शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नव्या पुरोगामी विचारांसाठी कृती गरजेची

By admin | Updated: February 11, 2016 00:34 IST

जयंत पाटील : के. ब. जगदाळे जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभ; विविध क्षेत्रांत कामाचा ठसा उमटविणाऱ्यांचा सत्कार

कोल्हापूर : ज्या शहराने देशाला पुरोगामी विचारांची परंपरा दिली, त्या शहरात नव्या आर्थिक, सामाजिक रचनेत राजर्षी शाहू महाराज व के. ब. जगदाळे यांच्या विचारांना कृतीची जोड देऊन नवा पुरोगामी विचार रुजविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केले. स्वातंत्र्यसैनिक व माजी नगराध्यक्ष कै. के. ब. जगदाळे (तात्या) यांचा जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभ बुधवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार संपतबापू पवार पाटील, कुंडल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरुण लाड, संभाजी जगदाळे, माजी आमदार सुरेश साळोखे, बाबूराव कदम, टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे उपस्थित होते.या जन्मशताब्दीचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत आपल्या कामाचा ठसा उमटविणारे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, पंचगंगेत बुडणाऱ्या चौदा लोकांचे प्राण वाचविणारे धाडसी रमेश गवळी, बेवारसांसाठी काम करणाऱ्या किशोर नैनवाणी, युवा कार्यकर्ता प्रसाद जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.भाई पाटील म्हणाले, महात्मा फुले, राजर्षी शाहूंनी सर्वसामान्य माणसाला जगण्याचा हक्क मिळवून दिला. देशाला पुरोगामी विचार दिला. त्याच शहरात प्रतिगामी शक्ती फोफावत आहेत. पुरोगामी विचारांची पीछेहाट होत आहे. कारण इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचत नाही. के. ब. जगदाळे यांचा इतिहास, राजकारण, त्यांनी कष्टकऱ्यांसाठी दिलेले लढे, नव्या पिढीपर्यंत पोहोचायला हवेत, तरच परिवर्तन घडेल. पक्का विचार, पक्के आचरण आणि चांगले चारित्र्य, असे केशवरावांचे आदर्शवत व्यक्तिमत्त्व आहे.श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, सध्याची परिस्थिती पाहता अनेक गोष्टींचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. के. ब. जगदाळेंचे विचार समाजात का रुजले नाहीत, याचाही विचार करायला हवा. सर्वसामान्यांसाठी निवडणुका लढणे सोपे राहिले नाही. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून वर्तमानकालातील निवडणुकींचे अवलोकन करणे गरजेचे आहे. नाहीतर भविष्यकाळात कारखानदारच निवडणुका लढवून विजयी होत राहतील.कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, सर्वसामान्य, गरीब कुटुंबातून आलेल्या केशवरावांनी लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला. नगराध्यक्ष असताना शहराच्या गरजा व अडचणी याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. नि:स्वार्थीपणे आपली जमीन विद्यापीठासाठी देऊन आदर्श निर्माण केला. संपतबापू पाटील म्हणाले, पुरोगामी विचार सर्वसामान्यांमध्ये रुजविण्यासाठी केशवरावांची आठवण नेहमी काढायला हवी. त्यांची समाजातील शेवटच्या घटकापर्यंत, माणसांच्या माणुसकीशी बांधीलकी होती. समाज कसा उभारावा याची जाण त्यांना होती. आजच्या काळात केशवरावांना जाणून घेणे नव्या पिढीसाठी गरजेचे आहे. जगदाळे जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर राबविलेल्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. अरुण लाड यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक निवास साळोखे यांनी केले. अशोक पोवार यांनी आभार मानले. अनिल घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. टोलचे संकट टळले नाहीटोलमुक्तीवर जयंत पाटील म्हणाले, ‘आयआरबी’च्या म्हैसकरांनी नुकसान भरपाईपोटी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिथून निकाल आल्यावर चारशे क ोटींच्या खर्चासाठी चौदाशे कोटी रुपये द्यावे लागतील अन् शासन हात वर करील. तेव्हा आत्ताच ठरवा, कुणाचा सत्कार करायचा अन् कुणाचा नाहीकॉँग्रेसचे रोपटे भाई जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात प्रतिगामी शक्ती वाढीस लागण्यास कॉँग्रेस जबाबदार आहे, अशी टीका केली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या उपस्थितीत ते म्हणाले, प्रतिगामी शक्तींना कॉँग्रेसने पाठीशी घातले. इतिहासात पाहिले तर हे रोपटे कॉँग्रेसने लावले व जोपासले याची साक्ष मिळेल. कॉँग्रेसचे रोपटे भाई जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात प्रतिगामी शक्ती वाढीस लागण्यास कॉँग्रेस जबाबदार आहे, अशी टीका केली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या उपस्थितीत ते म्हणाले, प्रतिगामी शक्तींना कॉँग्रेसने पाठीशी घातले. इतिहासात पाहिले तर हे रोपटे कॉँग्रेसने लावले व जोपासले याची साक्ष मिळेल.