शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

हद्दवाढीस कृती समितीचा विरोध

By admin | Updated: May 27, 2015 00:58 IST

तीव्र आंदोलन : जूनमध्ये घेणार मेळावा

कोल्हापूर : शहर विकासाचा पुरता बोजवारा उडाला आहे. वाढत्या शहरीकरणात उपनगरांच्या समस्या सोडविण्यात प्रशासनास यश आलेले नाही. महापालिका प्रशासनाने निमंत्रण दिल्यास बाजू मांडण्यासाठी कार्यशाळेला उपस्थित राहणार. मात्र, हद्दवाढीविरोधी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी माजी आमदार संपतराव पवार यांच्या उपस्थितीत जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मेळावा घेण्यात येणार असल्याची माहिती हद्दवाढविरोधी कृती समितीचे समन्वयक नाथाजी पोवार यांनी ‘लोकमत’ला दिली.महानगरपालिकेने उपनगरांसह शहरात काय विकास केला आहे, हे आतापर्यंत ग्रामीण जनतेने पाहिले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढीचा एकतर्फी निर्णय घेऊ दिला जाणार नाही. एखादा निर्णय घेताना जनमानसाच्या भावनेचा विचार न करता तो लादण्याचा प्रयत्न केल्याने टोलसारखे भूत जनतेच्या मानेवर बसण्याची शक्यता आहे. आताही तीच चूक महापालिक ा व शासन पुन्हा करू पाहत आहे. ग्रामीण जनतेचा विरोध असताना त्यांना कायद्याचे भय दाखवून शहरात आणण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटी किंवा तत्सम योजनांच्या माध्यमातून निधी मिळविण्यासाठी फक्त हद्दवाढ हाच निकष नाही. शहर विकासासाठी शासनाने सढळ हाताने निधी द्यावा, हद्दवाढीची टूम काढू नये, अशी प्रतिक्रिया कृती समितीच्या सदस्यांतून उमटत आहे. मागील वेळेप्रमाणेच यावेळीही संभावित गावांच्या अकृषक रोजगाराची टक्केवारी चुकीची सादर केली असण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील प्रश्न वेगळे आहेत. तिथे शेतीपूरक व्यवसाय आहेत. ग्रामीण भागात घरबांधणी परवाना पाचशे रुपयांना मिळतो. महापालिकेत त्यासाठी ५० हजार मोजावे लागतात. ग्रामीण जनतेला ओरबाडण्यासाठीच हद्दवाढ करणार का? जनभावनेचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल. शहराचा विकास झाला पाहिजे; पण ग्रामीण जनतेला कोणी वेठीस धरू पाहत असेल, तर त्याविरोधात जनआंदोलन उभारले जाईल. प्रसंगी कायदेशीर लढाईची तयारीही कृती समितीने केली असल्याचे नाथाजी पोवार व ‘भोगावती’चे माजी संचालक बी. ए. पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)