शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

महिलांच्या हस्ते अभिषेक, महापूजा

By admin | Updated: April 11, 2016 00:21 IST

शेलारवाडी (देहूरोड) येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र, शेलारवाडी (दिंडोरीप्रणीत) यांच्या वतीने श्री स्वामी समर्थमहाराजांचा प्रकटदिन सोहळा भक्तिमय वातावरणात

सचिन भोसले -कोल्हापूर -राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या गुणीजनखाना यांच्या अनुसंधानात खासबाग, कोल्हापूर येथील सरकारी इमारतीत, सरकारी अनुदानावर १९१५ साली ‘शारदा संगीत विद्यालय’ या संस्थेची स्थापना केली. ‘किराणा घराणा’ गायकीचे प्रतिनिधित्व करणारे कोल्हापूरचे उच्चपदस्थ ‘ख्याल’ गायक पंडित विश्वनाथबुवा जाधव यांना महाराजांनी या संस्थेचे संस्थापक-प्राचार्य नेमले. पुढे शाहू महाराज यांची कृपादृष्टी सतत असल्यामुळे पं. विश्वनाथबुवा यांना राजदरबारातसुद्धा विशेष स्थान होते. १९२० च्या ‘नवरात्रौत्सव’मध्ये शाहू महाराजांनी बुवांच्या गायनावर प्रसन्न होऊन त्यांचा सन्मान करीत ‘राजमान्य दरबार गायक’ म्हणून आदराने त्यांची नियुक्ती केली. या दरम्यान बुवांनी गोडबोले, व्यास, गद्रे, आठल्ये, आदी अनेक होतकरू शिष्य तयार केले. याचबरोबर बुवांनी करवीर दरबारातील सर्व लहान-थोर व्यक्तींना संगीतविद्या शिकविली. याच काळात बुवा छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई साहेब यांना संगीतसाधना व रियाज यांची तालीम देत असत. आपल्याबरोबर आपली पुढील पिढीही याच संगीत साधनेत पारंगत होऊन आपला वारसा तितक्याच जोमाने पुढे चालवावा म्हणून त्यांनी आपल्या संगीत विद्यालयात अनेक शिष्य तयार केले. गायकपुत्र ‘गानतपस्वी’ पंडित बाबूराव तथा बी. व्ही. जाधव, स्वररत्न राजाराम तथा आर. व्ही. व पंडित पांडुरंग जाधव या सर्वांनी मोठे सांगीतिक कार्य केले. पुढे विश्वनाथबुवांचे गायन ऐकून म्हैसूरचे महाराज श्रीमंत ‘नलवडी’ कृष्णराज वाडियार यांनी १९३६ सालच्या दसरा महोत्सवात बुवांना ‘प्रौढ गंधर्व ’हा बहुमान बहाल केला. करवीर संस्थानच्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात त्याकाळी अंबाबाई देवीसमोर व भवानी मंडपात तेथील देवीसमोर विश्वनाथबुवा व गायकपुत्र दरबार गवई या नात्याने प्रतिवर्षी जाहीररीत्या गायन केले. १९४० मध्ये राजाराम महाराजांनी त्यांना करवीर नगरीतील ‘गंधर्व परिवार’ ही पदवी दिली. यामध्ये ‘शारदा संगीत विद्यालय’ ही संस्था छत्रपती शाहू महाराज यांच्या इच्छेनुसार राजाराम महाराजांनी संस्थानाकडून योग्य तऱ्हेने सहकार्य देण्याचे आदेश दिले; परंतु राजाराम महाराज यांचे आकस्मात निधन झाले. त्यामुळे पुढे या कार्यास मुहूर्त लागला नाही. त्यानंतर पंडित विश्वनाथबुवा बळवंतराव जाधव यांनी विद्यालयाच्या रूपाने संगीतसेवा अविरतपणे सुरू ठेवली. पंडित विश्वनाथबुवा यांना १ सप्टेंबर १९६४ रोजी देवाज्ञा झाली आणि शारदा संगीत विद्यालयाची धुरा त्यांच्या गायकपुत्रांनी हाती घेतली. १९६५ साली कोल्हापूर शहर रस्ता रुंदीकरणावेळी ‘शारदा संगीत विद्यालय’ या संस्थेचे पुनर्वसन व छत्रपती शाहू महाराज यांच्या संगीत कलेला उत्तेजन देण्याची दूरदृष्टी व दूरदर्शी योजना लक्षात घेऊन श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज यांनी छत्रपती कल्चरल एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट न्यू पॅलेस, कोल्हापूर यांच्या अंतर्गत शारदा संगीत विद्यालयाची पुनर्स्थापना ‘श्री शाहू छत्रपती संगीत विद्यालय’ अशी भवानी मंडप, कोल्हापूर या ठिकाणी केली. प्राचार्य म्हणून पंडित बाबूराव जाधव यांची स्थापनेपासून नियुक्ती झाली. १९७८ ते १९९१ पर्यंत पंडित निळकंठबुवा चिखलीकर हे दरबार गवई व संस्थेचे प्राचार्य होते. त्यांच्या मृत्यूनंतर आजतागायत पंडित अरुण नारायण जेरे हे दरबार गवई व प्राचार्यपदाची धुरा वाहत आहेत. संस्थेचा कार्यविस्तार झाला असून नाशिक येथेही कार्यालय उभे करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष म्हणून मंगला राजाराम जाधव, तर सचिव म्हणून अजित जाधव काम पाहत आहेत. पंडित डी. व्ही. जाधव, पंडित आर. व्ही. जाधव यांच्या स्मरणार्थही विशेष सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.दुग्धशर्करा योगपंडित बाबूराव जाधव यांची जन्मशताब्दी व ‘शारदा संगीत विद्यालय’ पुनर्स्थापित श्री शाहू छत्रपती संगीत विद्यालयाची शताब्दीपूर्ती असा दुग्धशर्करा योग डिसेंबर २०१५ मध्ये जुळून आला. यानिमित्त ‘प्रौढ गंधर्व मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर’ या संस्थेतर्फे कसबा गेट पोलीस चौकीजवळील पंडित विश्वनाथबुवा जाधव चौक, गंगावेश येथे खास निमंत्रितांसाठी विशेष समारंभ आयोजित केला होता. यावेळी प्रौढ गंधर्व लेगसी सर्टिफिकेट देऊन प्राचार्य पंडित अरुण जेरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात श्रीमती राधिका राघवेंद्र पंडित यांचे सुश्राव्य गायन झाले. पंडित बाबूराव जाधव यांचे शिष्यांसाठी योगदानपंडित बाबूराव जाधव यांनी अखेरच्या श्वासापर्यंत येथे विद्यादान करीत मोठी शिष्यशाखा निर्माण केली. यामध्ये श्रीमती गुलाबबाई कागलकर, एम. जी. पटवर्धन व पंडित निळकंठबुवा चिखलीकर या विद्यालयात तालीम घेत होते. या दरम्यान विश्वनाथबुवांचे शिष्य असलेले सुधाकरबुवा डिग्रजकर यांचेसुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. देशपातळीवर गौरव४ एप्रिल १९५२ रोजी ‘अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालया’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दिल्ली येथे भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते पंडित विश्वनाथबुवा बळवंतराव जाधव यांचा संगीत विद्वत्तेबाबत यथोचित गौरव करण्यात आला.