शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

यात्रेत हयगय झाल्यास खातेप्रमुखावरच कारवाई

By admin | Updated: April 30, 2015 00:43 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा : गडहिंग्लजच्या महालक्ष्मी यात्रेसाठी बैठक

गडहिंग्लज : एखाद्या विभागाच्या कर्तव्यात हयगय झाल्यामुळे अनर्थाचा प्रसंग उद्भवल्यास संबंधित खातेप्रमुखावरच कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी बुधवारी दिला.मे च्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या येथील श्री महालक्ष्मी यात्रा तयारी आढाव्याच्या अंतिम बैठकीत ते बोलत होते. जिल्हापोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी म्हणाले, महसूल, पोलीस, नगरपालिका व यात्रा समितीने नियोजनपूर्वक तयारी केल्यामुळे यात्रा निश्चितच यशस्वी होईल. मात्र, स्थानिक युवक मंडळांसह सेवाभावी संस्थांची मदत घेतल्यास यात्रेच्या यशस्वीतेसाठी मोठा हातभार लागेल.जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. शर्मा म्हणाले, सर्वांनी महिनाभर मेहनत घेऊन यात्रेची खूप चांगली तयारी केली आहे. कितीही तयारी केली तरी काही उणिवा राहतात. चांगले-वाईट काहीही झाले तरी जबाबदारी सर्वांचीच आहे. शेवटी माणूस म्हटल्यानंतर एखादी चूक होणारच. मात्र, त्याचा मुद्दा मोठा न करता यात्रा मोठी करा.सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी वैभवशाली गडहिंग्लज शहराच्या माहितीबरोबरच यात्रेच्या कृती आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली. तहसीलदार हनुमंत पाटील यांनी यात्रेच्या सर्वांगीण तयारीच्या नियोजनाचा आढावा घेतला.मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता आणि अग्निशमन व्यवस्था, तर पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी वाहतूक नियंत्रण व पार्किंग व्यवस्थेबद्दल प्रोजेक्टद्वारे माहिती दिली.नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा, तर विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी यांनी जिल्हा पोलीसप्रमुखांचा सत्कार केला. बैठकीस उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, डीवायएसपी सागर पाटील, भुदरगडच्या प्रांताधिकारी कीर्ती नलवडे, यात्रा समिती अध्यक्ष रमेश रिंगणे, गटविकास अधिकारी चंचल पाटील, कार्यकारी अभियंता धनंजय पाटणकर, उपस्थित होते. पुष्पवृष्टीस परवानगी नाही : शर्माजिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या कळसावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीस परवानगी नसल्याचे सांगितले. लक्ष्मी मिरवणूक व वाहतुकीकडे गांभीर्याने पहाण्याबरोबर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात येईल, अशा गोष्टींना थारा देऊ नका, असे ते म्हणाले.जिल्हाधिकारी म्हणाले...यात्रा कालावधीत भारनियमन नको. वीज गेल्यास जनरेटरची पर्यायी व्यवस्था करा, पथदिव्यांकडे लक्ष द्या.शहरालगतच्या उपनगरांत पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या.शहरात येणाऱ्या चारही रस्त्यांवर रुग्णवाहिका तैनात ठेवा.अग्निशमन सेवा, रुग्णवाहिका व फिरत्या स्वच्छतागृहांची संख्या वाढवा