शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेत हयगय झाल्यास खातेप्रमुखावरच कारवाई

By admin | Updated: April 30, 2015 00:43 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा : गडहिंग्लजच्या महालक्ष्मी यात्रेसाठी बैठक

गडहिंग्लज : एखाद्या विभागाच्या कर्तव्यात हयगय झाल्यामुळे अनर्थाचा प्रसंग उद्भवल्यास संबंधित खातेप्रमुखावरच कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी बुधवारी दिला.मे च्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या येथील श्री महालक्ष्मी यात्रा तयारी आढाव्याच्या अंतिम बैठकीत ते बोलत होते. जिल्हापोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी म्हणाले, महसूल, पोलीस, नगरपालिका व यात्रा समितीने नियोजनपूर्वक तयारी केल्यामुळे यात्रा निश्चितच यशस्वी होईल. मात्र, स्थानिक युवक मंडळांसह सेवाभावी संस्थांची मदत घेतल्यास यात्रेच्या यशस्वीतेसाठी मोठा हातभार लागेल.जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. शर्मा म्हणाले, सर्वांनी महिनाभर मेहनत घेऊन यात्रेची खूप चांगली तयारी केली आहे. कितीही तयारी केली तरी काही उणिवा राहतात. चांगले-वाईट काहीही झाले तरी जबाबदारी सर्वांचीच आहे. शेवटी माणूस म्हटल्यानंतर एखादी चूक होणारच. मात्र, त्याचा मुद्दा मोठा न करता यात्रा मोठी करा.सहायक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी वैभवशाली गडहिंग्लज शहराच्या माहितीबरोबरच यात्रेच्या कृती आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली. तहसीलदार हनुमंत पाटील यांनी यात्रेच्या सर्वांगीण तयारीच्या नियोजनाचा आढावा घेतला.मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता आणि अग्निशमन व्यवस्था, तर पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी वाहतूक नियंत्रण व पार्किंग व्यवस्थेबद्दल प्रोजेक्टद्वारे माहिती दिली.नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा, तर विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी यांनी जिल्हा पोलीसप्रमुखांचा सत्कार केला. बैठकीस उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, डीवायएसपी सागर पाटील, भुदरगडच्या प्रांताधिकारी कीर्ती नलवडे, यात्रा समिती अध्यक्ष रमेश रिंगणे, गटविकास अधिकारी चंचल पाटील, कार्यकारी अभियंता धनंजय पाटणकर, उपस्थित होते. पुष्पवृष्टीस परवानगी नाही : शर्माजिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या कळसावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीस परवानगी नसल्याचे सांगितले. लक्ष्मी मिरवणूक व वाहतुकीकडे गांभीर्याने पहाण्याबरोबर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात येईल, अशा गोष्टींना थारा देऊ नका, असे ते म्हणाले.जिल्हाधिकारी म्हणाले...यात्रा कालावधीत भारनियमन नको. वीज गेल्यास जनरेटरची पर्यायी व्यवस्था करा, पथदिव्यांकडे लक्ष द्या.शहरालगतच्या उपनगरांत पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या.शहरात येणाऱ्या चारही रस्त्यांवर रुग्णवाहिका तैनात ठेवा.अग्निशमन सेवा, रुग्णवाहिका व फिरत्या स्वच्छतागृहांची संख्या वाढवा