शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
4
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
5
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
6
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
8
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
9
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
10
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
11
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
12
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
13
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
14
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
15
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
16
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
17
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
18
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
19
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
20
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक

जनतेने संयम न बाळगल्यास कर्नाटक प्रवेश खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:25 IST

बाबासोा हळिज्वाळे लोकमत न्यूज नेटवर्क कोगनोळी : शेजारील राज्यातील डेल्टा प्लसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यातील प्रवेशासाठी शासनाने कोरोना ...

बाबासोा हळिज्वाळे लोकमत न्यूज नेटवर्क

कोगनोळी : शेजारील राज्यातील डेल्टा प्लसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यातील प्रवेशासाठी शासनाने कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. त्यामध्ये सीमाभागातील व कर्नाटकातून प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला योग्य पुरावे दाखवल्यास प्रवेश दिला जातो. परंतु काही प्रवासी अनावश्यक वाद घालताना आढळून येत आहेत. अशा प्रवाशांनी संयम न बाळगल्यास पुन्हा निर्बंध कडक होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील काही तालुक्यातील जनतेला कोल्हापूर जिल्ह्याशी संपर्क ठेवताना कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरून प्रवास करावा लागतो. सीमाभागातील अनेक कामगार महाराष्ट्रातील औद्योगिक वसाहतीमध्ये काम करतात. या कामगारांना निपाणी तालुका प्रशासनाने या सीमेवरून ये-जा करण्यासाठी पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अशा प्रवाशांनी या सीमेवरील तपासणी पथकास आधार कार्ड किंवा तत्सम् पुरावे दाखविणे आवश्यक आहे. तसे पुरावे नसल्यास त्यांना राज्यातील प्रवेशास मज्जाव केला जातो. राज्य शासनाकडून कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले असतानासुद्धा लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाकडून ही सवलत देण्यात येत आहे. मात्र काही प्रवासी पुरावे दाखविण्यास टाळाटाळ करून वाद करताना दिसून येत आहेत. असे प्रसंग वारंवार घडल्यास स्थानिक प्रशासनाकडून या दिलेल्या सवलतीचा पुनर्विचार होऊ शकतो. सीमाभागातील महाराष्ट्र व कर्नाटकातील रहिवासी असणाऱ्या जनतेने थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. तपासणी पथकास सहकार्य करून प्रवास केला पाहिजे.

अशीही शक्कल

ठाण्याहून गडहिंग्लजकडे जाणारा प्रवासी आधार कार्ड सोबत नसल्याचे सांगतो, परंतु आधार कार्ड नसल्यास पुढे प्रवास करता येणार नाही म्हणून त्याला परत महाराष्ट्रात पाठविण्यासाठी गाडी मागे घेण्यात सांगितल्यानंतर ठाण्याचा रहिवासी असून आंबोलीला जाणार असल्याचे सांगतो.

राज्याच्या सीमेजवळील नागरिकांना कामानिमित्त दोन्ही राज्यांशी संपर्क ठेवावा लागतो. असे असले तरी त्यांनी पुरावे जवळ बाळगूनच प्रवास करावा. तपासणी पथकाशी वादाचे प्रसंग टाळावेत. स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा राज्य शासनाच्या कठोर निर्बंधांचीच अंमलबजावणी करावी लागेल.

-------- संगमेश शिवयोगी, मंडल पोलीस निरीक्षक