शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

विरोधी गाव असेल तरीही भरघोस विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:22 IST

कागल राज्यातील ग्रामीण भागाचा आत्मा असणारे ग्रामविकास खाते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्याकडे आले आहे. मी भरघोस निधी प्रत्येक गावाला ...

कागल राज्यातील ग्रामीण भागाचा आत्मा असणारे ग्रामविकास खाते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्याकडे आले आहे. मी भरघोस निधी प्रत्येक गावाला देत आहे. येत्या चार वर्षांत असे काम करू या की, पुढील पंचवीस वर्षे गावात कामच शिल्लक राहणार नाही. जरी आमच्या विरोधी सत्ता असेल त्यांनाही गट, तट, पक्ष न पाहता भरघोस विकास निधी देणारच, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कागल येथे आज कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघात विजयी झालेले मुश्रीफ गटाचे ३१८ ग्रामपंचायत सदस्य आणि नवनिर्वाचित ३६ सरपंच १९ उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते. नगराध्यक्षा माणिक माळी, युवराज पाटील, प्रवीणसिंह पाटील, गणपतराव फराकटे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, वसंतराव धुरे, शशिकांत खोत, उपसभापती अंजना सुतार, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, प्रकाश गाडेकर आदी प्रमुख उपस्थितीत होते.

आपल्या भाषणात मंत्री मुश्रीफ म्हणाले की, जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रतिसाद दिला आहे. ५३ पैकी ४६ सरपंच आमचे झाले आहेत. ग्रामपंचायत सदस्यांनी सामान्य लोकांचे अश्रू पुसण्याचे काम करावे. गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही.

स्वागत सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केले. गावातील प्राथमिक शाळा चांगल्या होण्यासाठी प्राधान्य देण्याचे आवाहन केले. यावेळी सतीश पाटील, भय्या माने यांची भाषणे झाली.

चौकट

पुढील जन्मी मदारी मेहतर

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या राज्यभिषेक दिन शासनाने शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यादिवशी सर्व ग्रामपंचायती, जिल्हा परिषदांवर भगवी गुढी उभी करून शिवरायांच्या विचारांचा जागर होणार आहे. मला अनेक जण म्हणत आहेत, तुम्ही चांगला निर्णय घेतला. मी त्यांना म्हणतो, मला तर पुढच्या जन्मी शिवरायांचा सेवक मदारी मेहतर व्हायची इच्छा आहे.

फोटो कॅप्शनसह पाठवीत आहे.