शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

‘स्वीकृत’ प्रक्रियाच बेकायदेशीर

By admin | Updated: January 26, 2016 01:23 IST

जिल्हा बॅँक : आयोगाची परवानगी न घेताच वारसदारांची वर्णी; सत्ता टिकविण्यासाठी राष्ट्रवादीचा आटापिटा

कोल्हापूर : सहकारातील नवीन वटहुकुमामुळे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक मंडळ चांगलेच धास्तावले आहे. पदावरून बाजूला जाण्याची नामुष्की येण्याऐवजी स्वत:हून बाजूला होण्यास सुरुवात झाली आहे. के. पी. पाटील व ए. वाय. पाटील या मेहुण्या-पाहुण्यांनी बॅँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला असून, त्याठिकाणी अनुक्रमे रणजित कृष्णराव पाटील व अर्चना आनंदराव पाटील या वारसदारांची नेमणूकही केली असली, तरी ही नियुक्तीच बेकायदेशीर आहे. राजीनामे देत मंजूर करणे हे कायद्याच्या कक्षेत बसत असले, तरी त्याच बैठकीत व प्राधिकरणाची मान्यता न घेता स्वीकृत करणे बेकायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. बॅँकेत झालेल्या गैरव्यवहारामुळे रिझर्व्ह बॅँकेने संचालक मंडळ बरखास्त केले असेल तर त्या संचालकांना दहा वर्षे कोणत्याही सहकारी संस्थेची निवडणूक लढविता येणार नाही, असा नवीन वटहुकूम लागू झाल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे संचालक मंडळ चांगलेच हादरून गेले आहे. या कायद्यामुळे जिल्हा बॅँकेच्या सध्याच्या दहा संचालकांच्या पदावर गंडांतर आले आहे. कायद्याच्या धाकाने ज्येष्ठ संचालक के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उर्वरित आठ संचालकही कायदेशीर सल्ला घेऊन राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. उर्वरितांमध्ये बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ, निवेदिता माने, विनय कोरे, पी. जी. शिंदे, पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक, राजू आवळे, नरसिंग पाटील या विद्यमान संचालकांचा समावेश आहे. राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदावर स्वीकृत करून घेण्यासाठी सहकार प्राधिकरणाची मान्यता घ्यावी लागते. प्राधिकरणाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालीच नियुक्ती करावी लागते. त्यामुळे के. पी. पाटील, ए. वाय. पाटील व प्रा. जयंत पाटील यांच्या जागेवर करण्यात आलेल्या नियुक्त्या अडचणीत आल्या आहेत. सध्या जिल्हा बॅँकेत राष्ट्रवादीचे नऊ, काँग्रेसचे आठ, जनसुराज्य पक्षाचे दोन, तर शिवसेना-भाजपचे प्रत्येकी एक असे २१ संचालक कार्यरत होते. राष्ट्रवादीचे नऊपैकी पाच, कॉँग्रेसचे चार व जनसुराज्यचा एक असे दहा संचालक वटहुकुमात अडकणार आहेत. त्यामुळे बॅँकेतील सत्ता समीकरणात काँग्रेसने काही कुरघोडी करू नये म्हणून राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली आहे. त्यासाठीच ए. वाय. पाटील व के. पी. पाटील यांचे राजीनामे घेत त्याठिकाणी स्वीकृत म्हणून दोघांची नियुक्ती केली. वटहुकुमामुळे संचालकपद अपात्र ठरले तर राष्ट्रवादीकडे संजय मंडलिक यांच्यासह आठ, तर काँग्रेसकडे अनिल पाटील यांच्यासह सहा संचालक असे बलाबल राहते. सत्ता टिकवण्यासाठीच राष्ट्रवादीने सर्व आटापिटा केल्याची चर्चा सुरू आहे.