शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

आजऱ्यातील शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचे ग्रहण

By admin | Updated: May 4, 2017 22:16 IST

शह-काटशह : तालुक्यात ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका समोर असतानाच कुरबुरी वाढल्या

ज्योतीप्रसाद सावंत ---आजरा ग्रामपंचायतीसह तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका समोर असताना तालुक्यातील शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण लागले आहे. एकमेकांविरोधात केली जाणारी विधाने, अपमानास्पद बोलणे, शह-काटशहाचे राजकारण यामुळे शिवसेना निश्चितच बॅकफुटवर जात आहे.स्व. दिलीप देऊसरकर यांनी शिवसेनेची आजरा तालुक्यात उभारणी केली. आजरा तालुक्यातील मुंबईस्थित चाकरमान्यांनी शिवसेनेला नेहमीच साथ दिली. केदारी रेडेकर यांच्यासह अनेकांचे योगदान असणाऱ्या शिवसेनेला आजरा ग्रामपंचायत, तालुका संघ, आजरा साखर कारखान्यात बस्तान बसविता आले. त्यासोबत आजरा शहरासह तालुक्याच्या पश्चिम भागाचे नेतृत्व करण्याची संधी शिवसेनेला आमदार प्रकाश आबिटकर यांच्या रूपाने मिळाली.हे सर्व करत असताना शिवसेनेला वेळोवेळी इतर पक्ष, गट यांची मदत घ्यावी लागली आणि ही मदतच सेनेच्या वाटचालीतील मोठा अडथळा ठरू लागली. ज्यांची ज्यांची सत्तेने मदत घेतली त्यांच्याशीच अनेक शिवसैनिकांनी साटेलोटे केले. यातील बऱ्यापैकी कार्यकर्ते मनसे, काँगे्रस असा प्रवास करून स्वगृही परतले, तर काहींनी शिवसेनेशी कायमची फारकत घेतली.पक्षापेक्षाही व्यक्तीकेंद्रित राजकारणाला प्राधान्य दिले गेल्याने पंचायत समिती व जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी तालुका शिवसेनेला कधी मिळाली नाही, तर ग्रामपंचायत व तालुका संघातूनही बाहेर व्हावे लागले. स्थानिक आमदार शिवसेनेचे असले तरी अनेक प्रमुख मंडळी गटबाजीमुळे त्यांच्यापासून दूरच राहताना दिसतात. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर माजी सभापती व आजरा साखर कारखाना अध्यक्ष विष्णूपंत केसरकर यांनी सेनेत प्रवेश केला. या निवडणुकीत केसरकर यांच्या मतदारसंघात शिवसैनिकांनी सोयीच्या भूमिका घेतल्याने केसरकर यांच्या पदरात पश्चात्ताप पडला. त्यानंतर आजतागायत केसरकर सेनेपासून सुरक्षित अंतरावर आहेत. केसरकरांचाच अनुभव पं. स. उमेदवार देवराज माडभगत व ओंकार माद्याळकर यांनाही आला आहे.सद्य:स्थितीत आजरा ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे विजय थोरवत प्रतिनिधित्व करीत आहेत. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी ‘शिवसेने’चे लेबल न वापरता अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आहे, तर कारखान्यात प्रतिनिधित्व करणारे शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र सावंत हे महाआघाडीतून निवडून आले आहेत. प्रा. सुनील श्ािंत्रे हे राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रसच्या आघाडीतून निवडून आले आहेत. आजरा ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. पुन्हा एकवेळ हा संघर्ष सुरू झाला आहे.आमदार आबिटकर समर्थक शिवसैनिक अशोक चराटी यांच्या आघाडीसोबत राहण्याची शक्यता दिसू लागली आहे. इतर मंडळी राष्ट्रवादी व काँगे्रससोबत जाण्याची चिन्हे आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून आजरा तालुक्यात शेकडोंनी सामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या शिवसैनिकांची संख्या घटून आता आंदोलकांची संख्या ओढून ताणून पन्नास-साठ शिवसैनिकांवर आली आहे. ही शिवसेनेची प्रगती की अधोगती? याचा विचार पक्षनेतृत्वानेच करण्याची गरज आहे.