शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
3
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
4
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
5
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
6
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
7
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
8
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
9
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
10
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
11
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
12
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

‘दत्त समर्थ’ मंगल कार्यालयावर पुन्हा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:26 IST

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन करून लग्नकार्यासाठी ५० पेक्षा अधिक लोक जमविल्याप्रकरणी आंबेवाडी (ता. करवीर) ...

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन करून लग्नकार्यासाठी ५० पेक्षा अधिक लोक जमविल्याप्रकरणी आंबेवाडी (ता. करवीर) येथील दत्त समर्थ मंगल कार्यालयावर सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी कारवाई केली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कार्यक्रमांसाठी ५० पेक्षा अधिक लोक एकत्र येऊ नयेत यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बंदी आदेश दिला. आंबेवाडी येथील दत्त समर्थ मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यासाठी ५० पेक्षा अधिक लोक एकत्र येऊन बंदी आदेश झुगारल्याबद्दल त्यांच्यावर मंगळवारी दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई केली होती; पण दुसऱ्याच दिवशी बुधवारी पुन्हा याच दत्त समर्थ मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यासाठी विनापरवाना मोठ्या संख्येने लाेक एकत्र आल्याचे समजताच करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर यांनी पथकासह तेथे जाऊन तपासणी केली, तसेच कार्यालयाचे मालक दीपक रामचंद्र कचरे (वय ४०, रा. वडणगे), प्रकाश सदाशिव पाटील (६५, रा. भादोले, ता. हातकणंगले) यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.