शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

‘स्वीकृत’ प्रक्रियाच बेकायदेशीर

By admin | Updated: January 26, 2016 01:23 IST

जिल्हा बॅँक : आयोगाची परवानगी न घेताच वारसदारांची वर्णी; सत्ता टिकविण्यासाठी राष्ट्रवादीचा आटापिटा

कोल्हापूर : सहकारातील नवीन वटहुकुमामुळे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक मंडळ चांगलेच धास्तावले आहे. पदावरून बाजूला जाण्याची नामुष्की येण्याऐवजी स्वत:हून बाजूला होण्यास सुरुवात झाली आहे. के. पी. पाटील व ए. वाय. पाटील या मेहुण्या-पाहुण्यांनी बॅँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला असून, त्याठिकाणी अनुक्रमे रणजित कृष्णराव पाटील व अर्चना आनंदराव पाटील या वारसदारांची नेमणूकही केली असली, तरी ही नियुक्तीच बेकायदेशीर आहे. राजीनामे देत मंजूर करणे हे कायद्याच्या कक्षेत बसत असले, तरी त्याच बैठकीत व प्राधिकरणाची मान्यता न घेता स्वीकृत करणे बेकायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. बॅँकेत झालेल्या गैरव्यवहारामुळे रिझर्व्ह बॅँकेने संचालक मंडळ बरखास्त केले असेल तर त्या संचालकांना दहा वर्षे कोणत्याही सहकारी संस्थेची निवडणूक लढविता येणार नाही, असा नवीन वटहुकूम लागू झाल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे संचालक मंडळ चांगलेच हादरून गेले आहे. या कायद्यामुळे जिल्हा बॅँकेच्या सध्याच्या दहा संचालकांच्या पदावर गंडांतर आले आहे. कायद्याच्या धाकाने ज्येष्ठ संचालक के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उर्वरित आठ संचालकही कायदेशीर सल्ला घेऊन राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. उर्वरितांमध्ये बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ, निवेदिता माने, विनय कोरे, पी. जी. शिंदे, पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक, राजू आवळे, नरसिंग पाटील या विद्यमान संचालकांचा समावेश आहे. राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदावर स्वीकृत करून घेण्यासाठी सहकार प्राधिकरणाची मान्यता घ्यावी लागते. प्राधिकरणाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालीच नियुक्ती करावी लागते. त्यामुळे के. पी. पाटील, ए. वाय. पाटील व प्रा. जयंत पाटील यांच्या जागेवर करण्यात आलेल्या नियुक्त्या अडचणीत आल्या आहेत. सध्या जिल्हा बॅँकेत राष्ट्रवादीचे नऊ, काँग्रेसचे आठ, जनसुराज्य पक्षाचे दोन, तर शिवसेना-भाजपचे प्रत्येकी एक असे २१ संचालक कार्यरत होते. राष्ट्रवादीचे नऊपैकी पाच, कॉँग्रेसचे चार व जनसुराज्यचा एक असे दहा संचालक वटहुकुमात अडकणार आहेत. त्यामुळे बॅँकेतील सत्ता समीकरणात काँग्रेसने काही कुरघोडी करू नये म्हणून राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली आहे. त्यासाठीच ए. वाय. पाटील व के. पी. पाटील यांचे राजीनामे घेत त्याठिकाणी स्वीकृत म्हणून दोघांची नियुक्ती केली. वटहुकुमामुळे संचालकपद अपात्र ठरले तर राष्ट्रवादीकडे संजय मंडलिक यांच्यासह आठ, तर काँग्रेसकडे अनिल पाटील यांच्यासह सहा संचालक असे बलाबल राहते. सत्ता टिकवण्यासाठीच राष्ट्रवादीने सर्व आटापिटा केल्याची चर्चा सुरू आहे.