शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

नव्या पुरोगामी विचारांसाठी कृती गरजेची

By admin | Updated: February 11, 2016 00:34 IST

जयंत पाटील : के. ब. जगदाळे जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभ; विविध क्षेत्रांत कामाचा ठसा उमटविणाऱ्यांचा सत्कार

कोल्हापूर : ज्या शहराने देशाला पुरोगामी विचारांची परंपरा दिली, त्या शहरात नव्या आर्थिक, सामाजिक रचनेत राजर्षी शाहू महाराज व के. ब. जगदाळे यांच्या विचारांना कृतीची जोड देऊन नवा पुरोगामी विचार रुजविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केले. स्वातंत्र्यसैनिक व माजी नगराध्यक्ष कै. के. ब. जगदाळे (तात्या) यांचा जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभ बुधवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार संपतबापू पवार पाटील, कुंडल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरुण लाड, संभाजी जगदाळे, माजी आमदार सुरेश साळोखे, बाबूराव कदम, टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे उपस्थित होते.या जन्मशताब्दीचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत आपल्या कामाचा ठसा उमटविणारे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, पंचगंगेत बुडणाऱ्या चौदा लोकांचे प्राण वाचविणारे धाडसी रमेश गवळी, बेवारसांसाठी काम करणाऱ्या किशोर नैनवाणी, युवा कार्यकर्ता प्रसाद जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.भाई पाटील म्हणाले, महात्मा फुले, राजर्षी शाहूंनी सर्वसामान्य माणसाला जगण्याचा हक्क मिळवून दिला. देशाला पुरोगामी विचार दिला. त्याच शहरात प्रतिगामी शक्ती फोफावत आहेत. पुरोगामी विचारांची पीछेहाट होत आहे. कारण इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचत नाही. के. ब. जगदाळे यांचा इतिहास, राजकारण, त्यांनी कष्टकऱ्यांसाठी दिलेले लढे, नव्या पिढीपर्यंत पोहोचायला हवेत, तरच परिवर्तन घडेल. पक्का विचार, पक्के आचरण आणि चांगले चारित्र्य, असे केशवरावांचे आदर्शवत व्यक्तिमत्त्व आहे.श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, सध्याची परिस्थिती पाहता अनेक गोष्टींचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. के. ब. जगदाळेंचे विचार समाजात का रुजले नाहीत, याचाही विचार करायला हवा. सर्वसामान्यांसाठी निवडणुका लढणे सोपे राहिले नाही. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून वर्तमानकालातील निवडणुकींचे अवलोकन करणे गरजेचे आहे. नाहीतर भविष्यकाळात कारखानदारच निवडणुका लढवून विजयी होत राहतील.कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, सर्वसामान्य, गरीब कुटुंबातून आलेल्या केशवरावांनी लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला. नगराध्यक्ष असताना शहराच्या गरजा व अडचणी याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. नि:स्वार्थीपणे आपली जमीन विद्यापीठासाठी देऊन आदर्श निर्माण केला. संपतबापू पाटील म्हणाले, पुरोगामी विचार सर्वसामान्यांमध्ये रुजविण्यासाठी केशवरावांची आठवण नेहमी काढायला हवी. त्यांची समाजातील शेवटच्या घटकापर्यंत, माणसांच्या माणुसकीशी बांधीलकी होती. समाज कसा उभारावा याची जाण त्यांना होती. आजच्या काळात केशवरावांना जाणून घेणे नव्या पिढीसाठी गरजेचे आहे. जगदाळे जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर राबविलेल्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. अरुण लाड यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक निवास साळोखे यांनी केले. अशोक पोवार यांनी आभार मानले. अनिल घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. टोलचे संकट टळले नाहीटोलमुक्तीवर जयंत पाटील म्हणाले, ‘आयआरबी’च्या म्हैसकरांनी नुकसान भरपाईपोटी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिथून निकाल आल्यावर चारशे क ोटींच्या खर्चासाठी चौदाशे कोटी रुपये द्यावे लागतील अन् शासन हात वर करील. तेव्हा आत्ताच ठरवा, कुणाचा सत्कार करायचा अन् कुणाचा नाहीकॉँग्रेसचे रोपटे भाई जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात प्रतिगामी शक्ती वाढीस लागण्यास कॉँग्रेस जबाबदार आहे, अशी टीका केली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या उपस्थितीत ते म्हणाले, प्रतिगामी शक्तींना कॉँग्रेसने पाठीशी घातले. इतिहासात पाहिले तर हे रोपटे कॉँग्रेसने लावले व जोपासले याची साक्ष मिळेल. कॉँग्रेसचे रोपटे भाई जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात प्रतिगामी शक्ती वाढीस लागण्यास कॉँग्रेस जबाबदार आहे, अशी टीका केली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या उपस्थितीत ते म्हणाले, प्रतिगामी शक्तींना कॉँग्रेसने पाठीशी घातले. इतिहासात पाहिले तर हे रोपटे कॉँग्रेसने लावले व जोपासले याची साक्ष मिळेल.