शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

जिल्हा बॅँक गोत्यात येण्यासाठीच ‘कुमुदा’वर कारवाई

By admin | Updated: January 24, 2016 01:02 IST

हसन मुश्रीफ : चंद्रकांतदादांवर डागली तोफ; ठेवींवर परिणाम झाल्यास दादाच जबाबदार

कोल्हापूर : सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कामाची दिशा पाहिली तर ते सुडाने पेटले असून, जिल्हा बॅँक अडचणीत यावी, म्हणूनच त्यांनी ‘कुमुदा शुगर्स’वर कारवाई केल्याचा आरोप जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. गतवर्षीच्या तुलनेत जिल्हा बॅँकेच्या ठेवींत ३६१ कोटींची वाढ झाली आहे. तरीही चंद्रकांतदादा पाटील सातत्याने बॅँकेला लक्ष्य करीत असून, यामुळे बॅँकेचे जे नुकसान होईल, त्याला सर्वस्वी तेच जबाबदार असतील, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला. आमदार मुश्रीफ म्हणाले, जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे काटकसरीचा कारभार सुरू आहे. खर्चात काटकसर करीत असतानाच कोणाचाही मुलाहिजा न बाळगता आम्ही सनई-चौघड्यासह वसुली मोहीम राबवीत आहोत. ओटीएस योजनेत ५४ संस्थांनी सहभाग घेतला असून, त्यातून २० संस्थांनी एक कोटी ४१ लाख रुपये भरलेले आहेत. गायकवाड कारखान्याच्या थकबाकीसाठी अथणी शुगर्स व तंबाखू संघाचे संजय पाटील सोमवारी (दि. २५) बॅँकेत येऊन चर्चा करणार आहेत. ही थकबाकी वसूल झाली, तर एनपीए पाच टक्क्यांपर्यंत खाली येण्यास मदत होणार आहे. प्रशासकीय व संचालक मंडळाच्या कालावधीची तुलना केल्यास ठेवींमध्ये ३६१ कोटी, तर कर्जात १५९ कोटींची वाढ झाली आहे. सीडी रेशो ८०.६६ टक्क्यांपर्यंत आला आहे. ठेवी वाढल्या हे कशाचे द्योतक आहे? पण सूडबुद्धीने कारवाई सुरू आहे. ‘दौलत’बाबत अनेक वेळा निविदा काढल्यानंतर ‘कुमुदा’ने एक कोटी रुपये बयाणा रक्कम भरून कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याची तयारी दर्शविली; पण त्यांनाही त्रास देण्यास सुरुवात केली आहे. ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजेत याबाबत दुमत नाही; पण एफआरपी थकविणारा ‘कुमुदा’ एकटाच आहे काय? त्यांच्यावर फौजदारी करून उपाध्यक्षाला अटक केली, बॅँकेची खाती गोठवली. एखादा माणूस सूडबुद्धीने पेटला की काय करू शकतो, हे दिसत असून दादांनी आमच्यावर राग काढावा; पण जिल्हा बॅँक अडचणीत येईल, असे काही वक्तव्य करू नये. बॅँकेवर शेतकऱ्यांचे संसार उभे आहेत, याचे भान ठेवावे. यावेळी उपाध्यक्ष अप्पी पाटील, संचालक के. पी. पाटील, बाबासाहेब पाटील, भैया माने, सर्जेराव पाटील, विलास गाताडे, असिफ फरास, संतोष पाटील, प्रतापसिंह चव्हाण उपस्थित होते. कलम ‘८८’मध्ये जमेना म्हणूनच वटहुकूम ! मंत्री पाटील यांचे सर्व राजकारण जिल्हा बॅँकेभोवती फिरत असून सुरुवातीला सचिन रावळ यांच्यावर दबाव टाकून कलम ‘८८’ची कारवाई केली. त्यामध्ये काही जमेना म्हटल्यावर आता वटहुकूम काढला. कोणताही कायदा पूर्वलक्षी प्रभावाने केला जात नाही. याबाबतच्या नोटिसा मिळताच न्यायालयात दाद मागू, असे मुश्रीफ यांनी सांगितले. ‘दत्त-आसुर्ले’चा निर्णय उपयोगी पडेल दत्त-आसुर्ले कारखाना भाडेतत्त्वावर देऊन तीन हंगाम घेतले. बॅँकेचे हप्ते वेळेत सुरू असताना तत्कालीन सहकारमंत्री पतंगराव कदम यांनी कोणाच्या तरी सोयीसाठी कारखाना अवसायनात काढला. अवसायनात काढलेल्या संस्थेची संपूर्ण थकबाकीची ‘एनपीए’ची तरतूद करावी लागली. त्याचबरोबर भुदरगड पतसंस्थेची वसुली केली आणि एक ठेवीदार कोर्टात गेल्याने दहा कोटी स्टेट बॅँकेत जमा करावे लागले. या तांत्रिक अडचणीमुळे बॅँकेचा एनपीए वाढला आणि प्रशासक आले. याविरोधात आम्ही न्यायालयात गेलो होतो. त्याचा उपयोग आम्हाला या कारवाईमध्ये होईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले. ‘दौलत’बाबत ३० जानेवारीला निर्णय ‘दौलत’बाबत ‘कुमुदा’ करार रद्द करीत असल्याचे समजते. व्यवहार पूर्ण करण्याची मुदत ३० जानेवारीपर्यंत आहे. तोपर्यंत ‘कुमुदा’ काय निर्णय देते, ते पाहून त्याच दिवशी ‘दौलत’ची विक्री करायची की आणखी काय करायचे, हे ठरवू; पण कोणत्याही परिस्थितीत मार्चपर्यंत ‘दौलत’चा तिढा सोडवावाच लागेल अन्यथा बॅँक अडचणीत येणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.