शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमाग संस्थाधारकांना थकबाकी हप्त्यासाठी ‘अभय’

By admin | Updated: March 5, 2017 23:32 IST

अधिकाऱ्यांचाच हात : तीनशे कोटींसाठी निव्वळ तीन कोटी वसुलीची बोळवण

इचलकरंजी : कमी गुंतवणुकीत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकारने वस्त्रोद्योगामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाच्या हमीवर राष्ट्रीय सहकार निगमकडून कोट्यवधी रुपयांचे अर्थसाहाय्य आणि शासनाचे भागभांडवल देण्यात आले. मात्र, त्याची विविध संस्थांकडे ६३५.७७ कोटी रुपये थकबाकी आहे. यापैकी कोल्हापूर जिल्हा संस्थांकडे ३०० कोटी रुपयांची वसुली असून, त्यासाठी तीन ते साडेतीन कोटींच्याच हप्त्याची वसुली करण्याचा घाट शासनाच्या अधिकाऱ्यांकडून घातला जात आहे.वस्त्रोद्योगात यंत्रमाग संस्था स्थापन करण्यासाठी साधारणत: ५० लाख रुपयांची गुंतवणूक लागते. संस्थेकडील ४८ यंत्रमागाच्या कारखान्यातून कामगार, जॉबर, कांडीवाला, दिवाणजी, घडी कामगार, वहिफणी असा थेट रोजगार दिला जातो. याशिवाय यंत्रमागावर उत्पादित कापडापासून सायझिंग व प्रोसेसिंग उद्योग, गारमेंट उद्योगालाही चालना मिळते. तेथेही रोजगार उपलब्ध होतो. म्हणून राज्य शासनाने साधारणत: वीस वर्षांपूर्वी सहकार क्षेत्रात यंत्रमाग सोसायट्या स्थापन करून त्यांना शासकीय भागभांडवल व राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) कडून अर्थसाहाय्य देण्याचे निश्चित केले. त्यासाठी दहा टक्के स्व:भांडवल, वीस टक्के शासनाचे भागभांडवल, ७० टक्के एनसीडीसीचे अर्थसाहाय्य असा ढाचा निश्चित करण्यात आला.या यंत्रमाग सोसायट्यांना सुलभ पद्धतीने अर्थसाहाय्य मिळते आणि त्याच्या परतफेडीसाठी शासनाचा फारसा तगादा नसतो. हे लक्षात आल्यामुळे मध्यंतरी यंत्रमाग सोसायट्या स्थापन करण्याचे पेवच फुटले. यंत्रमागाबरोबरच सायझिंग, आॅटोलूम, प्रोसेसिंग अशा अधिक गुंतवणुकीच्या संस्थासुद्धा स्थापन झाल्या. राज्यभरामध्ये स्थापन झालेल्या संस्थांपैकी सर्वाधिक संस्था इचलकरंजी व परिसरामध्ये नोंदणी होऊन स्थापन झाल्या. या संस्थांकडे ३०० कोटी रुपयांची थकबाकी असून, त्यामध्ये २४ संस्थांकडे २०० कोटींची थकबाकी आहे, अशी माहिती आता उजेडात आली आहे. इचलकरंजी शहर व परिसरातील या संस्थांमध्ये प्रामुख्याने प्रोसेसर्स व आॅटोलूम संस्थांचा समावेश आहे. विशेषत: या सर्व संस्था बड्या मंडळींच्या असल्यामुळे संस्थांकडील वसुलीसाठी शासनाकडून बडगा उगारण्यात आला नसल्याने ही थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता शासनाच्या वस्त्रोद्योग व सहकार खात्यामार्फत विशेष मोहीम राबवून सक्तीने वसुली करण्यात येणार असल्याचे वस्त्रोद्योग उपसंचालक किरण सोनवणे यांनी सांगितले आहे. एकूणच ३०० कोटी रुपयांची थकबाकी असूनसुद्धा त्याच्या वसुलीसाठी तीन ते साडेतीन कोटी रु. इतकेच वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. एवढ्या मोठ्या रकमेच्या वसुलीसाठी निव्वळ एक टक्का उद्दिष्ट ठेवणे म्हणजे शासनाच्या थकबाकीच्या वसुलीसाठी बोळवण केल्याचाच प्रकार असल्याचे येथे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)