाजिक संस्थेने आपल्याला कशासाठी बोलाविले आहे आणि समोर बसलेल्यांना काय माहिती द्यायची, याचीही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती नव्हती. त्यामुळे अचानक उपस्थित शेतकऱ्यांना कोणती माहिती द्यायची, याबाबत अधिकाऱ्यांना काहीच कळत नव्हते. अखेर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जमदाडे यांनी, जिल्ह्यात एक हजार ५६० कीटकनाशक विक्रेत्यांची संख्या असून त्यापैकी ४१६ विक्रेत्यांची तपासणी केली असून एका कंपनीचे कीटकनाशक अप्रमाणित आले आहे. संबंधित कंपनीवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सांगली जिल्ह्यात महिना सात ते आठ कोटी रुपयांच्या कीटकनाशकांची विक्री होत असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)