शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

राजारामपुरीत ‘हातोडा’ अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई:

By admin | Updated: November 20, 2014 00:02 IST

राजेंद्रनगर, जगदाळे कॉलनीतही मोहीम

कोल्हापूर : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज, बुधवारी राजारामपुरी परिसरात दिवसभर अतिक्रमण हटविण्याची मोहीम जोरदारपणे राबविली. राजारामपुरी परिसर, राजेंद्रनगर, जगदाळे कॉलनी आदी भागातील बाराहून अधिक ठिकाणची अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. वाहतुकीस अडथळा करणाऱ्या टपऱ्या व बांधकामे, तसेच कंपौैड भिंती, अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याची मोहीम राजारामपुरी विभागीय कार्यालयाकडून पुढेही सुरूच राहणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी अतिक्रमणे स्वत:हून काढून सहकार्य करावे, असे आवाहन उपशहर अभियंता एस. बी. देशपांडे यांनी केले आहे. अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज राजारामपुरीतील पहिली ते चौदावी गल्ली तसेच शाहू मिल परिसरातील वाहतुकीस अडथळा करणाऱ्या इमारती व केबिन्सची पाहणी पूर्ण केली आणि त्या हटविण्यास आजपासून सुरुवात देखील केली. राजारामपुरी जनता बझारच्यासमोरील टायटस स्टोअर्सचे बांधकाम सुरू असल्याने रस्त्याच्या कडेलाच दुकान सुरू केले होते. या दुकानामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याची तक्रार आल्याने महापालिकेच्या पथकाने हे रस्त्यावरील दुकान जेसीबीच्या साहाय्याने हटविले. राजेंद्रनगर येथील डी. पी. रोडवर अनेक झोपड्यांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण निर्मूलन पथकाने त्यातील चार ते पाच झोपड्या हटविल्यानंतर संबंधितांनी स्वत:हून झोपड्या काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर कारवाई थांबविण्यात आली. जगदाळे कॉलनी येथील श्री. तपकिरे यांनी दुसऱ्या मजल्याचे अनधिकृत बांधकाम केले होते. महापालिकेने अनधिकृत बांधकाम केलेली तपकिरे यांची एक खोली पाडली. अशाप्रकारे अनधिकृतरित्या केलेली बांधकाम काढण्याचा सपाटा सुरूच राहणार आहे. मुख्य रस्त्यावरील आणि वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा करणाऱ्या टपऱ्या काढण्याची अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे.त्यामुळे नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. आजच्या कारवाईत उपअभियंता एस. बी. देशपांडे, कनिष्ट अभियंता एन. एस. पाटील, प्रवीण बराले, अरुण गुर्जर आदींसह १५हून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी) इतर विभागीय कार्यालये सुस्त महानगरपालिकेच्या इतर सर्वच विभागीय कार्यालयांच्या अखत्यारितील परिसरात मुख्य रस्त्यांवर केबीन, ढकलगाडे, चहाच्या टपऱ्या, फळ विक्रेत्यांच्या गाड्या मोठ्या संख्येने आहेत. इतर विभागीय कार्यालये अतिक्रमणाच्या बाबतीत अद्याप सुस्तच आहेत. नगरसेवक किंवा वरिष्ठांनी आदेश दिल्याखेरीज अतिक्रमण विभाग जागचाही हलत नाही असे चित्र आहे. संपूर्ण शहराला अतिक्रमणांनी विळखा घातला असल्याने कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी कारवाई करत राजारामपुरीतील रस्त्यावर बांधण्यात आलेले आणि वाहतुकीस अडथळा ठरणारे स्टेशनरीचे एक दुकान जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले.